टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोदी, मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प
  • Sat , 03 December 2016
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Moi मोबाईल बँकिंग Mobile Banking रिलायन्स जिओे Reliance Jio डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. आपण सर्व मोबाईल बँकिंग आणि मोबाईल वॉलेट्सच्या युगात आहोत. जेवण मागवणं, फर्निचर विकत घेणं, टॅक्सी मागवणे या सर्वच गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतात. तंत्रज्ञानामुळे सर्व काही सुखकर आणि वेगवान झालं आहे. : 'लिंक्ड इन'साठी लिहिलेल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी.

जिथं पिण्याचं पाणीही आयाबायांना अनेक मैलांवरून डोक्यावरून वाहून आणावं लागतं आणि लाइटही दिवसातून १२-१५ तास गायब असते, अशा आमच्या दुर्गम खेड्यांतल्या आणि आदिवासी पाड्यांतल्या बांधवांना इंग्रजी वाचता येत नाही, हे केवढं मोठं भाग्य! नाहीतर त्यांनी पंतप्रधान मोदी ज्या देशात राहतात, त्याच देशात ‘घेऊन चला’ राहायला, असा हट्ट धरला असता आणि पंचाईत झाली असती!

…………………………..

२. सरकारी कर्मचाऱ्यांचं नोव्हेंबर महिन्याचं वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन रोखीनं देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली नाहीच; उलट बँकांमध्ये गर्दी करू नका, गरज असेल तेव्हा आणि आवश्यकता असेल तेवढेच पगारातील पैसे काढा, असा सल्लाही राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

सरकारचाही दोष नाही. मुळात एखाद्या कर्मचाऱ्याला तसाच काही अडीअडचणीचा प्रसंग असल्याखेरीज पगाराचे पैसे काढायलाच का लागावेत, असा मूलभूत प्रश्न त्यांना पडलेला असू शकतो ना!

…………………………..

३. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रिलायन्स जिओच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, फोटो वापरला जाणार आहे, याची सरकारला कल्पना होती.

अंबानी काय, अडाणी काय, सरकार काय, सगळे एकच! भारत सगळा एक आहे, सगळेच आपले बांधव आहेत. वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत होतंच की! त्याचा कोणी हिशोब करतं का?

…………………………..

४. मोदी हे आमचेही पंतप्रधान आहेत. त्यांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलं आहे आणि मीही त्यामुळे प्रेरित झालो आहे. आम्ही या भारतीय नेत्याचं स्वप्न, भारत आणि भारतीयांना आमची सेवा समर्पित करत आहोत आणि त्यामुळेच जिओच्या जाहिरातीत मोदींचा फोटो वापरण्यात काहीही राजकीय नाही : मुकेश अंबानी.

मोदी हे 'आमचेही' पंतप्रधान आहेत, हे वाक्य मनोज्ञ आहे… त्यापुढचं 'एकट्या अडाणींचे नाहीयेत काही' हे अनुच्चारित वाक्यही कसं स्पष्टपणे ऐकू येतं की नाही? बाकी अंबानी देशाची सेवा करतात, म्हटल्यावर देशात २७ मजली (अंबानींच्या अँटिलियाच्या उंचीइतकं) हास्यस्फोट झाला म्हणे!

…………………………..

५. पाकिस्तान हा विस्मयकारक देश आहे. इथली जनता सुज्ञ आणि हुशार आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा चांगला नावलौकिक आहे, त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : डोनाल्ड ट्रम्प.

तात्यांच्या विजयानिमित्त सत्यनारायण घालणारे आणि यज्ञयाग करणारे आता समोर आले की, फुटपाथ बदलतात… मुंगसानं कितीही आकर्षक डिस्को डान्स करून दाखवला, तरी गारुडी सापालाच दूध पाजतो.

editor@aksharnama.com

Post Comment

Nilesh Sindamkar

Sat , 03 December 2016

रोजच्या रोज इतकं तिरकस, उपरोधिक, धमाल विनोदी लेखन करणं खरंच खुप अवघड गोष्ट आहे... या स्तंभ लेखकाचं खुप खुप कौतुक आणि आभार... !!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......