दर्यागंज संडे बुक मार्केटमध्ये ‘ऐतिहासिक’ वास्तूंसारखीच ‘ऐतिहासिक बात’ आहे!
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
नरेंद्र बंडबे
  • दर्यागंज संडे बुक मार्केट. लेखातील सर्व छायाचित्रं नरेंद्र बंडबे यांची आहेत.
  • Mon , 23 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April नरेंद्र बंडबे Narendra Bandabe

दिल्लीला आल्यापासून वेगवेगळ्या जागा शोधण्याचा चंग सुरू आहे. लिस्ट मुंबईतच बनली होती, पण त्यामध्ये दर्यागंजचं संडे बुक मार्केट नव्हतं. त्याबद्दल इथं आल्यावर समजलं. दिल्ली म्हटलं की, यादीत सर्व पुरातन वास्तू असतात. लालकिल्ल्यापासून कुतुब मिनारपर्यंत. पर्यटकांची प्रचंड गर्दी असते या ठिकाणी. या यादीत हे बुक मार्केट कुठेच नसतं. दिल्लीत काही दिवस स्थायिक झाल्यानंतर तुम्ही पुस्तक प्रेमी असाल तर हे नाव तुमच्या कानी पडतं. 

दिल्लीत पुस्तकं घ्यायची असतील तर दोन जागा खास आहेत. पहिली खान मार्केट, आणि दुसरी दर्यागंज संडे बुक मार्केट. खान मार्केट हे पुस्तकांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. शिवाय स्पा, फुड कोर्ट, ज्वेलर्सची दुकानं असं भरपूर तिथ आहे. खान मार्केट म्हणजे दिल्लीतली दक्षिण मुंबई. इथं खास करून इंग्रजी पुस्तकाची दुकानं आहेत. काही ठिकाणी हिंदी पुस्तकंही मिळतात. प्लॅस्टिकच्या कवरमध्ये रचलेले पुस्तकांचे ढिग इथं दिसतात. तुम्हाला हवं ते पुस्तक विकत घेण्यासाठी मदतीला माणसं असतात. ही सर्व पुस्तकांची दुकानं एसी आहेत. पॉश गाडीतून येणारे पुस्तकप्रेमी तिथं अनेक लेखकांवर गप्पा मारताना भेटतात. दिल्लीत वाचकांची संख्या चांगली आहे. मुंबईतल्या ‘किताबखाना’ एवढं मोठं दुकान नसलं तरी छोटी-मोठी अनेक पुस्तकांची दुकानं इथं आहेत. मुख्य म्हणजे तिथं गर्दीही असते. 

पण दर्यागंज संडे बुक मार्केटची बातच काही और आहे. मुंबईला हुतात्मा चौकासमोर जसे रस्त्यावर पुस्तकांचे स्टॉल असायचे, तसंच आहे हे बुक मार्केट. पण हे मार्केट दीड-दोन किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे. ते फक्त रविवारीच भरतं. कारण या परिसरात बँका आणि सरकारी कार्यालयं आहेत. रविवारी ती बंद असतात. म्हणून बाहेरच्या रस्त्यावर हा पुस्तकांचा आठवडी बाजार भरतो. कोलकात्ताचा कॉलेज स्ट्रीटस, मद्रासमधलं मूर मार्केट, हैद्राबाद कोटी बुक मार्केट आणि मुंबईतल्या फाऊंटनमधील पुस्तकांचे स्टॉल्स यांपेक्षा कितीतरी मोठं आहे, हे बुक मार्केट. 

या बुक मार्केटची सुरुवात कधी झाली हे कुणाला सांगता येत नाही. अनेकांना विचारलं तर ते सांगतात खूप आधीपासून हा पुस्तकांचा बाजार भरतो. या मार्केटची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे इथं जगातली सर्व इंग्रजी पुस्तकं मिळू शकतात. तेही अगदी २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत. सर्वांत जास्त पुस्तकं ही शैक्षणिक आहेत. अगदी केजीपासून मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बीएस्सी आणि अकाउंटिंगची पुस्तकं इथं रस्त्यावर अगदी कमी किमतीत मिळतात. स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा तर खच पडलेला असतो. या पुस्तकांना जास्त मागणीही असते.

अतुलकुमार सिंघवी गेल्या १५ वर्षांपासून इथं आपला पुस्तकांचा स्टॉल लावतायत. आता तर त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत येतोय. अतुलकुमार सांगतात, “मला माहीत नाही कसं सुरू झालं मार्केट, पण इथं काही पब्लिशिंग हाऊसेस आहेत. ती रविवारी बंद असतात. तिथं नवीन पुस्तकं मिळतात. म्हणून कदाचित हा सेकंड हँड पुस्तकांचा बाजार वाढला असावा. इथली ७० टक्के पुस्तकं ही वापरलेली असतात. त्यात इंग्रजी जास्त आहेत. हिंदी किंवा इतर भाषेतल्या पुस्तकांची संख्या फारच कमी असते.” 

