पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजमनाला लेखणीत पकडणारा कथासंग्रह
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
संजय रेंदाळकर
  • ‘सविनय अस्वस्थ’
  • Fri , 10 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस साहिल शेख Sahil Shaikh सविनय अस्वस्थ Savinay Aswastha

काहीसं वेगळ्या संदर्भांना व परिवेशाला कवेत घेणारं नाव म्हणजे साहिल शेख. राहणार कुरुंदवाड. नरसोबावाडीजवळ. ‘फॉर्मलेस’ या पुस्तकानंतरचं  साहिलचं हे नवं पुस्तकं- ‘सविनय अस्वस्थ’. अलीकडे सोशल मीडियावर व्यस्त असताना, एखादं पुस्तक एका बैठकीत वाचून काढावं असं घडत नसताना, ते घडलं या ‘सविनय अस्वस्थ’मुळे. पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजमनाला लेखणीत पकडणारा हा कथासंग्रह आहे.

१४ कथांचं हे पुस्तक फक्त ९६ पानांचं आहे. हे पुस्तक अर्पण केलं आहे ते ‘प्रश्न पडणाऱ्या प्रत्येकाला’. शुद्धलेखनाच्या चुका आशयाच्या समोर क्षमापात्र ठरतात. पण काळजी घ्यायला हवी. श्रीरंग मोरे व गंगाधर म्हमाने यांची रेखाचित्रं पुस्तकाला अर्थगर्भ बनवतात. खरं तर मुखपृष्ठावरील पोत्यात भरलेली पुस्तकं माझ्यासारख्या वाचकाला अस्वस्थ करण्यात यशस्वी ठरली. वस्तुस्थिती अशी आहे की, आज आपलं ज्ञान, शहाणपण बांधून ठेवायला बाध्य करणारी यंत्रणा उभी राहिली आहे.

या कथा सहज भाषेत लिहिल्या आहेत. इतकी संवादी भाषा अलीकडे इतक्या लीलया वापरलेली दिसत नाही. प्रत्येक कथा वाचल्यावर पोटात खड्डा पडतोय की, काय अशी अवस्था तयार होते. यातील ‘अनसेड’ कथेचा शेवट ‘तिला परंपरेनं मारलं रे’ या वाक्यानं करताना जो परिणाम साधला आहे तो अप्रतिमच. धक्कातंत्राच्या पलीकडच्या काठावर नेणारं असं ते आहे. ‘कबनूर-कोल्हापूर’ कथेतही तेच जाणवतं. हे कुठंतरी आत भिडणारं आहे, यात वाद नाही.

‘भैरवी’तील कोवळ्या प्रेमाचं टेक्स्चर मनाला जाणवतं आणि एक अलवार गुज बराच वेळ कानाशी रेंगाळत राहतं. ‘नाळबंध’ तर करकरणाऱ्या दरवाजाप्रमाणे अस्वस्थतेची आंदोलनं मनात निर्माण करत राहते आणि काही चक्रं ऋतुचक्राप्रमाणे सुरूच राहतात असं वाटण्यास मजबूर करते. पण सोबतच समाजाच्या पांढरपेशीपणाच्या चिंध्या उडालेल्या असतात. ‘ओली बाळंतीण’ दिखाऊ स्त्रीवादाचा चांगलाच समाचार घेत अंतर्मुख करणारी कथा आहे.

‘पॉज’ ही कथा विवाहित ‘एकटी’चा विरह आपल्या डोळ्यासमोर उभा करतो आणि पैशामागे धावण्याचा फोलपणाही गडद करतो. ‘अरूपा’मध्ये कथेतील छोटी कथा जी मांजराच्या पिलाचं वागणं त्या तरुणीच्या इच्छांच्या अपूर्णतेशी जोडते, ती आपल्या घराजवळील अरूपासमोरच आपल्याला उभं करते. ‘वेदनांचा क्रूस खांद्यावर घेणारा प्रत्येक जण येशू होतोच असं नाही’ या वाक्यानं सुरू झालेली ‘करुणा’ कथा अनाथ मुलीचं दुःख त्रयस्थपणे मांडते खरी; पण आपण मात्र त्या वेदनेला आपली मानून विव्हळत राहतो.

साऱ्या कथांमध्ये मध्यवर्ती पात्र महिला असताना ‘गोलघुमट’ कथेत सॅमची घुसमट देशातील बहुसंख्य वर्गाची छुपी दडपशाही उघड करते आणि सहिष्णुता दूर उन्हात उभी असल्याचा भास होत राहतो. म्हातारीचं मरणं व सोकावलेला काळ व त्यानंतरचं बिघडत गेलेलं समाजवास्तव अंगावर काटा आणतं. समाजाचं वस्त्र फाटत जाऊन चिंध्या चिंध्या होताहेत आणि आपण हे टक्क डोळ्यांनी निमूटपणे पाहतोय, असं दुःस्वप्न समोर साकार होताना आतून तुटायला सुरुवात होते.

दंगली माणुसकीच्या शत्रू असतानाही दंगलीचे मोहोळ उठवून आपली तुंबडी भरणारे कोणालाही दिसत नाहीत, पण काहीजण आयुष्यातून उठतात आणि त्यांच्याकडे मात्र डोळेझाक केली जाते. उलट बाजूला धर्ममुश्तंड्यांची ‘बरकत’ होते, चलती सुरू होते हे ‘बरकत’चं कथासूत्र. ‘लोडशेडिंग’ कथा ही करुण रसाचा अर्क वाटते. यात गरिबीचा लोड व दुःखाचं शेडिंग व्यापून राहिल्याचं जाणवतं. मुस्लीम समाजाचे गांजलेपण अधोरेखित करताना कुठलाही अतिरेक दिसत नाही, कल्पनारम्यता नाही, आहे ते केवळ आणि केवळ सत्य.

थोडीशी अॅबसर्डिटीकडे झुकलेली ‘एवढीशी कथा’ एवढीशी न राहता हैराण करते. दोन-तीन वेळा वाचूनही समाधान होत नाही. लेखकाचा तर कुठे हट्ट असतो की, ते एखाद्यानं वाचलं की समजलंच पाहिजे असा. कारण समजणं, उमजणं या व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत.

मुस्लीम समाज आजच्या भयानक वर्तमानात किती कशी  अस्वस्थता अनुभवतोय. दुय्यम वागणुकीची खेळी कुठल्याही विचार प्रणालीतून, छावणीतून पद्धतशीर पसरवली जातेय, त्याचा कहर होतोय. मात्र याला तितक्याच संयतपणे, आकांडतांडव न करता जसं जमेल तसं आतून उसवून हा लेखक आपली प्रातिनिधिक अस्वस्थता मांडत राहतो, तीही सविनय. त्याचा प्रत्यय हा कथासंग्रह देतो आणि ही सविनय अस्वस्थताच आपल्याला एकसंध ठेवते.

"

सविनय अस्वस्थ"- हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

ramesh singh

Fri , 10 August 2018

पुस्तकाचे प्रकाशन, किंमत, शक्य झाल्यास त्यांचा संपर्क, इत्यादी तपशील अशा परीक्षणासोबत देणे सयुक्तित ठरले असते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......