जयललिता : दोन मुलाखती, दोन रूपं
संकीर्ण - मुलाखत
टीम अक्षरनामा
  • जयललिता : २४ फेब्रुवारी १९४८ – ५ डिसेंबर २०१६
  • Thu , 08 December 2016
  • जयललिता Jayalalithaa मुख्यमंत्री Chief Minister of Tamil Nadu सिमी गरेवाल Simi Garewal करण थापर Karan Thapar

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता गेल्या. त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा होते आहे. कुणी त्यांच्या ‘अम्मा ब्रँड’ वस्तूंवर भर देत आहे, तर कुणी त्या राज्यातील त्यांच्या लोकप्रियतेवर. कुणी त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत आहे, तर कुणी त्यांच्या सोने, चप्पल जोड, साड्या यांच्याविषयी. लग्न केलेल्या व्यक्तीला कुठलाही संपत्तीचा मोह नसतो, हे भारतीय परंपरेतील सत्य जयललिता यांच्याबाबतीत कसे लागू पडत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांच्या अमाप बेनामी संपत्तीबद्दल त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, पण सरतेशवेटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बा इज्जत बरी केलं.

जयललिता प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने, सोशल मीडियाच्या नजरेतून भ्रष्टाचारी, अहंमन्य आणि स्वत:ला परमेश्वराचा अवतार समजणाऱ्या होत्या, पण त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील हजारो स्त्री-पुरुष स्वत:च्या कुटुंबातील सदस्य गेल्यासारखा शोक करताना टीव्ही दिसत होते. ही त्यांची सर्वसामान्य जनतेमधील लोकप्रियता नोंद घेण्यासारखी आहे.

जयललिता हा भारतीय राजकारणातला एक करिश्मा होता. कुणावर तरी जीव ओवाळून टाकणाऱ्या, प्रेम करणाऱ्या, पण लग्न न करणाऱ्या; स्वत:चं कुटुंब नसलेल्या, पण सर्वसामान्य जनतेविषयी ममत्व असलेल्या; पुरुषांच्या राजकारणात स्वत:चा दरारा निर्माण करणाऱ्या; एकट्या असूनही प्रचंड संपत्ती जमवणाऱ्या, भ्रष्टाचारी असूनही बेहिशोबी लोकप्रियता असणाऱ्या, एका राज्याच्या मुख्यमंत्री असूनही केंद्र सरकारच्या दबावाला बळी न पडणाऱ्या, एकला चलो रे वृत्तीने काम केल्यामुळे आपल्यानंतर नेतृत्वाची दुसरी फळीच तयार न होऊ देणाऱ्या, जयललिता यांचा सुपरस्टार अभिनेत्री ते सुपरस्टार मुख्यमंत्री हा प्रवास चकित करणारा आहे.

आतापर्यंत प्रसारमाध्यमांतून, सोशल मीडियावरून ज्या जयललिता माहीत झाल्या आहेत, त्यापेक्षा वेगळ्या जयललिता पुढील दोन मुलाखतींमधून पाहायला मिळतात. करारी, अहंमन्य, लोकानुनयी, आत्ममग्न वाटणाऱ्या, असणाऱ्या जयललिता यांच्यामध्ये एक संवेदनशील महिला, विचारी राजकारणी आणि पुरुषप्रधान भारतीय राजकारणात महिलांचं स्थान नेमकं कसं आहे, याचं पुरेपूर भान असलेली मुख्यमंत्री कशी होती, हे या मुलाखतींमधून पाहायला मिळतं.

या दोन्ही मुलाखती इंग्रजीमध्ये आहेत. जयललिता यांचं इंग्रजी फ्लॉलेस आणि चांगलं असल्याने या मुलाखतींमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रकाश पडतो. ५ डिसेंबरला रात्री ११-३० जयललिता यांचं निधन झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियावर त्यांच्या दोन मुलाखती चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

त्यातील ही पहिली. सिमी गरेवाल यांनी घेतलेली. गरेवाल समोरच्या व्यक्तीला अतिशय चांगल्या प्रकारे बोलतं करतात. त्यामुळे त्यांच्या मुलाखती या नेहमीच वेगळं काहीतरी देतात. त्यांनी घेतलेल्या जयललिता यांच्या या मुलाखतीमधूनही ते दिसतं. गरेवाल यांनी अतिशय नेमके प्रश्न विचारून जयललिता यांनी बोलतं केलं आहे. फार काही गॉसिप्स, स्कुप्स किंवा वादग्रस्त विधानं काढून घेऊन त्यांचं भांडवल करण्याचा सोस गरेवाल यांना नसतो, याची पुरेपूर खात्री असल्यामुळे जयललिता या मुलाखतीमध्ये अतिशय मनमोकळ्या, ताणरहित आणि खिळाडूवृत्तीच्या दिसतात. आपल्या पहिल्या क्रशपासून ते खाजगी आयुष्याविषयी त्या दिलखुलासपणे बोलल्या आहेत. त्यामुळे या मुलाखतीमधून त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्या ‘अति-संवेदनशील’ असल्याचे दिसते, जाणवते आणि काही प्रमाणात पटतेही.

हा त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, पहिल्या भागाइतकाच चांगला आहे.

ही जयललिता यांची दुसरी मुलाखत. ती घेतली आहे ‘डेव्हिडस अॅडव्होकेट’ म्हटल्या जाणाऱ्या करण थापर यांनी. थापर हे अतिशय नेमके पण भेदक प्रश्न विचारून, समोरच्या व्यक्तीला प्रश्नांच्या सापळ्यात अडकवून त्याच्याकडून हवं ते काढून घेणारे मुलाखतकार मानले जातात. आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ते तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहतात. जयललिता यांच्या या मुलाखतीमध्येही ते पाहायला मिळतेच. त्यामुळेच आधीच प्रसारमाध्यमांविषयी फारसं बरं मत नसलेल्या जयललिता या मुलाखतीमध्ये ‘अलर्ट’ स्थितीमध्ये असलेल्या दिसतात. ‘प्रसारमाध्यमं आपल्याविषयी पूर्वग्रहदूषित का आहेत’ याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं आहे की, ‘मी स्वत:ला घडवलेली स्वतंत्र बाण्याची महिला राजकारणी आहे. त्यामुळे मला इतर महिला राजकारण्यांसारखी कौटुंबिक पार्श्वभूमी नाही.’ प्रसारमाध्यमांनी जयललिता यांची लोकशाहीविरोधी, असमंजस आणि खुनशी अशी प्रतिमा का रंगवली, याचाही त्यांनी खुलासा केला आहे. याच मुलाखतीमध्ये शेवटी त्या म्हणतात की, मी या मुलाखतीच्या दृष्टिकोनाविषयी नाराज आहे. शेवटी तर त्यांनी करण थापर यांना असंही म्हटलं आहे की, “I must say it wasn’t a pleasure talking to you. Namaste.’

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......