सकाळी आठ वाजल्यापासून पुस्तकांचे स्टॉल्स लावायला सुरुवात होते. बंद असलेल्या बँका, सरकारी कार्यालयांचे व्हरांडे या पुस्तकांनी भरू लागतात. काही जण तर टेम्पोतून ही पुस्तकं आणतात. १० वाजण्याच्या आसपास पुस्तकांचा हा आठवडी बाजार चांगलाच फुलतो. लहान मुलं आई-बाबांचा हात पकडून शाळेची पुस्तकं शोधताना दिसतात, तर पुस्तकप्रेमी एकामागून एक स्टॉल सावकाश पार करताना दिसतात. संपूर्ण मार्केटमध्ये जर आपल्या आवडीचं पुस्तक शोधायचं असेल, तर त्यासाठी अडीच-तीन तास खर्च करावे लागतात. कारण पुस्तकांच्या ढिगातून आपलं पुस्तक शोधणं जरा कठीणच होतं. छोटे-मोठे सुमारे ७० स्टॉल्स इथं लागतात. सुमारे दोन-तीन किलोमीटरचा हा परिसर रविवारी पुस्तकांनी भरतो आणि ती घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होते. 

हे बुक मार्केट इंग्रजी क्लासिक पुस्तकांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. काफ्कापासून लॉरेन्स, विलियम्स थॅकरे, सर्व इथं मिळतात. अगदी अलीकडचे लेखकही मिळतात. त्यामुळे क्लासिक शोधणाऱ्यांसाठी क्लासिक आणि कंटेम्पररी चाहत्यांसाठी त्यांच्या आवडीची पुस्तकं. असं तीन पिढ्यांचं वाचनाचं वेड भागवेल, असं सर्व काही या बुक मार्केटमध्ये आहे. त्यामुळं इथली दर्दींची गर्दी आठवड्यागणिक वाढतेय. 

दिल्लीच्या ग्रेटर कैलासमधून आलेले रोशन चतुर्वेदी इथं भेटले. ते म्हणाले “काफ्काचं ‘द कॅसेल’ २० रुपयात आणि ब्लादिमीर नोबोकोवची ‘लोलिता’ ५० रुपयांत जगात दुसरीकडे कुठे मिळेल का? मी दर आठवड्याला या क्लासिक पुस्तकांच्या शोधात इथं येतो. वाचणारा माणूस वेडा होईल इतकी पुस्तकं इथं आहेत.”

हे इतकं मोठं मार्केट इथं कसं उभं राहिलं असेल याचा जरा जास्त शोध घेतला तर समजलं की, दिल्लीत पायरेटेड पुस्तकाचं मोठं रॅकेट आहे. कुठलंही नवीन पुस्तक आलं की, अगदी त्याच दिवशी त्याची पायरेटेड कॉपी मिळू शकते. हे रॅकेट या मार्केटला माल पुरवतं. काही जण रद्दीत दिलेली पुस्तकं आणि नियतकालिकं विकायला येतात.

काही मिळत नाही असं नाही, फक्त शोधावं खूप लागतं. खूप घासाघीसही करावी लागते. अगदी भाजी मार्केटमध्ये करतो तशी, तरच पुस्तकं कमी भावात मिळू शकतात. काही ठिकाणी ‘फिक्स रेट’चा बोर्डही दिसतो. पण एक मात्र नक्की, एकदा का तुम्ही या मार्केटमध्ये शिरलात आणि तुम्हाला वाचनाची आवड असेल तर हे मार्केट तुमचं आहे. पुढचे काही तास तुम्ही इथून बाहेरच पडू शकत नाही. 

दिल्ली गेट मेट्रो स्टेशनच्या ३ नंबर एक्सिट पॉइंटला हे मार्केट सुरू होतं, ते असगर अली स्ट्रीटच्या अगदी टोकावर असलेल्या डिलाईट सिनेमापर्यंत. इथं सकाळी जशी मार्केट भरण्याची लगबग असते, तशीच संध्याकाळी टेम्पोची गर्दी होते. पुस्तकांची गाठोडी टेम्पोत टाकली जातात. पुढच्या रविवारी परत येण्यासाठी. 

दिवसभरात इथला प्रत्येक स्टॉलधारक साधारणत: किमान २००० ते ५००० पर्यंतचा गल्ला कमावतो. दोन महिन्यापूर्वी या बुक मार्केटवर महानगरपालिकेची करडी नजर पडली. तब्बल पाच आठवडे मार्केट बंद होतं. तेव्हा सोशल मीडियावर ‘सेव्ह संडे बुक मार्केट’चा ट्रेड सुरू झाला होता. दिल्लीसारख्या शहरात काहीच आलबेल नसताना फक्त रविवारी भरणाऱ्या या मार्केटवर पालिकेची नजर का, असा एक मोठा मतप्रवाह तयार झाला. शेवटी पाच आठवड्यानंतर मार्केट पुन्हा सुरू झालं. पालिका पुस्तकप्रेमींच्या दबावाला झुकली आणि वाचणाऱ्यांचा अखेर विजय झाला!

दिल्लीला तुम्ही कधी आलात तर रविवारी या बुक मार्केटला आवर्जून भेट द्या. कारण या बुक मार्केटमध्ये दिल्लीतल्या इतर ‘ऐतिहासिक’ वास्तूंसारखीच ‘ऐतिहासिक’ बात आहे!  

.............................................................................................................................................

लेखक नरेंद्र बंडबे झी मीडियामध्ये कार्यरत असून आंतरराष्ट्रीय फिल्म क्रिटिक असोसिएशन FRIPRESCI चे सदस्य आहेत.

narendrabandabe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Thu , 26 April 2018

महत्वाची माहिती.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......