टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अभिजित खांडेकर, संसद, पतंजली, सनातन, वेंकय्या नायडू आणि राहुल गांधी
  • Tue , 10 January 2017
  • विनोदनामा टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi इंद्रजित खांडेकर Indrajit Khandekar संसद Parliament पतंजली Patanjali सनातन संस्था Sanatan Sanstha वेंकय्या नायडू Venkaiah Naidu

१. मूल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांना ‘देव निर्माता आहे’ हे शिकवण्याचा प्रकार संविधानाच्या तरतुदीचे उल्लंघन करणारा ठरतो काय, अशी विचारणा पंतप्रधान कार्यालयाने मनुष्यबळ विकास खात्याला केली आहे. सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील न्यायवैद्यक औषध केंद्राचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी याविषयी सविस्तर अहवाल सादर करून माहितीच्या अधिकाराअंतर्गत थेट पंतप्रधान कार्यालयास विचारणा केली होती.

यावर विद्यमान मनुष्यबळ विकास खात्याकडून अपेक्षित दिलगिरी येणेप्रमाणे : साक्षात पंतप्रधान महोदय भूतलावर असताना सर्व गोष्टींचा निर्माता परमेश्वर आहे, असे सांगण्याची अक्षम्य आगळीक काही शाळांमध्ये सुरू आहे. त्याची गंभीरपणे दखल घेऊन ताबडतोब योग्य ती दुरुस्ती करून घेतली जाईल, याची खात्री बाळगून एकडाव माफी करावी.

…………………………………….

२. सनातन संस्थेत साधकांना छिन्नमनस्कता व इतर मानसिक रोगावरची औषधे दिली जात होती : पानसरे-दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या पत्नीच्या जबानीतून खुलासा

यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? डोक्यावर परिणाम झालेला नसेल आणि व्यक्तिमत्त्व दुभंग-त्रिभंगलेलं नसेल, तर कोण जाईल अशा आश्रमांमध्ये?

…………………………………….

३. पतंजली आयुर्वेद कंपनीचा उत्तराधिकारी कोणी व्यापारी असणार नाही. संन्यासी पुरुष आणि महिलाच हा विशाल कारभार सांभाळतील : रामदेव बाबा

हेही विधान पतंजली कंपनीच्या एकंदर जाहिरातबाजीला साजेसंच आहे. आधी मुळात संन्यासी ही कल्पनाच त्यांनी मोडीत काढलेली आहे. घटकाभर त्यांना संन्यासी मानलं तरी ते कंपनीच्या माध्यमातून व्यापारच करणार आहेत, म्हणजे फारफारतर व्यापारी संन्यासी म्हणता येईल त्यांना. काही दिवसांनी बाबा संसारी संन्यासी अशीही एक वेगळी ब्रँच काढतील बहुतेक.

…………………………………….

४. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीवरून सुरू असलेल्या गोंधळात सत्ताधारी आणि विरोधकांत कशाच्याही बाबतीत एकमत झालं नाही. मात्र, सोमवारी ईद ए मिलादची सुटी घ्यायची का, या विषयावर मात्र 'सुटी घ्यायची' यावर शून्य मिनिटांत सर्वपक्षीय एकमत झालं.

सदनाची पातळी इतकी शाळकरी असल्यावर तिथे फार गंभीर चर्चांची अपेक्षा ठेवण्यात मतलब काय? सदन सुटल्यानंतर सदस्य 'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणून ओरडत बाहेर येतात का, हे एकदा पाहिलं पाहिजे.

…………………………………….

५. नोटाबंदीचा निर्णय हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून मला याबाबत संसदेत बोलायंच आहे. मी तिथं सर्व बोलणार आहे. संसदेत मला बोलण्याची परवानगी दिल्यास राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. : राहुल गांधी

अहो, मग आपल्या खासदारांना आरडाओरडा बंद करायला सांगा. संसदेचं कामकाज चालूद्यात आणि हवा तेवढा वेळ बोला मनात जे काही असेल ते. तुम्ही राजकीय भूकंप घडवून आणू शकलात, तर बिचाऱ्या देवांचीही सुटका होईल… काँग्रेसजनांनी कधीपासून पाण्यात बुडवून ठेवलंय त्यांना.

……………………………………

५. काँग्रेसच्या सत्ताकाळात लाखो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, हे ते विसरत आहेत. त्यांना आम्हाला उपदेश करण्याचा अधिकार काय? : वेंकय्या नायडू

अण्णा, तुमच्या सत्ताकाळात जवानांच्या शवपेट्यांचाही भ्रष्टाचार झाला. तुम्ही लष्करावर बोलणं सोडलंत का?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......