अलविदा अरुण जेटली जी...
संकीर्ण - श्रद्धांजली
रवीश कुमार
  • अरुण जेटली (२८ डिसेंबर १९५२ - २४ ऑगस्ट २०१९)
  • Mon , 26 August 2019
  • पडघम श्रद्धांजली अरुण जेटली Arun Jaitley भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee लालकृष्ण आडवाणी Lal Krishna Advani

अलविदा जेटली जी,

जेव्हा एखादा नेता विद्यार्थिदशेतच राजकारणाची निवड करतो, तेव्हा त्याचा आवर्जून सन्मान करायला पाहिजे. आणि जो शेवटपर्यंत टिकून राहतो, त्याचा विशेष सन्मान करायला पाहिजे. सुरक्षित जीवन सोडून असुरक्षित जीवनाची निवड करणं सोपं नसतं. १९७४मध्ये सुरू झालेल्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात अरुण जेटली सहभागी झाले होते. आणीबाणीच्या घोषणेनंतर त्यांना अटक झाली, कारण रामलीला मैदानात ते जयप्रकाशांसोबत उपस्थित होते. बंडखोरीपासून राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे जेटली शेवटपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी एकदाच निवडणूक लढवली, पण हरले. राज्यसभेत खासदार राहिले. पण आपल्या क्षमतेच्या जोरावर जनतेमध्ये नेहमी जनप्रतिनिधी बनून राहिले. कुणाच्या तरी कृपेमुळे राज्यसभेची खासदारकी मिळवली आहे, अशा प्रकारे त्यांच्याकडे कधी पाहिलं गेलं नाही. जननेता नसले म्हणून काय झालं, राजकीय नेता तर होतेच ना!

जेटलींच्या व्यक्तिमत्त्वात शालीनता, विनम्रता, कुटीलता आणि चतुराई सगळं होतं आणि एकप्रकारचा अहंकारही होता. पण त्यांनी कधी आपल्या बोलण्याचा स्तर घसरू दिला नाही. ते घोषणाबाजीचे स्पिनर होते. त्यांचं म्हणणं खोडता यायचं, पण असायचं खास. ते एक आव्हान निर्माण करायचे की, तुमची तयारी असेल तरच त्यांचं म्हणणं खोडून काढता यायचं. ल्युटन दिल्लीचे अनेक पत्रकार त्यांचे खास होते आणि तेही पत्रकारांचे ओळखून असायचे. पत्रकार त्यांना गमतीनं ‘ब्युरो चीफ’ म्हणत.

जेटलींनी वकिलीमध्ये नाव कमावलं आणि आपल्या नावानं त्या क्षेत्राला प्रतिष्ठाही मिळवून दिली. अनेक वकील राजकारणात येऊन जेटलींसारखं स्थान मिळवण्याची आकांक्षा धरायचे. जेटलींनी अनेकांना मदतही केली. ते अनुदार नव्हते. त्यांच्या जवळचे लोक सांगायचे की, स्वप्न पाहण्यात ते कधी हात आखडता घ्यायचे नाहीत.

अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, अनंत कुमार, गोपीनाथ मुंढे यांच्यासारखे भाजपनेते दुसऱ्या पिढीतले मानले गेले. यातील जेटली-स्वराज वाजपेयी-आडवाणी यांच्या समकालीनांसारखे राहिले. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा जेटली दिल्लीत त्यांचे वकील होते. मोदींनी त्यांच्या निधनानंतर तीव्र दु:ख व्यक्त करत म्हटलं की, दशकों पुराना दोस्त चला गया है. अमित शहांनाही जेटली आठवत राहतील. एक चांगला वकील चांगला मित्रही असेल तर प्रवास सुखकर होतो!

जेटलींची पाहण्याची आणि हसण्याची नजाकत वेगळीच होती. ते कधी टिंगलटवाळी करायचे तर कधी हसवायचे. ते आपल्या बोलण्यातून आणि कल्पनेतून राजकारण करत, तीर आणि तलवार चालवणारं राजकारण करत नसत.

जी व्यक्ती राजकारणात असते, ती जनतेमध्ये असते. त्यामुळे तिच्या निधनाकडे जनतेच्या दु:खासारखं पाहिलं गेलं पाहिजे. सार्वजनिक जीवनात राहणं हे खूप कठीण असतं. जे लोक हे करतात, त्यांच्या निधनानंतर पुढे होऊन श्रद्धांजली द्यायला हवी. अलविदा जेटली जी. आजचा दिवस भाजपच्या शालीन आणि उत्साही नेत्यांना खूप उदास करणारा असेल. मी त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो. ओम शांती!

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

रवीश कुमार यांच्या मूळ हिंदी लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......