टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • जयललिता, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग, नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि डेव्हिड कॅमेरून
  • Thu , 08 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi जयललिता Jayalalithaa अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee मनमोहनसिंग अमित शहा Amit ShahManmohan Singh

१. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला गेला असून त्यामुळे सोमवारी संध्याकाळपासूनच शोक व्यक्त करण्यासाठी तामिळनाडूनमध्ये अनेक दुकाने बंद करण्यात आली. पुढचे तीन दिवस राज्यातील दारूची दुकाने बंद राहणार असल्याचं जाहीर झाल्यामुळे तीन दिवसांची सोय करण्यासाठी नागरिकांनी दुकानांबाहेर लांबलचक रांगा लावल्या आहेत.

मुळात दूध, पाणी, वीज वगैरेंप्रमाणे दारू हीसुद्धा एक जीवनावश्यक वस्तू आहे, हे निर्दय सरकारांच्या लक्षात का येत नाही? दारूची दुकानं खरंतर डे नाइट मेडिकल शॉपप्रमाणे रात्रंदिवस सुरू असली पाहिजेत. शोकाकुल नागरिकांनी दु:ख काय आता नुसत्या थंड पाण्यात किंवा सोड्यात बुडवायचं का? दारूची दुकानं बंद ठेवली तर सगळं राज्य, अगदी द्रमुकचे कार्यकर्तेही त्या शोकसागरात बुडून जातील.  

………………………………

२. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गेल्या वर्षी ब्रिटन दौऱ्यावर गेले असताना ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी त्यांना एका पबमध्ये नेलं होतं. दोन्ही नेत्यांनी मैत्रीपूर्ण गप्पा मारत बिअर प्यायली होती. या भेटीमुळे पब रातोरात प्रसिद्ध झाला आणि सिनो फोर्टोन या चिनी कंपनीने तो २६ लाख डॉलरला विकत घेतला आहे.  

शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले, तर त्यांना कुठे न्यायचं ते ठरवायला हवं आतापासूनच. त्यांना गोशाळा दाखवायला नेलं आणि ती त्यांना पसंत पडली तर काही दिवसांनी एखादी चिनी कंपनी गोशाळा विकत घ्यायची आणि पिवळसर रंगाच्या, मिचमिच्या डोळ्यांच्या, आखूडउंची आणि बहु(पाणीदार)दुधी चिनी गायींच्या दुधाने, गोमूत्राने बाजार भरून जायचा.

………………………………

३. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या भाईंदरहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये, लोकल कुठून कुठे जाणार, कुठे थांबणार वगैरे सांगितल्यानंतर उद्घोषकाने ‘जय हिंद, जय मोदी’ अशी उद्घोषणा केली. ती ऐकून डब्यात हास्याचा एकच कल्लोळ झाला. मात्र, काही प्रवाशांनी रेल्वेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

त्यात तक्रार करण्यासारखं काय आहे? पंतप्रधानांच्या करिश्म्याने जर मुकेश अंबानींसारखा सरकारशी काहीही संबंध नसलेला उद्योगपती (हसू नका हो, खरंच) प्रभावित होऊन देशाच्या सेवेसाठी (किती हसाल?) एक डिजिटल सेवा सुरू करू शकतो, तिची जाहिरात पंतप्रधानांचं छायाचित्र विनापरवानगी वापरून करू शकतो, तर रेल्वे तो वैसेभी 'अपनी दुकान' है!

………………………………

४. निश्चलनीकरणामुळे निवडणुकांमधून काळा पैसा बाहेर गेला असून आता सगळ्या पक्षांसाठी खेळाचे नियम बदलले आहेत. : अमित शाह

मुळात अमित शाह काही बोलू लागले की, राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचे हे तडीपार अध्यक्ष पाहूनच हसू येऊ लागतं, त्यात ते काळा पैसा वगैरे बोलू लागले की अतोनात हसू येऊ लागतं… खेळाचे नियम बदलले आहेत, हे खरंच आहे… पण, ते सगळ्यांसाठी सारखे नाहीत… सत्ताधारी पक्षाने आधीच आपल्याकडच्या काळ्या पैशांची सुयोग्य विल्हेवाट लावलेली आहेच… बाकीच्यांची अवस्था बिकट झाली आहे. पण, ते या खेळातले फार जुने खेळाडू आहेत, हे लवकरच शाहकाकांना कळेलच.

………………………………

५. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आठ टक्के विकासदर होता, तो अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंहांच्या काळात चार टक्क्यांवर आला. मग एकेकाळच्या चहावाल्याने ७.६ टक्क्यांवर नेला. : अमित शाह

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपमुळे रातोरात जे अर्थतज्ज्ञ निर्माण झाले, त्यातले एक राष्ट्रीय अध्यक्षही झाले? कमाल आहे? पूर्वीच्या काळी 'ग्यानबाचं अर्थशास्त्र' अशी एक संकल्पना होती. त्यातला ग्यानबा नेमका कसा दिसत असेल, असा प्रश्न पडायचा. आता तो सुटला?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......