टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, सोनिया-राहुल गांधी आणि अनिल बोकील
  • Wed , 23 November 2016
  • टपल्या Taplya उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सोनिया गांधी Soniya Gandhi राहुल गांधी Rahul Gandhi अनिल बोकील Anil Bokil

१. मी जेव्हा वर जाईन तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना ठामपणे सांगू शकेन की, मी चांगले काम केले आहे. पण तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर द्याल असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेला चिमटा काढला आणि शिवसेनेने नोटाबंदीविरोधात संसदेच्या आवारात निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय केला.

ओहोहो, असंय होय! तरीच आमच्या नाना फडणविसांनी चीनकडे एका मोठ्या चिमट्याची ऑर्डर दिली आहे… वांद्र्याच्या परिसरातच बसवला जाणार आहे म्हणे तो! वाघोबादादा रुसले की कमळाबाई चिमटा घेणार, मग वाघोबादादा लाजतील वगैरे; यांच्या या सार्वजनिक प्रणयाराधनापायी यापुढे न्यूज चॅनेलवरही 'खुलता कळी खुलेना' नावाची मालिका चालवावी लागेल लवकरच!!

………………………..

२. नोटाबंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता थेट जनतेची मते मागवली आहेत. एका खास अॅपद्वारे नोटाबंदीच्या निर्णयावरच्या सूचना थेट माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मोदींनी जनतेला ट्विटरवरून केले आहे.

लोकशाहीच्या डोक्यावरून कल्याणकारी हुकूमशाही हाकण्याच्या या प्रकारातलं पुढचं स्क्रिप्टही सगळ्यांना तोंडपाठ आहे. ९२ टक्के जनतेचा मोदींना पाठिंबा, अवघ्या एक टक्क्याचाच विरोध असं ‘इंडिया टुडे’ छापाचं झी-गणित जाहीर होईल, पंतप्रधान पुन्हा भावुक होऊन पाठिंब्याबद्दल आभार मानतील आणि भक्त डोळेझाकू जयघोष करतील. पंतप्रधानांनी लोकशाहीच्या चौकटीत आणि जिची धूळ कपाळी लावली त्या संसदेच्या प्रांगणात आपलं उत्तरदायित्व निभावायला हवं. आज कोणत्या रंगाचा सूट घालू आणि नाश्त्यात इडली खाऊ की ढोकळा, अशा प्रश्नांवर जनतेचं मत मागवणं समजू शकतं; निश्चलनीकरणासारखे निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि परिणाम हे तज्ज्ञांच्या कक्षेतले विषय आहेत; सगळ्यावर काही ना काही मत असलेल्या सामान्य जनतेच्या आवाक्यातले नव्हेत.

………………………..

३. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय आर्थिक आणीबाणी वाटत असल्याचे शरद पवारांचे विधान दुतोंडीपणाचे आहे. बारामतीत चमचेगिरी करायची आणि मुंबईत बोटे मोडायची हे धंदे लोकहिताचे नाहीत : शिवसेनेची टीका

शंभर टक्के बरोबर आहे. लोकहिताचा विचार करून पवारांनी यांच्याप्रमाणे मुंबईत बोटे मोडून दिल्लीत चमचेगिरी करायला हवी होती, हो ना?

………………………..

४. राहुलचं प्रमोशन माझ्या हातात नाही : सोनिया गांधी

काय सांगताय? अरे देवा, आता काय करेल ते गरीब अश्राप पोर. तुमच्याकडे डोळे लावून बसलंय बिचारं. अस्कायकर्ता? बघा की, जरा पक्षात वशिला लावा की! तुम्हाला काय अवघडाय? प्रयत्न तरी करा की. बाकी काही असो-नसो, आडनाव गांधी आहे, एवढं क्वालिफिकेशन काय कमी आहे काय आपल्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या पक्षात?  

………………………..

५. नोटाबंदीची अंमलबजावणी चुकली : ‘अर्थक्रांती’चे प्रवर्तक अनिल बोकील यांची टीका

बोकीलबुवा, निश्चलनीकरणावर टीका करून आपल्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेताय आणि तुमचा 'आगामी अण्णा हजारे' म्हणून वाढीला लागलेला टीआरपी कशाला उगाच गमावताय? देव आणि भक्त यांच्यामध्ये जिथे संसदेला आम्ही गुंडाळून ठेवतो, तिथे एका य:कश्चित पुजाऱ्याची लुडबूड कोण चालवून घेणार? मोदी रोज चहा पितात तोही देशासाठीच पीत असतात, एरवी त्यांना चहाचा मोह असेल का? अशा माणसाने केलेला निर्णय सगळ्या देशाने (म्हणजे कोण, ते विचारायचं नाही) मान्य केलाय ना निमूट, मग तुम्ही कशाला उगाच ‘प्रेस्टिट्यूड’पणा करताय. उलट सगळं बरोबर चाललंय म्हणालात तर काही दिवसांत एखादा चॅनेल सुरू कराल प्रवचनांचा आणि एखादा कसलातरी स्वदेशी ब्रँडही लाँच कराल.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......