‘भारतात पुन्हा मोदी सरकारच येणार!’... चीनची भविष्यवाणी!
पडघम - देशकारण
सुधीर अग्रवाल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे ‘ग्लोबल टाइम्स’ हे वर्तमानपत्र आणि आणि त्यातील लेख
  • Thu , 02 May 2019
  • पडघम देशकारण क्षी जिनपिंग Xi Jinping नरेंद्र मोदी Narendra Modi ग्लोबल टाइम्स Global Times

चीनमधील कम्युनिस्ट नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही घोषणा केली आहे. त्यांचे सरकार राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग व मोदी यांच्यातील अनौपचारिक बैठकीची तयारी करत आहे. मागील वर्षी चीनच्या वुहान शहरात ही बैठक झाली होती. त्याच धर्तीवर पुन्हा बैठक आयोजित केली जात आहे. या वर्षी ही बैठक भारताच्या एखाद्या शहरात होऊ शकते.

परराष्ट्र धोरणात निवडणूक निकालापूर्वी अशी तयारी करणे धोकादायक समजले जाते. कारण निवडणुकीनंतर विरोधी पक्षाचेही सरकार सत्तेत येऊ शकते. मात्र तरीही चीन हे पाऊल उचलत आहे. कारण चीनला मोदी यांचे सरकार सत्तेवर येईल, याची पूर्ण खात्री वाटत आहे. वांग यांनी निवडणुकीदरम्यान बैठकीची घोषणा करून स्पष्ट केले की, मोदी यांनाच सत्ता स्थापनेची पुन्हा संधी मिळणार आहे.

भारताचे पंतप्रधान मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये झालेली बैठक यशस्वी झाली होती. दोन्ही नेत्यांनी आपसातला विश्वास कायम ठेवत भारत-चीन यांचे संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला. वांग म्हणतात, वुहान बैठकीनंतर आम्ही सर्वच क्षेत्रांत सहकार्य करणार आहोत.

चीनचे अधिकारी व थिंक टँककडून मोदी यांनाच प्राथमिकता दिली जात आहे. चिनी सरकारचे समर्थक असलेले वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये शिन्हुआ विद्यापीठातील संशोधक फेलो लू यांग यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात मोदी यांचे पुनरागमन होणार असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पक्ष हा संसदेत सर्वांत मोठा पक्ष बनेल, यात कोणतीही शंका नसल्याचे लू यांग यांनी म्हटले आहे. मोदींची राजकीय उंची इतर उमेदवारांना पिछाडीवर नेत असून, भाजपची आर्थिक व संघटनशक्ती विरोधी पक्षांपेक्षा किती तरी जास्त आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा एकदा संधी मिळेल, असा निष्कर्ष लू यांग यांनी काढला आहे.

कम्युनिस्ट चीन हा सामान्यपणे अशा नेत्यांचे समर्थन करतो, जे एखादा मुद्दा दीर्घकाळ रखडवण्याऐवजी त्यावर तत्काळ निर्णय घेऊ शकतात. कारण लोकशाही व स्वतंत्र न्यायव्यवस्था असलेल्या देशांत नेहमीच असे होत असते. चीनचीही भारतात एक मजबूत नेता असावा, अशी इच्छा आहे. कारण चिनी गुंतवणूकदार हे भारतीय बाजारपेठेकडे विकासाचा एक मुख्य स्त्रोत म्हणून बघतात. कारण भारतात मोबाइल फोनच्या ६० टक्के बाजारपेठेवर चिनी ब्रँड‌्सचा ताबा आहे. दिल्लीत विदेशी गुंतवणुकीबाबतच्या प्रस्तावांवर तत्काळ निर्णय घेऊ न शकणारे कमकुवत आघाडी सरकार नसावे, असेही चीनला वाटतेय.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram

.............................................................................................................................................

अमेरिकेप्रमाणे चीनमध्येही राजकीय पक्षांसाठी निधी जमवण्याकरता भारतीय समुदायाच्या डिनर मीटिंग होत नाहीत; परंतु तेथे राहणारे भारतीय व्हॉसट‌्अॅप व वीचॅटसारख्या चिनी अॅपच्या माध्यमातून गांभीर्याने चर्चा करत आहेत. या लोकांमध्ये इतर कोणत्याही नेत्याच्या तुलनेत मोदी चाहत्यांची संख्या जास्त आहे. कारण त्यात व्यापाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

दक्षिण चीनमधील एका कारखान्याचे मालक असलेले राजेश पुरोहित सांगतात की, मोदींचे आंतरराष्ट्रीय दौरे व त्यांच्या प्रभावामुळे चीनच्या नागरिकांत भारतीयांचे स्थान उंचावले आहे. यासोबतच भारतीय पासपोर्टचा सन्मानही वाढला आहे. २०१४ पूर्वी चीनमध्ये भारतीयांकडे सन्मानाने पाहिले जात नव्हते; परंतु मोदी पंतप्रधान बनल्यानंतर सन्मानाने पाहिले जाऊ लागले. हा सन्मान भारतीयांना सामाजिक व व्यापारी अशा दोन्ही पातळ्यांवर मिळणे गरजेचे आहे.

तथापि मोदींच्या सत्ताकाळात डोकलामसह अनेक विषयांवर भारत व चीनदरम्यान पूर्वीच्या तुलनेत अधिक वाद झाले. याशिवाय मोदींचे चीनच्या ‘वन बेल्ट-वन रोड’ प्रकल्पापासून दूर राहणे व मसूद अझहरला ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित करण्यात चीनने अडथळे निर्माण करणे, हेदेखील काही वादाचे मुद्दे आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे, हे वाद असूनही चीनमध्ये भारताचा मान वाढला आहे. कारण चीन हा ताकद व त्याच्यासमोर सक्षमपणे उभे राहणाऱ्या कोणत्याही देशाच्या क्षमतेचा सन्मान करतो. आणि भारत याबाबत आतापर्यंत तरी चीनच्या नजरेत अव्वलस्थानी आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.

drsudhiragrawal239@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......