जयललिता : दोन मुलाखती, दोन रूपं
संकीर्ण - मुलाखत
टीम अक्षरनामा
  • जयललिता : २४ फेब्रुवारी १९४८ – ५ डिसेंबर २०१६
  • Thu , 08 December 2016
  • जयललिता Jayalalithaa मुख्यमंत्री Chief Minister of Tamil Nadu सिमी गरेवाल Simi Garewal करण थापर Karan Thapar

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता गेल्या. त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा होते आहे. कुणी त्यांच्या ‘अम्मा ब्रँड’ वस्तूंवर भर देत आहे, तर कुणी त्या राज्यातील त्यांच्या लोकप्रियतेवर. कुणी त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत आहे, तर कुणी त्यांच्या सोने, चप्पल जोड, साड्या यांच्याविषयी. लग्न केलेल्या व्यक्तीला कुठलाही संपत्तीचा मोह नसतो, हे भारतीय परंपरेतील सत्य जयललिता यांच्याबाबतीत कसे लागू पडत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांच्या अमाप बेनामी संपत्तीबद्दल त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, पण सरतेशवेटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बा इज्जत बरी केलं.

जयललिता प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने, सोशल मीडियाच्या नजरेतून भ्रष्टाचारी, अहंमन्य आणि स्वत:ला परमेश्वराचा अवतार समजणाऱ्या होत्या, पण त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील हजारो स्त्री-पुरुष स्वत:च्या कुटुंबातील सदस्य गेल्यासारखा शोक करताना टीव्ही दिसत होते. ही त्यांची सर्वसामान्य जनतेमधील लोकप्रियता नोंद घेण्यासारखी आहे.

जयललिता हा भारतीय राजकारणातला एक करिश्मा होता. कुणावर तरी जीव ओवाळून टाकणाऱ्या, प्रेम करणाऱ्या, पण लग्न न करणाऱ्या; स्वत:चं कुटुंब नसलेल्या, पण सर्वसामान्य जनतेविषयी ममत्व असलेल्या; पुरुषांच्या राजकारणात स्वत:चा दरारा निर्माण करणाऱ्या; एकट्या असूनही प्रचंड संपत्ती जमवणाऱ्या, भ्रष्टाचारी असूनही बेहिशोबी लोकप्रियता असणाऱ्या, एका राज्याच्या मुख्यमंत्री असूनही केंद्र सरकारच्या दबावाला बळी न पडणाऱ्या, एकला चलो रे वृत्तीने काम केल्यामुळे आपल्यानंतर नेतृत्वाची दुसरी फळीच तयार न होऊ देणाऱ्या, जयललिता यांचा सुपरस्टार अभिनेत्री ते सुपरस्टार मुख्यमंत्री हा प्रवास चकित करणारा आहे.

आतापर्यंत प्रसारमाध्यमांतून, सोशल मीडियावरून ज्या जयललिता माहीत झाल्या आहेत, त्यापेक्षा वेगळ्या जयललिता पुढील दोन मुलाखतींमधून पाहायला मिळतात. करारी, अहंमन्य, लोकानुनयी, आत्ममग्न वाटणाऱ्या, असणाऱ्या जयललिता यांच्यामध्ये एक संवेदनशील महिला, विचारी राजकारणी आणि पुरुषप्रधान भारतीय राजकारणात महिलांचं स्थान नेमकं कसं आहे, याचं पुरेपूर भान असलेली मुख्यमंत्री कशी होती, हे या मुलाखतींमधून पाहायला मिळतं.

या दोन्ही मुलाखती इंग्रजीमध्ये आहेत. जयललिता यांचं इंग्रजी फ्लॉलेस आणि चांगलं असल्याने या मुलाखतींमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रकाश पडतो. ५ डिसेंबरला रात्री ११-३० जयललिता यांचं निधन झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियावर त्यांच्या दोन मुलाखती चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

त्यातील ही पहिली. सिमी गरेवाल यांनी घेतलेली. गरेवाल समोरच्या व्यक्तीला अतिशय चांगल्या प्रकारे बोलतं करतात. त्यामुळे त्यांच्या मुलाखती या नेहमीच वेगळं काहीतरी देतात. त्यांनी घेतलेल्या जयललिता यांच्या या मुलाखतीमधूनही ते दिसतं. गरेवाल यांनी अतिशय नेमके प्रश्न विचारून जयललिता यांनी बोलतं केलं आहे. फार काही गॉसिप्स, स्कुप्स किंवा वादग्रस्त विधानं काढून घेऊन त्यांचं भांडवल करण्याचा सोस गरेवाल यांना नसतो, याची पुरेपूर खात्री असल्यामुळे जयललिता या मुलाखतीमध्ये अतिशय मनमोकळ्या, ताणरहित आणि खिळाडूवृत्तीच्या दिसतात. आपल्या पहिल्या क्रशपासून ते खाजगी आयुष्याविषयी त्या दिलखुलासपणे बोलल्या आहेत. त्यामुळे या मुलाखतीमधून त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्या ‘अति-संवेदनशील’ असल्याचे दिसते, जाणवते आणि काही प्रमाणात पटतेही.

हा त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, पहिल्या भागाइतकाच चांगला आहे.

ही जयललिता यांची दुसरी मुलाखत. ती घेतली आहे ‘डेव्हिडस अॅडव्होकेट’ म्हटल्या जाणाऱ्या करण थापर यांनी. थापर हे अतिशय नेमके पण भेदक प्रश्न विचारून, समोरच्या व्यक्तीला प्रश्नांच्या सापळ्यात अडकवून त्याच्याकडून हवं ते काढून घेणारे मुलाखतकार मानले जातात. आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ते तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहतात. जयललिता यांच्या या मुलाखतीमध्येही ते पाहायला मिळतेच. त्यामुळेच आधीच प्रसारमाध्यमांविषयी फारसं बरं मत नसलेल्या जयललिता या मुलाखतीमध्ये ‘अलर्ट’ स्थितीमध्ये असलेल्या दिसतात. ‘प्रसारमाध्यमं आपल्याविषयी पूर्वग्रहदूषित का आहेत’ याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं आहे की, ‘मी स्वत:ला घडवलेली स्वतंत्र बाण्याची महिला राजकारणी आहे. त्यामुळे मला इतर महिला राजकारण्यांसारखी कौटुंबिक पार्श्वभूमी नाही.’ प्रसारमाध्यमांनी जयललिता यांची लोकशाहीविरोधी, असमंजस आणि खुनशी अशी प्रतिमा का रंगवली, याचाही त्यांनी खुलासा केला आहे. याच मुलाखतीमध्ये शेवटी त्या म्हणतात की, मी या मुलाखतीच्या दृष्टिकोनाविषयी नाराज आहे. शेवटी तर त्यांनी करण थापर यांना असंही म्हटलं आहे की, “I must say it wasn’t a pleasure talking to you. Namaste.’

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......