जयललिता - चित्रमय दर्शन
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • जयललिता : २४ फेब्रुवारी १९४८ – ५ डिसेंबर २०१६
  • Tue , 06 December 2016
  • जयललिता Jayalalithaa मुख्यमंत्री Chief Minister of Tamil Nadu एआयएडीएमके AIADMK India Anna Dravida Munnetra Kazhagam

तमिळ चित्रपटांमधील सुपरस्टार अभिनेत्री ते तमिळनाडूचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या जयललिता यांचा ६८ वर्षांचा प्रवास काहीसा अदभुत म्हणावा असाच होता. ‌वैयक्तिक आयुष्य वादळी, भ्रष्टाचाराचे आरोप, सुडाचे राजकारण, दुराग्रह-हटवादी भूमिका आणि अतिशय लोकानुनयी निर्णय यांमुळे जयललिता सतत चर्चेत राहिल्या. त्यांचा हा प्रवास काही छायाचित्रांचा माध्यमांतून......

जयललिता या उत्तम नृत्यक होत्या. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. मोहिनीअट्टम, कथक आणि मनिपुरी हे नृत्यप्रकारही त्यांना चांगल्या प्रकारे अवगत होते. याशिवाय त्या कर्नाटकी संगीतही शिकल्या होत्या. त्यांच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी गाणीही गायिली आहेत.

जयललिता या बिनबाह्यांचं पोलकं घालणाऱ्या आणि धबधब्याखाली नाचणाऱ्या पहिल्या तमिळ नायिका मानल्या जातात.

वयाच्या १५व्या पंधराव्या वर्षापासून त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला ‘केवळ प्रौढांसाठी’ असे सर्टिफिकेट मिळाले. पण त्यांचा हा पहिला चित्रपट त्यांना सिनेमागृहामध्ये जाऊन पाहता आला नाही, कारण त्या तेव्हा प्रौढ नव्हत्या. जयललिता यांनी ८५ तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील ८० चित्रपट सुपरहिट ठरले. याशिवाय त्यांनी २८ तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले. इज्जत या एकमेव हिंदी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले आहे.

तमिळ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, राजकीय नेते आणि तमिळनाडूचे तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले मरुधुर गोपालन रामचंद्रन (एमजीआर) यांच्यासोबत जयललिता यांनी अनेक चित्रपट केले. ते सुपरहिट ठरले. पुढे रामचंद्रन राजकारणात गेले, तेव्हा त्यांनी जयललिता यांचाही राजकारणात प्रवेश करवला. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी एमजीआर यांनी एडीएमके हा नवीन पक्ष स्थापन केला. पुढे एमजीआर आणि जयललिता यांच्या संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले. एमजीआर यांनी जयललिता यांचं इंग्रजी चांगलं असल्यामुळे त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. त्यांनी पक्षाचे प्रचार सचिवही बनवले. पण नंतर त्यांना पक्षातूनच इतका विरोध जाला की, एमजीआर यांनी त्यांना या पदावरून हटवावं लागलं.

१४० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ८ वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. एक वेळ राज्यसभेवर नियुक्ती झाली आणि चार वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या.

१९९१मध्ये जयललिता पहिल्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा त्यांचं वय ४० होतं. त्यानंतर त्या २००१, २००२ आणि २०११मध्ये मुख्यमंत्री झाल्या.

१९७२साली तामिळनाडू सरकारने जयललिता यांना त्यांच्या कला, नृत्य आणि चित्रपट या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल कलाईमामानी या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

जयललिता यांच्याकडे दोन हजार एकर जमीन, ३० किलो सोने आणि १२ हजार साड्या होत्या. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या जनरल सेक्रेटरी असलेल्या जयललिता यांनी त्यांचे समर्थक ‘अम्मा’ (आई) आणि ‘पुराथ्ची थालैवी’ (क्रांतिकारी नेता) म्हणत.

एक सक्षम नेत्या मानल्या जात. त्यांचे मंत्री त्यांच्यासमोर उभे राहताना थरथर कापत. आपल्या मंत्र्यांनाही त्या फारशा भेटत नसत.

ग्राइंडर, मिक्सर, तांदूळ यांसारख्या वस्तू जनसामान्यांना मोफत वाटण्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......