टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • चित्र - सतीश सोनवणे
  • Sat , 21 January 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नोटाबंदी Demonetisation नरेंद्र मोदी Narendra Modi बराक ओबामा Barack Obama राहुल गांधी Rahul Gandhi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. चलनात असलेल्या ५०० आणि एक हजाराच्या नोटा रद्द केल्यास देशात अभूतपूर्व गोंधळ निर्माण होईल. शिवाय लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. बाद चलनाच्या जागी नवीन चलन तातडीने आणणे शक्य होणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने सांगितल्यानंतरही निश्चलनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने रेटला. ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळात एकही बनावट नोट सापडली नाही. निश्चलनीकरण मोहिमेच्या नऊ नोव्हेंबर ते चार जानेवारी या काळात प्राप्तीकर विभागाकडून ४७४.३७ कोटी रु. मूल्याच्या नव्या-जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. यातला किती पैसा दहशतवादी किंवा गुन्हेगारी टोळ्यांकडून जप्त करण्यात आला, हे सांगण्यास अर्थ खाते असमर्थ आहे. : बातमी

पण, मुळात देशाला कॅशलेस बनवण्याचंच उद्दिष्ट होतं पंतप्रधानांच्या डोळ्यांसमोर. ते आधी जाहीर करून शत्रुराष्ट्रांना सावध करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अतिरेक्यांचा बीमोड, बनावट नोटांना चाप वगैरे उद्दिष्टं सांगून सगळयांचा पोपट केला आणि कॅशलेस क्रांती घडवून आणली. तिची गोड फळं तीन हजार त्र्याहत्तर साली नक्कीच मिळतील, यात शंका नाही… त्यांना आणि त्यांच्या ढोलकांना.

..............................................................

२. भाजप एखादी चुकीची गोष्ट करते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचे समर्थन करतो. एक प्रकारे संघ भाजपला शरण गेल्याची स्थिती आहे. मी संघात राहीन मात्र आम्हाला असहाय्य आणि कमकुवत नेतृत्व नको आहे. : संघाचे बंडखोर नेते आणि गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख कार्यकर्ते सुभाष वेलिंगकर

अहो वेलिंगकर काका, आपल्या देशात कधी नव्हे ते ५६ इंची छातीचं कणखर नेतृत्त्व लाभलेलं आहे युगानुयुगांत. त्यांनी देशाकडे पाहायचं की संघाकडे? मिशीवाल्या काकांची गच्छंति करून पंतप्रधानांनाच सरसंघचालकही बनवण्याचा विचार आहे का तुमचा? ते एकटे किती जबाबदाऱ्या सांभाळतील, विचार करा.

..............................................................

३. भविष्यात अमेरिकेत सर्वांना समान संधी मिळतील. वंश, रंग आणि धर्म यांच्या भिंती संपुष्टात येऊन अमेरिका हे एक शक्तिशाली राष्ट्र होईल. भविष्यात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हिंदू, ज्यू किंवा लॅटिन वंशाचा झालेला पाहायला आवडेल. : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

ते ज्यू, लॅटिन वगैरे सोडून सोडा हो. आमच्या एनाराय बांधवांनी निर्धार केला, तर अमेरिकेचा पुढचा अध्यक्ष खंबीर हिंदूच होईल, ही काळ्या दगडावरची रेघ समजा. तुम्हाला अध्यक्ष तुमच्याच देशात जन्मलेला असावा वगैरे काही फुटकळ नियम मात्र बदलायला लागतील, खंबीर आणि कणखर नेतृत्वासाठी. नोटा सध्या कोणत्या आहेत चलनात, त्याचीही माहिती पाठवून द्या.

..............................................................

४. राहुल गांधी यांनी ४० दिवसांपूर्वी बँकेतून ४००० रुपये काढले होते. त्यानंतर ते पुन्हा बँकेत फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे नवा कुर्ता विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना युवा मोर्चाच्या वतीने नवा कुर्ता पाठवत आहोत. : भाजप युवा मोर्चाचे नेते श्रीनिवास

राहुलने किंवा भक्तभाषेत पप्पूने आपल्या कुर्त्याचा फाटका खिसा दाखवून 'मोदींजींना अशा फाटक्या कपड्यांमध्ये केव्हाच पाहिले नसेल तरीही मोदीजी नेहमीच गरिबांचंच प्रतिनिधीत्व करतात' अशी नौटंकी करून दाखवली, ते फारच जिव्हारी लागलेलं दिसतंय भक्तांच्या. पण, त्यांना कुर्ता पाठवायला काँग्रेसचे कार्यकर्ते आहेतच की. तुम्ही पाठवायचा तर तो स्पेशल असायला हवा. म्हणजे उदाहरणार्थ मोदींनी चरख्यावर स्वहस्ते विणलेल्या कापडाचा वगैरे. अर्रर्रर्र, पण, त्यासाठी मोदींना पोझ देण्यापलीकडे चरखा शिकावा लागेल, नाही का?

..............................................................

५. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला स्वदेशीचा मंत्र दिला. अगदी आज, आतापासून अमेरिकेची विपन्नावस्था संपणार आहे. अमेरिकी हातांनी आणि अमेरिकी श्रमांनीच आता आपण अमेरिकेची पुनर्बांधणी करणार आहेत. अमेरिकी हातांनाच काम देणार आहोत आणि अमेरिकी उत्पादनेच विकत घेणार आहोत. अशी भावनिक साद ट्रम्प यांनी घातली.

ट्रम्पतात्या, आता एकदाचं कोणत्या शाखेत कधी स्वयंसेवक होतात ते जाहीर करून टाका. बरं ते अमेरिकीच उत्पादनं घेणार म्हणताय, तर उदयापास्नं कम्प्यूटर, मोबाइल, कपडे, चपलाबुटांची दुकानं बंद होणार का अमेरिकेतली? हा सगळा माल भायेरनंच येतोय म्हणून विचारलं तात्या. आन् तुम्हाला सस्त्यात कच्चा माल, सुट्टे भाग पुरवणाऱ्या फॅक्ट्र्या लागल्यात देशादेशांत त्याही बंद काय? रेड इंडियनच्या ड्रेसात फिरावं लागनार दिसतंय तात्याला लौकरच.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......