टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • आचार्य बालकृष्ण, ‘कोल्ड प्ले’मध्ये बोलताना मोदी आणि नोटा
  • Mon , 21 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या आचार्य बालकृष्ण Acharya Balkrishna कोल्ड प्ले Cold Play नोटाबंदी Demonetization

१. देश बदलला, रामराज्य आले : पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण

एक बाबा रामदेव पुरेसे नव्हते, आता हेही बोलू लागले; पतंजलीचे गॅसहर चूर्ण ४० रुपयांचे होते, ते आता ८५ रुपयांचे झाले. रामराज्याचा आणखी कोणता पुरावा हवा?

...........

२. नोटाबंदीमुळे सरकारमधून बाहेर पडायला लागेल : शिवसेनेचा इशारा

आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून येई माघारा… नोटाबंदीच्या निर्णयामुळे पंतप्रधान सोडून भारतीय जनता पक्षाचे सगळे मंत्री सरकारमधून बाहेर पडतील, यावर एकवेळ लोक विश्वास ठेवतील; पण, शिवसेना सत्ता सोडेल, यावर कोणाचाही विश्वास बसणं कठीण आहे.

...........

३. मी गाणं गाऊ लागलो, तर तुम्ही सगळे परतावा मागाल, तोही शंभर-शंभरच्या नोटांमध्ये. : कोल्डप्लेच्या प्रेक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदीजी, आमच्या भक्तीची तुम्हाला काहीच कल्पना नाही. तुम्ही फक्त गा. तुमच्यापुढे बडे गुलाम अली खाँपासून मोहम्मद रफीपर्यंत कोणीही कस्पटासमान आहे, याचा निर्वाळा आम्ही देऊ. किमानपक्षी जगातला सर्वात सुरेल पंतप्रधान असा निर्वाळा युनेस्कोकडून तरी आणू, हे पक्कंच. शिवाय, तुम्ही प्रत्यक्ष गायची गरजही नाही. मी गायलो, एवढंच सांगा, आम्ही बाकीचं बघून घेऊ.

...........

४. ५१ टक्के लोक नोटाबंदीच्या बाजूने, ३ टक्के विरोधात : इंडिया टुडेची बातमी

'इंडिया टुडे'च्या अद्भुत गणिताला सलाम! आता ५४ टक्क्यांमध्ये टोटल कशी होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर असं आहे की उरलेल्या ४६ टक्क्यांमधल्या २१ टक्के लोकांना नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झालीये, असं वाटतंय आणि उरलेल्या २५ टक्क्यांना अंमलबजावणी 'सरासरी' आहे, असं वाटतंय. आता ही सरासरी किंवा सर्वसाधारण अंमलबजावणी आहे, हे यांना कळलं कसं? अशा किती नोटाबंदीच्या प्रसंगांचा त्यांचा अनुभव आहे? शिवाय, प्रश्न नोटाबंदी योग्य की अयोग्य असा नसून ती ज्या प्रकारे केली गेली, ते बरोबर की चूक असा असायला हवा. तो यांनी विचारलाच नाही.

...........

५. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे कर्मचारी देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन प्रत्यक्षात पाहणी करणार असून नोटाबंदीनंतर उदभविणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

आता आढावा घ्या. मग दिल्लीत बैठका घ्या. मग त्या बैठकांचा आढावा घ्या. मग अंतिम अहवाल तयार करा आणि साधारणपणे पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत करा सादर अहवाल, काही घाई नाही! असंही बैल गेल्यानंतरच झोपा करायचा आहे. मग त्याची घाई करण्यात अर्थ काय?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......