टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • जयललिता, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग, नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि डेव्हिड कॅमेरून
  • Thu , 08 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi जयललिता Jayalalithaa अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee मनमोहनसिंग अमित शहा Amit ShahManmohan Singh

१. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला गेला असून त्यामुळे सोमवारी संध्याकाळपासूनच शोक व्यक्त करण्यासाठी तामिळनाडूनमध्ये अनेक दुकाने बंद करण्यात आली. पुढचे तीन दिवस राज्यातील दारूची दुकाने बंद राहणार असल्याचं जाहीर झाल्यामुळे तीन दिवसांची सोय करण्यासाठी नागरिकांनी दुकानांबाहेर लांबलचक रांगा लावल्या आहेत.

मुळात दूध, पाणी, वीज वगैरेंप्रमाणे दारू हीसुद्धा एक जीवनावश्यक वस्तू आहे, हे निर्दय सरकारांच्या लक्षात का येत नाही? दारूची दुकानं खरंतर डे नाइट मेडिकल शॉपप्रमाणे रात्रंदिवस सुरू असली पाहिजेत. शोकाकुल नागरिकांनी दु:ख काय आता नुसत्या थंड पाण्यात किंवा सोड्यात बुडवायचं का? दारूची दुकानं बंद ठेवली तर सगळं राज्य, अगदी द्रमुकचे कार्यकर्तेही त्या शोकसागरात बुडून जातील.  

………………………………

२. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गेल्या वर्षी ब्रिटन दौऱ्यावर गेले असताना ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी त्यांना एका पबमध्ये नेलं होतं. दोन्ही नेत्यांनी मैत्रीपूर्ण गप्पा मारत बिअर प्यायली होती. या भेटीमुळे पब रातोरात प्रसिद्ध झाला आणि सिनो फोर्टोन या चिनी कंपनीने तो २६ लाख डॉलरला विकत घेतला आहे.  

शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले, तर त्यांना कुठे न्यायचं ते ठरवायला हवं आतापासूनच. त्यांना गोशाळा दाखवायला नेलं आणि ती त्यांना पसंत पडली तर काही दिवसांनी एखादी चिनी कंपनी गोशाळा विकत घ्यायची आणि पिवळसर रंगाच्या, मिचमिच्या डोळ्यांच्या, आखूडउंची आणि बहु(पाणीदार)दुधी चिनी गायींच्या दुधाने, गोमूत्राने बाजार भरून जायचा.

………………………………

३. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या भाईंदरहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये, लोकल कुठून कुठे जाणार, कुठे थांबणार वगैरे सांगितल्यानंतर उद्घोषकाने ‘जय हिंद, जय मोदी’ अशी उद्घोषणा केली. ती ऐकून डब्यात हास्याचा एकच कल्लोळ झाला. मात्र, काही प्रवाशांनी रेल्वेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

त्यात तक्रार करण्यासारखं काय आहे? पंतप्रधानांच्या करिश्म्याने जर मुकेश अंबानींसारखा सरकारशी काहीही संबंध नसलेला उद्योगपती (हसू नका हो, खरंच) प्रभावित होऊन देशाच्या सेवेसाठी (किती हसाल?) एक डिजिटल सेवा सुरू करू शकतो, तिची जाहिरात पंतप्रधानांचं छायाचित्र विनापरवानगी वापरून करू शकतो, तर रेल्वे तो वैसेभी 'अपनी दुकान' है!

………………………………

४. निश्चलनीकरणामुळे निवडणुकांमधून काळा पैसा बाहेर गेला असून आता सगळ्या पक्षांसाठी खेळाचे नियम बदलले आहेत. : अमित शाह

मुळात अमित शाह काही बोलू लागले की, राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचे हे तडीपार अध्यक्ष पाहूनच हसू येऊ लागतं, त्यात ते काळा पैसा वगैरे बोलू लागले की अतोनात हसू येऊ लागतं… खेळाचे नियम बदलले आहेत, हे खरंच आहे… पण, ते सगळ्यांसाठी सारखे नाहीत… सत्ताधारी पक्षाने आधीच आपल्याकडच्या काळ्या पैशांची सुयोग्य विल्हेवाट लावलेली आहेच… बाकीच्यांची अवस्था बिकट झाली आहे. पण, ते या खेळातले फार जुने खेळाडू आहेत, हे लवकरच शाहकाकांना कळेलच.

………………………………

५. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आठ टक्के विकासदर होता, तो अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंहांच्या काळात चार टक्क्यांवर आला. मग एकेकाळच्या चहावाल्याने ७.६ टक्क्यांवर नेला. : अमित शाह

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपमुळे रातोरात जे अर्थतज्ज्ञ निर्माण झाले, त्यातले एक राष्ट्रीय अध्यक्षही झाले? कमाल आहे? पूर्वीच्या काळी 'ग्यानबाचं अर्थशास्त्र' अशी एक संकल्पना होती. त्यातला ग्यानबा नेमका कसा दिसत असेल, असा प्रश्न पडायचा. आता तो सुटला?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......