टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • आचार्य बालकृष्ण, ‘कोल्ड प्ले’मध्ये बोलताना मोदी आणि नोटा
  • Mon , 21 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या आचार्य बालकृष्ण Acharya Balkrishna कोल्ड प्ले Cold Play नोटाबंदी Demonetization

१. देश बदलला, रामराज्य आले : पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण

एक बाबा रामदेव पुरेसे नव्हते, आता हेही बोलू लागले; पतंजलीचे गॅसहर चूर्ण ४० रुपयांचे होते, ते आता ८५ रुपयांचे झाले. रामराज्याचा आणखी कोणता पुरावा हवा?

...........

२. नोटाबंदीमुळे सरकारमधून बाहेर पडायला लागेल : शिवसेनेचा इशारा

आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून येई माघारा… नोटाबंदीच्या निर्णयामुळे पंतप्रधान सोडून भारतीय जनता पक्षाचे सगळे मंत्री सरकारमधून बाहेर पडतील, यावर एकवेळ लोक विश्वास ठेवतील; पण, शिवसेना सत्ता सोडेल, यावर कोणाचाही विश्वास बसणं कठीण आहे.

...........

३. मी गाणं गाऊ लागलो, तर तुम्ही सगळे परतावा मागाल, तोही शंभर-शंभरच्या नोटांमध्ये. : कोल्डप्लेच्या प्रेक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदीजी, आमच्या भक्तीची तुम्हाला काहीच कल्पना नाही. तुम्ही फक्त गा. तुमच्यापुढे बडे गुलाम अली खाँपासून मोहम्मद रफीपर्यंत कोणीही कस्पटासमान आहे, याचा निर्वाळा आम्ही देऊ. किमानपक्षी जगातला सर्वात सुरेल पंतप्रधान असा निर्वाळा युनेस्कोकडून तरी आणू, हे पक्कंच. शिवाय, तुम्ही प्रत्यक्ष गायची गरजही नाही. मी गायलो, एवढंच सांगा, आम्ही बाकीचं बघून घेऊ.

...........

४. ५१ टक्के लोक नोटाबंदीच्या बाजूने, ३ टक्के विरोधात : इंडिया टुडेची बातमी

'इंडिया टुडे'च्या अद्भुत गणिताला सलाम! आता ५४ टक्क्यांमध्ये टोटल कशी होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर असं आहे की उरलेल्या ४६ टक्क्यांमधल्या २१ टक्के लोकांना नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झालीये, असं वाटतंय आणि उरलेल्या २५ टक्क्यांना अंमलबजावणी 'सरासरी' आहे, असं वाटतंय. आता ही सरासरी किंवा सर्वसाधारण अंमलबजावणी आहे, हे यांना कळलं कसं? अशा किती नोटाबंदीच्या प्रसंगांचा त्यांचा अनुभव आहे? शिवाय, प्रश्न नोटाबंदी योग्य की अयोग्य असा नसून ती ज्या प्रकारे केली गेली, ते बरोबर की चूक असा असायला हवा. तो यांनी विचारलाच नाही.

...........

५. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे कर्मचारी देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन प्रत्यक्षात पाहणी करणार असून नोटाबंदीनंतर उदभविणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

आता आढावा घ्या. मग दिल्लीत बैठका घ्या. मग त्या बैठकांचा आढावा घ्या. मग अंतिम अहवाल तयार करा आणि साधारणपणे पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत करा सादर अहवाल, काही घाई नाही! असंही बैल गेल्यानंतरच झोपा करायचा आहे. मग त्याची घाई करण्यात अर्थ काय?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......