‘भारतात पुन्हा मोदी सरकारच येणार!’... चीनची भविष्यवाणी!
पडघम - देशकारण
सुधीर अग्रवाल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे ‘ग्लोबल टाइम्स’ हे वर्तमानपत्र आणि आणि त्यातील लेख
  • Thu , 02 May 2019
  • पडघम देशकारण क्षी जिनपिंग Xi Jinping नरेंद्र मोदी Narendra Modi ग्लोबल टाइम्स Global Times

चीनमधील कम्युनिस्ट नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही घोषणा केली आहे. त्यांचे सरकार राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग व मोदी यांच्यातील अनौपचारिक बैठकीची तयारी करत आहे. मागील वर्षी चीनच्या वुहान शहरात ही बैठक झाली होती. त्याच धर्तीवर पुन्हा बैठक आयोजित केली जात आहे. या वर्षी ही बैठक भारताच्या एखाद्या शहरात होऊ शकते.

परराष्ट्र धोरणात निवडणूक निकालापूर्वी अशी तयारी करणे धोकादायक समजले जाते. कारण निवडणुकीनंतर विरोधी पक्षाचेही सरकार सत्तेत येऊ शकते. मात्र तरीही चीन हे पाऊल उचलत आहे. कारण चीनला मोदी यांचे सरकार सत्तेवर येईल, याची पूर्ण खात्री वाटत आहे. वांग यांनी निवडणुकीदरम्यान बैठकीची घोषणा करून स्पष्ट केले की, मोदी यांनाच सत्ता स्थापनेची पुन्हा संधी मिळणार आहे.

भारताचे पंतप्रधान मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये झालेली बैठक यशस्वी झाली होती. दोन्ही नेत्यांनी आपसातला विश्वास कायम ठेवत भारत-चीन यांचे संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला. वांग म्हणतात, वुहान बैठकीनंतर आम्ही सर्वच क्षेत्रांत सहकार्य करणार आहोत.

चीनचे अधिकारी व थिंक टँककडून मोदी यांनाच प्राथमिकता दिली जात आहे. चिनी सरकारचे समर्थक असलेले वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये शिन्हुआ विद्यापीठातील संशोधक फेलो लू यांग यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात मोदी यांचे पुनरागमन होणार असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पक्ष हा संसदेत सर्वांत मोठा पक्ष बनेल, यात कोणतीही शंका नसल्याचे लू यांग यांनी म्हटले आहे. मोदींची राजकीय उंची इतर उमेदवारांना पिछाडीवर नेत असून, भाजपची आर्थिक व संघटनशक्ती विरोधी पक्षांपेक्षा किती तरी जास्त आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा एकदा संधी मिळेल, असा निष्कर्ष लू यांग यांनी काढला आहे.

कम्युनिस्ट चीन हा सामान्यपणे अशा नेत्यांचे समर्थन करतो, जे एखादा मुद्दा दीर्घकाळ रखडवण्याऐवजी त्यावर तत्काळ निर्णय घेऊ शकतात. कारण लोकशाही व स्वतंत्र न्यायव्यवस्था असलेल्या देशांत नेहमीच असे होत असते. चीनचीही भारतात एक मजबूत नेता असावा, अशी इच्छा आहे. कारण चिनी गुंतवणूकदार हे भारतीय बाजारपेठेकडे विकासाचा एक मुख्य स्त्रोत म्हणून बघतात. कारण भारतात मोबाइल फोनच्या ६० टक्के बाजारपेठेवर चिनी ब्रँड‌्सचा ताबा आहे. दिल्लीत विदेशी गुंतवणुकीबाबतच्या प्रस्तावांवर तत्काळ निर्णय घेऊ न शकणारे कमकुवत आघाडी सरकार नसावे, असेही चीनला वाटतेय.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram

.............................................................................................................................................

अमेरिकेप्रमाणे चीनमध्येही राजकीय पक्षांसाठी निधी जमवण्याकरता भारतीय समुदायाच्या डिनर मीटिंग होत नाहीत; परंतु तेथे राहणारे भारतीय व्हॉसट‌्अॅप व वीचॅटसारख्या चिनी अॅपच्या माध्यमातून गांभीर्याने चर्चा करत आहेत. या लोकांमध्ये इतर कोणत्याही नेत्याच्या तुलनेत मोदी चाहत्यांची संख्या जास्त आहे. कारण त्यात व्यापाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

दक्षिण चीनमधील एका कारखान्याचे मालक असलेले राजेश पुरोहित सांगतात की, मोदींचे आंतरराष्ट्रीय दौरे व त्यांच्या प्रभावामुळे चीनच्या नागरिकांत भारतीयांचे स्थान उंचावले आहे. यासोबतच भारतीय पासपोर्टचा सन्मानही वाढला आहे. २०१४ पूर्वी चीनमध्ये भारतीयांकडे सन्मानाने पाहिले जात नव्हते; परंतु मोदी पंतप्रधान बनल्यानंतर सन्मानाने पाहिले जाऊ लागले. हा सन्मान भारतीयांना सामाजिक व व्यापारी अशा दोन्ही पातळ्यांवर मिळणे गरजेचे आहे.

तथापि मोदींच्या सत्ताकाळात डोकलामसह अनेक विषयांवर भारत व चीनदरम्यान पूर्वीच्या तुलनेत अधिक वाद झाले. याशिवाय मोदींचे चीनच्या ‘वन बेल्ट-वन रोड’ प्रकल्पापासून दूर राहणे व मसूद अझहरला ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित करण्यात चीनने अडथळे निर्माण करणे, हेदेखील काही वादाचे मुद्दे आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे, हे वाद असूनही चीनमध्ये भारताचा मान वाढला आहे. कारण चीन हा ताकद व त्याच्यासमोर सक्षमपणे उभे राहणाऱ्या कोणत्याही देशाच्या क्षमतेचा सन्मान करतो. आणि भारत याबाबत आतापर्यंत तरी चीनच्या नजरेत अव्वलस्थानी आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.

drsudhiragrawal239@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......