टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उज्ज्वल निकम, अमेरिकेतील ट्रम्पविरोधी निदर्शन आणि बाबा रामदेव
  • Fri , 11 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांच्या निषेधार्थ अमेरिकेत सर्वत्र निषेध मोर्चे, ट्रम्प हे आमचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, अशा घोषणा देत हजारो नागरिक रस्त्यावर

अरे, लोकशाहीत राहायचं तर बहुमताच्या निर्णयाचा आदर करायला नको का? जरा शिका २०१४ नंतर घटनात्मक पदं आणि बहुमताचा आदर करायला शिकलेल्या आमच्या देशबांधवांकडून. त्यांना ते शिकायला ६० वर्षं लागली, म्हणून काय झालं!

..........

२. मोदी यांना पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची सूचना मीच केली होती, योगगुरू रामदेव बाबा यांचा दावा

अलबत्! पतंजलीचा नोटा छापायचा कारखाना एवढ्या पटकन् उभारला जाणार नाही आणि अमूलचं तूप पतंजलीच्या डब्यात भरून विकण्याची स्वदेशी व्यावसायिक चतुराई नोटांच्या बाबतीत चालणार नाही, म्हणून. नाहीतर या नोटाही तुमच्याच कारखान्यात छापून गोमूत्र शिंपडून बाजारात आल्या असत्या, यात शंका नाही.

..........

३. पुन्हा बाबा रामदेव : (पाचशे, हजारच्या नोटा तडकाफडकी रद्द करण्याचा) एवढा मोठा धाडसी निर्णय घेणारे मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत.

बाबा, एक शब्दसमुच्चय फार उपयोगी पडतो अशी पसरट विधानं करताना… 'माझ्या माहितीनुसार', 'माझ्या आकलनानुसार' किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे 'माझ्या अल्पमतीनुसार'. तो वापरला की उगाच बेअब्रू होत नाही चारचौघांत.

..........

४. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अनियंत्रित असल्याचे प्रसारमाध्यमांनी समजू नये : ज्येष्ठ वकील उज्जल निकम

म्हणजे काय? बरोबरच आहे. दहशतवाद्यांना तुरुंगात बिर्याणी मिळते, अशा अनियंत्रित थापा मारून देशहित साधण्याचं उच्च नैतिक बळ असायला प्रसारमाध्यमं म्हणजे काय उज्वल निकम आहेत काय?

..........

५. अमेरिकेत ट्रम्प यांच्या विजयानंतर कॅनडामध्ये स्थलांतराची माहिती घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढून कॅनडा इमिग्रेशनची वेबसाइट क्रॅश झाली.

...तरी कॅनडा शेजारी देश आहे आणि अमेरिकेइतकाच संपन्न आहे. ट्रम्पतात्यांनी निवडून येण्याआधी उधळलेल्या मुक्ताफळांवर कार्यवाही सुरू केली, तर काही दिवसांनी घाना, टोंगो, सोमालिया, बुरुंडी, नायजर आदी जगातल्या सर्वात गरीब देशांच्याही इमिग्रेशन वेबसाइट (असल्यास) क्रॅश होऊ लागतील.

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......