टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ज्याँ मार्क आयरॉल्ट, नरेंद्र मोदी, वासुदेव देवनानी, अखिलेश यादव, नवज्योत सिंग सिद्धू आणि सुखबीर सिंग बादल
  • Wed , 18 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi ज्याँ मार्क आयरॉल्ट Jean-Marc Ayrault वासुदेव देवनानी Vasudev Devnani अखिलेश यादव Akhilesh Yadav नवज्योत सिंग सिद्धू Navjot Singh Sidhu सुखबीर सिंग बादल Sukhbir Singh Badal

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीबाबत घेतलेला निर्णय साहसी आणि कौतुकास्पद आहे. मोदींच्या या निर्णयावरूनच समजते की, ते करबुडवेगिरीला चाप बसविण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी समर्पित आहेत. भारताची वाटचाल योग्य दिशेने होत आहे. : फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ज्याँ मार्क आयरॉल्ट

अभिमानाने छाती भरून आली ना? हे ज्याँ महोदय 'व्हायब्रंट गुजरात' (हो हो, तोच उपक्रम जिथे चारशेहून अधिक शालेय शिक्षकांना काल्पनिक कंपन्यांचे सीईओ बनवून हजर करण्यात आलं होतं गर्दी दाखवण्यासाठी) या व्यापारी संमेलनासाठी आले होते. भारतात आधीच हजाराहून अधिक कंपन्या असलेल्या फ्रान्सला अपारंपारिक ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करायची इच्छा आहे, ‘मेक इन इंडिया’ ही त्यांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीची संधी वाटते, म्हणून काय झालं? जे अभिमानास्पद आहे, ते अभिमानास्पद आहे.

चित्र - सतीश सोनवणे

२. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाजवादी पक्षाच्या वादात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सरशी झाली आहे. समाजवादी पक्षाच्या सायकल या चिन्हावर पिता मुलायम सिंह आणि पुत्र अखिलेश यांनी दावा सांगितला होता. निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

यात आश्चर्य काय? 'बाबा, माला सायकल हव्वी, आत्ताच्या आत्ता!' असा हुकूम चिरंजीवांनी सोडल्यानंतर कोणत्या बापाची टाप असते तो नाकारण्याची? कॅरियरवर बसलेल्या पोराला सीटवर बसवून आपण चालत्या सायकलवरून पायउतार होऊन जाण्याची कसरत मुलायमसिंहांनी या वयात, अशा देहविस्तारासह किती चपळाईने केली, याचं कौतुक करायला हरकत नाही.

…………………………..…………………………..

३. सर्वसमावेशक विकासाच्या निकषांवर तयार करण्यात आलेल्या जगातील ७९ विकसित राष्ट्रांच्या यादीत भारताला ६०वे स्थान मिळाले आहे. जागतिक आर्थिक मंचाने म्हणजे वर्ल्ड इकनॉमिक फोरमने प्रकाशित केलेल्या ‘समावेशक वाढ आणि विकास अहवाल २०१७’मध्ये समावेशक विकास निर्देशंकात भारताला चीनपेक्षा खालचे स्थान तर मिळाले आहेच; पण या यादीत पाकिस्तानही भारताच्या वरच्या क्रमांकावर आहे. धोरणकर्त्यांकडून तयार करण्यात येणारे विकासाचे प्रारूप आणि विकास मोजण्याच्या निकषांमधील त्रुटी याला कारणीभूत आहेत.

अरे देवा, काय ही किचकट डोकेदुखी! एक अक्षर कळेल तर शपथ! यापेक्षा सौ करोड हिंदुस्तानी सीमेवर उभे राहून अमुक गोष्ट करतील, तर पाकिस्तानचं तमुक होऊन जाईल, ही जुमलेबाजी किती सोपी, किती सुटसुटीत!

…………………………..…………………………..

४. सर्वच प्राण्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो, उच्छवासातून कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडला जातो. पण, उच्छवासातूनही ऑक्सिजनच देणारा गाय हा एकमेव प्राणी आहे. : राजस्थानमधील शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषीविषयक समितीने २००६ मध्ये दिलेल्या अहवालानुसार गायी-म्हशींसारखी गवत चरणारी जनावरं मिथेन, कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वायूंच्या उत्सर्जनाला जबाबदार असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. चाऱ्याचं पचन होत असताना ढेकरच्या माध्यमातून हा वायू बाहेर पडत असतो, असं हा अहवाल सांगतो. पण, 'राजीव दीक्षित स्कूल ऑफ एव्हरीथिंग इन द युनिव्हर्स'चे विद्यार्थी असलेल्या देवनानी यांनी केलेलं हे मौलिक संशोधन पाश्चिमात्यांचे डोळे उघडून त्यांच्या मेंदूला काही गोजन्य ऑक्सिजनचा पुरवठा करील, अशी आशा आहे. गाय कोणत्या भागातून ऑक्सिजन देते आणि देवनानी महोदय त्या भागाजवळ काय करत असतात, एवढं फक्त जाहीर व्हायला हवं.

…………………………..…………………………..

५. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपला ‘कैकयी’ आणि काँग्रेसला ‘कौसल्या’ म्हटले होते. सिद्धू यांच्या या विधानाचा समाचार घेताना सुखबीर सिंग बादल म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धू दररोज ‘आई’ बदलत असतात.

बादलसाहेब, नका एवढं जिवाला लावून घेऊ. हा धंदाच असा आहे. इथे कोणी ‘आई’ बदलत असतं, कोणी ‘बाप’. भाऊबंद तर काही विचारूच नका दिवसागणिक किती बदलतात ते!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......