जयललिता - चित्रमय दर्शन
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • जयललिता : २४ फेब्रुवारी १९४८ – ५ डिसेंबर २०१६
  • Tue , 06 December 2016
  • जयललिता Jayalalithaa मुख्यमंत्री Chief Minister of Tamil Nadu एआयएडीएमके AIADMK India Anna Dravida Munnetra Kazhagam

तमिळ चित्रपटांमधील सुपरस्टार अभिनेत्री ते तमिळनाडूचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या जयललिता यांचा ६८ वर्षांचा प्रवास काहीसा अदभुत म्हणावा असाच होता. ‌वैयक्तिक आयुष्य वादळी, भ्रष्टाचाराचे आरोप, सुडाचे राजकारण, दुराग्रह-हटवादी भूमिका आणि अतिशय लोकानुनयी निर्णय यांमुळे जयललिता सतत चर्चेत राहिल्या. त्यांचा हा प्रवास काही छायाचित्रांचा माध्यमांतून......

जयललिता या उत्तम नृत्यक होत्या. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. मोहिनीअट्टम, कथक आणि मनिपुरी हे नृत्यप्रकारही त्यांना चांगल्या प्रकारे अवगत होते. याशिवाय त्या कर्नाटकी संगीतही शिकल्या होत्या. त्यांच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी गाणीही गायिली आहेत.

जयललिता या बिनबाह्यांचं पोलकं घालणाऱ्या आणि धबधब्याखाली नाचणाऱ्या पहिल्या तमिळ नायिका मानल्या जातात.

वयाच्या १५व्या पंधराव्या वर्षापासून त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला ‘केवळ प्रौढांसाठी’ असे सर्टिफिकेट मिळाले. पण त्यांचा हा पहिला चित्रपट त्यांना सिनेमागृहामध्ये जाऊन पाहता आला नाही, कारण त्या तेव्हा प्रौढ नव्हत्या. जयललिता यांनी ८५ तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील ८० चित्रपट सुपरहिट ठरले. याशिवाय त्यांनी २८ तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले. इज्जत या एकमेव हिंदी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले आहे.

तमिळ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, राजकीय नेते आणि तमिळनाडूचे तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले मरुधुर गोपालन रामचंद्रन (एमजीआर) यांच्यासोबत जयललिता यांनी अनेक चित्रपट केले. ते सुपरहिट ठरले. पुढे रामचंद्रन राजकारणात गेले, तेव्हा त्यांनी जयललिता यांचाही राजकारणात प्रवेश करवला. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी एमजीआर यांनी एडीएमके हा नवीन पक्ष स्थापन केला. पुढे एमजीआर आणि जयललिता यांच्या संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले. एमजीआर यांनी जयललिता यांचं इंग्रजी चांगलं असल्यामुळे त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. त्यांनी पक्षाचे प्रचार सचिवही बनवले. पण नंतर त्यांना पक्षातूनच इतका विरोध जाला की, एमजीआर यांनी त्यांना या पदावरून हटवावं लागलं.

१४० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ८ वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. एक वेळ राज्यसभेवर नियुक्ती झाली आणि चार वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या.

१९९१मध्ये जयललिता पहिल्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा त्यांचं वय ४० होतं. त्यानंतर त्या २००१, २००२ आणि २०११मध्ये मुख्यमंत्री झाल्या.

१९७२साली तामिळनाडू सरकारने जयललिता यांना त्यांच्या कला, नृत्य आणि चित्रपट या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल कलाईमामानी या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

जयललिता यांच्याकडे दोन हजार एकर जमीन, ३० किलो सोने आणि १२ हजार साड्या होत्या. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या जनरल सेक्रेटरी असलेल्या जयललिता यांनी त्यांचे समर्थक ‘अम्मा’ (आई) आणि ‘पुराथ्ची थालैवी’ (क्रांतिकारी नेता) म्हणत.

एक सक्षम नेत्या मानल्या जात. त्यांचे मंत्री त्यांच्यासमोर उभे राहताना थरथर कापत. आपल्या मंत्र्यांनाही त्या फारशा भेटत नसत.

ग्राइंडर, मिक्सर, तांदूळ यांसारख्या वस्तू जनसामान्यांना मोफत वाटण्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......