अलविदा अरुण जेटली जी...
संकीर्ण - श्रद्धांजली
रवीश कुमार
  • अरुण जेटली (२८ डिसेंबर १९५२ - २४ ऑगस्ट २०१९)
  • Mon , 26 August 2019
  • पडघम श्रद्धांजली अरुण जेटली Arun Jaitley भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee लालकृष्ण आडवाणी Lal Krishna Advani

अलविदा जेटली जी,

जेव्हा एखादा नेता विद्यार्थिदशेतच राजकारणाची निवड करतो, तेव्हा त्याचा आवर्जून सन्मान करायला पाहिजे. आणि जो शेवटपर्यंत टिकून राहतो, त्याचा विशेष सन्मान करायला पाहिजे. सुरक्षित जीवन सोडून असुरक्षित जीवनाची निवड करणं सोपं नसतं. १९७४मध्ये सुरू झालेल्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात अरुण जेटली सहभागी झाले होते. आणीबाणीच्या घोषणेनंतर त्यांना अटक झाली, कारण रामलीला मैदानात ते जयप्रकाशांसोबत उपस्थित होते. बंडखोरीपासून राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे जेटली शेवटपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी एकदाच निवडणूक लढवली, पण हरले. राज्यसभेत खासदार राहिले. पण आपल्या क्षमतेच्या जोरावर जनतेमध्ये नेहमी जनप्रतिनिधी बनून राहिले. कुणाच्या तरी कृपेमुळे राज्यसभेची खासदारकी मिळवली आहे, अशा प्रकारे त्यांच्याकडे कधी पाहिलं गेलं नाही. जननेता नसले म्हणून काय झालं, राजकीय नेता तर होतेच ना!

जेटलींच्या व्यक्तिमत्त्वात शालीनता, विनम्रता, कुटीलता आणि चतुराई सगळं होतं आणि एकप्रकारचा अहंकारही होता. पण त्यांनी कधी आपल्या बोलण्याचा स्तर घसरू दिला नाही. ते घोषणाबाजीचे स्पिनर होते. त्यांचं म्हणणं खोडता यायचं, पण असायचं खास. ते एक आव्हान निर्माण करायचे की, तुमची तयारी असेल तरच त्यांचं म्हणणं खोडून काढता यायचं. ल्युटन दिल्लीचे अनेक पत्रकार त्यांचे खास होते आणि तेही पत्रकारांचे ओळखून असायचे. पत्रकार त्यांना गमतीनं ‘ब्युरो चीफ’ म्हणत.

जेटलींनी वकिलीमध्ये नाव कमावलं आणि आपल्या नावानं त्या क्षेत्राला प्रतिष्ठाही मिळवून दिली. अनेक वकील राजकारणात येऊन जेटलींसारखं स्थान मिळवण्याची आकांक्षा धरायचे. जेटलींनी अनेकांना मदतही केली. ते अनुदार नव्हते. त्यांच्या जवळचे लोक सांगायचे की, स्वप्न पाहण्यात ते कधी हात आखडता घ्यायचे नाहीत.

अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, अनंत कुमार, गोपीनाथ मुंढे यांच्यासारखे भाजपनेते दुसऱ्या पिढीतले मानले गेले. यातील जेटली-स्वराज वाजपेयी-आडवाणी यांच्या समकालीनांसारखे राहिले. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा जेटली दिल्लीत त्यांचे वकील होते. मोदींनी त्यांच्या निधनानंतर तीव्र दु:ख व्यक्त करत म्हटलं की, दशकों पुराना दोस्त चला गया है. अमित शहांनाही जेटली आठवत राहतील. एक चांगला वकील चांगला मित्रही असेल तर प्रवास सुखकर होतो!

जेटलींची पाहण्याची आणि हसण्याची नजाकत वेगळीच होती. ते कधी टिंगलटवाळी करायचे तर कधी हसवायचे. ते आपल्या बोलण्यातून आणि कल्पनेतून राजकारण करत, तीर आणि तलवार चालवणारं राजकारण करत नसत.

जी व्यक्ती राजकारणात असते, ती जनतेमध्ये असते. त्यामुळे तिच्या निधनाकडे जनतेच्या दु:खासारखं पाहिलं गेलं पाहिजे. सार्वजनिक जीवनात राहणं हे खूप कठीण असतं. जे लोक हे करतात, त्यांच्या निधनानंतर पुढे होऊन श्रद्धांजली द्यायला हवी. अलविदा जेटली जी. आजचा दिवस भाजपच्या शालीन आणि उत्साही नेत्यांना खूप उदास करणारा असेल. मी त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो. ओम शांती!

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

रवीश कुमार यांच्या मूळ हिंदी लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......