टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, सोनिया-राहुल गांधी आणि अनिल बोकील
  • Wed , 23 November 2016
  • टपल्या Taplya उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सोनिया गांधी Soniya Gandhi राहुल गांधी Rahul Gandhi अनिल बोकील Anil Bokil

१. मी जेव्हा वर जाईन तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना ठामपणे सांगू शकेन की, मी चांगले काम केले आहे. पण तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर द्याल असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेला चिमटा काढला आणि शिवसेनेने नोटाबंदीविरोधात संसदेच्या आवारात निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय केला.

ओहोहो, असंय होय! तरीच आमच्या नाना फडणविसांनी चीनकडे एका मोठ्या चिमट्याची ऑर्डर दिली आहे… वांद्र्याच्या परिसरातच बसवला जाणार आहे म्हणे तो! वाघोबादादा रुसले की कमळाबाई चिमटा घेणार, मग वाघोबादादा लाजतील वगैरे; यांच्या या सार्वजनिक प्रणयाराधनापायी यापुढे न्यूज चॅनेलवरही 'खुलता कळी खुलेना' नावाची मालिका चालवावी लागेल लवकरच!!

………………………..

२. नोटाबंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता थेट जनतेची मते मागवली आहेत. एका खास अॅपद्वारे नोटाबंदीच्या निर्णयावरच्या सूचना थेट माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मोदींनी जनतेला ट्विटरवरून केले आहे.

लोकशाहीच्या डोक्यावरून कल्याणकारी हुकूमशाही हाकण्याच्या या प्रकारातलं पुढचं स्क्रिप्टही सगळ्यांना तोंडपाठ आहे. ९२ टक्के जनतेचा मोदींना पाठिंबा, अवघ्या एक टक्क्याचाच विरोध असं ‘इंडिया टुडे’ छापाचं झी-गणित जाहीर होईल, पंतप्रधान पुन्हा भावुक होऊन पाठिंब्याबद्दल आभार मानतील आणि भक्त डोळेझाकू जयघोष करतील. पंतप्रधानांनी लोकशाहीच्या चौकटीत आणि जिची धूळ कपाळी लावली त्या संसदेच्या प्रांगणात आपलं उत्तरदायित्व निभावायला हवं. आज कोणत्या रंगाचा सूट घालू आणि नाश्त्यात इडली खाऊ की ढोकळा, अशा प्रश्नांवर जनतेचं मत मागवणं समजू शकतं; निश्चलनीकरणासारखे निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि परिणाम हे तज्ज्ञांच्या कक्षेतले विषय आहेत; सगळ्यावर काही ना काही मत असलेल्या सामान्य जनतेच्या आवाक्यातले नव्हेत.

………………………..

३. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय आर्थिक आणीबाणी वाटत असल्याचे शरद पवारांचे विधान दुतोंडीपणाचे आहे. बारामतीत चमचेगिरी करायची आणि मुंबईत बोटे मोडायची हे धंदे लोकहिताचे नाहीत : शिवसेनेची टीका

शंभर टक्के बरोबर आहे. लोकहिताचा विचार करून पवारांनी यांच्याप्रमाणे मुंबईत बोटे मोडून दिल्लीत चमचेगिरी करायला हवी होती, हो ना?

………………………..

४. राहुलचं प्रमोशन माझ्या हातात नाही : सोनिया गांधी

काय सांगताय? अरे देवा, आता काय करेल ते गरीब अश्राप पोर. तुमच्याकडे डोळे लावून बसलंय बिचारं. अस्कायकर्ता? बघा की, जरा पक्षात वशिला लावा की! तुम्हाला काय अवघडाय? प्रयत्न तरी करा की. बाकी काही असो-नसो, आडनाव गांधी आहे, एवढं क्वालिफिकेशन काय कमी आहे काय आपल्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या पक्षात?  

………………………..

५. नोटाबंदीची अंमलबजावणी चुकली : ‘अर्थक्रांती’चे प्रवर्तक अनिल बोकील यांची टीका

बोकीलबुवा, निश्चलनीकरणावर टीका करून आपल्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेताय आणि तुमचा 'आगामी अण्णा हजारे' म्हणून वाढीला लागलेला टीआरपी कशाला उगाच गमावताय? देव आणि भक्त यांच्यामध्ये जिथे संसदेला आम्ही गुंडाळून ठेवतो, तिथे एका य:कश्चित पुजाऱ्याची लुडबूड कोण चालवून घेणार? मोदी रोज चहा पितात तोही देशासाठीच पीत असतात, एरवी त्यांना चहाचा मोह असेल का? अशा माणसाने केलेला निर्णय सगळ्या देशाने (म्हणजे कोण, ते विचारायचं नाही) मान्य केलाय ना निमूट, मग तुम्ही कशाला उगाच ‘प्रेस्टिट्यूड’पणा करताय. उलट सगळं बरोबर चाललंय म्हणालात तर काही दिवसांत एखादा चॅनेल सुरू कराल प्रवचनांचा आणि एखादा कसलातरी स्वदेशी ब्रँडही लाँच कराल.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......