टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोदी, मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प
  • Sat , 03 December 2016
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Moi मोबाईल बँकिंग Mobile Banking रिलायन्स जिओे Reliance Jio डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. आपण सर्व मोबाईल बँकिंग आणि मोबाईल वॉलेट्सच्या युगात आहोत. जेवण मागवणं, फर्निचर विकत घेणं, टॅक्सी मागवणे या सर्वच गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतात. तंत्रज्ञानामुळे सर्व काही सुखकर आणि वेगवान झालं आहे. : 'लिंक्ड इन'साठी लिहिलेल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी.

जिथं पिण्याचं पाणीही आयाबायांना अनेक मैलांवरून डोक्यावरून वाहून आणावं लागतं आणि लाइटही दिवसातून १२-१५ तास गायब असते, अशा आमच्या दुर्गम खेड्यांतल्या आणि आदिवासी पाड्यांतल्या बांधवांना इंग्रजी वाचता येत नाही, हे केवढं मोठं भाग्य! नाहीतर त्यांनी पंतप्रधान मोदी ज्या देशात राहतात, त्याच देशात ‘घेऊन चला’ राहायला, असा हट्ट धरला असता आणि पंचाईत झाली असती!

…………………………..

२. सरकारी कर्मचाऱ्यांचं नोव्हेंबर महिन्याचं वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन रोखीनं देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली नाहीच; उलट बँकांमध्ये गर्दी करू नका, गरज असेल तेव्हा आणि आवश्यकता असेल तेवढेच पगारातील पैसे काढा, असा सल्लाही राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

सरकारचाही दोष नाही. मुळात एखाद्या कर्मचाऱ्याला तसाच काही अडीअडचणीचा प्रसंग असल्याखेरीज पगाराचे पैसे काढायलाच का लागावेत, असा मूलभूत प्रश्न त्यांना पडलेला असू शकतो ना!

…………………………..

३. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रिलायन्स जिओच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, फोटो वापरला जाणार आहे, याची सरकारला कल्पना होती.

अंबानी काय, अडाणी काय, सरकार काय, सगळे एकच! भारत सगळा एक आहे, सगळेच आपले बांधव आहेत. वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत होतंच की! त्याचा कोणी हिशोब करतं का?

…………………………..

४. मोदी हे आमचेही पंतप्रधान आहेत. त्यांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलं आहे आणि मीही त्यामुळे प्रेरित झालो आहे. आम्ही या भारतीय नेत्याचं स्वप्न, भारत आणि भारतीयांना आमची सेवा समर्पित करत आहोत आणि त्यामुळेच जिओच्या जाहिरातीत मोदींचा फोटो वापरण्यात काहीही राजकीय नाही : मुकेश अंबानी.

मोदी हे 'आमचेही' पंतप्रधान आहेत, हे वाक्य मनोज्ञ आहे… त्यापुढचं 'एकट्या अडाणींचे नाहीयेत काही' हे अनुच्चारित वाक्यही कसं स्पष्टपणे ऐकू येतं की नाही? बाकी अंबानी देशाची सेवा करतात, म्हटल्यावर देशात २७ मजली (अंबानींच्या अँटिलियाच्या उंचीइतकं) हास्यस्फोट झाला म्हणे!

…………………………..

५. पाकिस्तान हा विस्मयकारक देश आहे. इथली जनता सुज्ञ आणि हुशार आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा चांगला नावलौकिक आहे, त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : डोनाल्ड ट्रम्प.

तात्यांच्या विजयानिमित्त सत्यनारायण घालणारे आणि यज्ञयाग करणारे आता समोर आले की, फुटपाथ बदलतात… मुंगसानं कितीही आकर्षक डिस्को डान्स करून दाखवला, तरी गारुडी सापालाच दूध पाजतो.

editor@aksharnama.com

Post Comment

Nilesh Sindamkar

Sat , 03 December 2016

रोजच्या रोज इतकं तिरकस, उपरोधिक, धमाल विनोदी लेखन करणं खरंच खुप अवघड गोष्ट आहे... या स्तंभ लेखकाचं खुप खुप कौतुक आणि आभार... !!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......