टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • श्री श्री रविशंकर, सुधीर मुनगंटीवर, शत्रुघ्न सिन्हा आणि मोदी अॅप
  • Fri , 25 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi शत्रुघ्न सिन्हा Shatrughan Sinha श्री श्री रविशंकर Sri Sri Ravi Shankar

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाबद्दल मला आनंद आहे. नोटाबंदीच्या निर्णयामागे सरकारचा उदात्त हेतू असून त्यासाठी लोक त्रास सहन करायला आहेत : श्री श्री रविशंकर

एखाद्या निर्णयाने तुम्हाला आनंद आहे म्हटल्यावर तो निर्णय उदात्त असणार आणि जगभरातले लोक, अगदी इग्लूमध्ये राहणारे एस्किमोही गैरसोय सहन करायला तयार असणार, हे उघडच आहे. सगळ्या देशातल्या लोकांच्या मनात काय चाललंय, ते एका फटक्यात कळण्याची सिद्धी इतर कोणाला झाली असती, तर 'घेतलीमध्ये बोलतोय' म्हणायची सोय असते; तुम्हाला तर त्या उन्मनी अवस्थेला जायला श्वासही 'घेणे' पुरत असणार.

.................

२. केंद्र सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे बिकट अवस्था झाल्याने नोव्हेंबर व डिसेंबरचा दोन महिन्यांचा पगार तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन रोखीने द्यावे, अशी मागणी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी केली आहे. या मागणीची दखल घेतल्याचे राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून पुढील एक-दोन दिवसांत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

घ्या आता! तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांनाच कॅशलेस इकॉनॉमीचं महत्त्व पटवून देऊ शकत नसाल, तिची सवय त्यांना लावू शकत नसाल, तर तुमचं नाक दाबण्याची शक्ती नसलेल्या सर्वसामान्य जनतेला उपदेशाचे डोस का पाजताहात? अर्थात, सामान्य जनतेकडे कॅश नसल्याचा सर्वात मोठा फटका सरकारी कर्मचाऱ्यांनाच बसला असणार, यात मात्र शंका नाही.

.................

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा सर्व्हे प्लँटेड होता; लोकांना होणाऱ्या त्रासाची नोंद घ्या आणि मूर्खांच्या नंदनवनातून बाहेर या : शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर

अरे, यांना पाकिस्तानात पाठवा कोणीतरी. किमानपक्षी काँग्रेसमध्ये तरी रवानगी करा. देशबदलाच्या उदात्त यज्ञकार्यात असुरासारखे अडथळे आणताहेत हे. कोणीतरी म्हणा त्यांना खामोश!! शिवाय ज्या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या सुमर्यादित, सुनिश्चित, सुसंस्कारित यंत्रकुशल प्रजेलाही पंतप्रधानांशी संपूर्णपणे असहमत असण्याचा पर्याय ठेवलेला नव्हता, तो फिक्स्ड होता, हे सांगायला 'भाजपचा शत्रू' कशाला हवा?

.................

४. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अटकेच्या काळात ६० दिवस काढले हॉस्पिटलमध्येच

त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना घरी हलवून घरातच छोटंसं हॉस्पिटल चालवणं अवघड नाही. रोज दोन पोलिस सकाळ-दुपार त्यांच्या घरी हजेरी द्यायला पाठवायचे. जसजशी केस पुढे सरकेल, तसतसे वकील आणि न्यायाधीशही एका खोलीत बसून सुनावणी करू शकतील.

.................

५. पंतप्रधानांच्या अॅप-आधारित सर्वेक्षणात पाच लाख लोकांचा सहभाग; ९३ टक्के जनतेचा मोदींना पाठिंबा

आता अॅप डेव्हलप झालंच आहे, तर लगेहाथ सर्व्हे घेऊन मोदी पुढची १५ वर्षं पंतप्रधानपदावर हवे आहेत, असा लाडिक हट्टही वदवून घ्यावा. संसद बरखास्त करून टाकावी. मंत्रिमंडळातले इतर मंत्री तर असेही काही कामाचे नाहीत. त्यांना शेती, व्यापार वगैरे करायला पाठवून दयावं. होऊ दे खर्च, अॅप आहे घरचं.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......