टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उज्ज्वल निकम, अमेरिकेतील ट्रम्पविरोधी निदर्शन आणि बाबा रामदेव
  • Fri , 11 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांच्या निषेधार्थ अमेरिकेत सर्वत्र निषेध मोर्चे, ट्रम्प हे आमचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, अशा घोषणा देत हजारो नागरिक रस्त्यावर

अरे, लोकशाहीत राहायचं तर बहुमताच्या निर्णयाचा आदर करायला नको का? जरा शिका २०१४ नंतर घटनात्मक पदं आणि बहुमताचा आदर करायला शिकलेल्या आमच्या देशबांधवांकडून. त्यांना ते शिकायला ६० वर्षं लागली, म्हणून काय झालं!

..........

२. मोदी यांना पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची सूचना मीच केली होती, योगगुरू रामदेव बाबा यांचा दावा

अलबत्! पतंजलीचा नोटा छापायचा कारखाना एवढ्या पटकन् उभारला जाणार नाही आणि अमूलचं तूप पतंजलीच्या डब्यात भरून विकण्याची स्वदेशी व्यावसायिक चतुराई नोटांच्या बाबतीत चालणार नाही, म्हणून. नाहीतर या नोटाही तुमच्याच कारखान्यात छापून गोमूत्र शिंपडून बाजारात आल्या असत्या, यात शंका नाही.

..........

३. पुन्हा बाबा रामदेव : (पाचशे, हजारच्या नोटा तडकाफडकी रद्द करण्याचा) एवढा मोठा धाडसी निर्णय घेणारे मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत.

बाबा, एक शब्दसमुच्चय फार उपयोगी पडतो अशी पसरट विधानं करताना… 'माझ्या माहितीनुसार', 'माझ्या आकलनानुसार' किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे 'माझ्या अल्पमतीनुसार'. तो वापरला की उगाच बेअब्रू होत नाही चारचौघांत.

..........

४. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अनियंत्रित असल्याचे प्रसारमाध्यमांनी समजू नये : ज्येष्ठ वकील उज्जल निकम

म्हणजे काय? बरोबरच आहे. दहशतवाद्यांना तुरुंगात बिर्याणी मिळते, अशा अनियंत्रित थापा मारून देशहित साधण्याचं उच्च नैतिक बळ असायला प्रसारमाध्यमं म्हणजे काय उज्वल निकम आहेत काय?

..........

५. अमेरिकेत ट्रम्प यांच्या विजयानंतर कॅनडामध्ये स्थलांतराची माहिती घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढून कॅनडा इमिग्रेशनची वेबसाइट क्रॅश झाली.

...तरी कॅनडा शेजारी देश आहे आणि अमेरिकेइतकाच संपन्न आहे. ट्रम्पतात्यांनी निवडून येण्याआधी उधळलेल्या मुक्ताफळांवर कार्यवाही सुरू केली, तर काही दिवसांनी घाना, टोंगो, सोमालिया, बुरुंडी, नायजर आदी जगातल्या सर्वात गरीब देशांच्याही इमिग्रेशन वेबसाइट (असल्यास) क्रॅश होऊ लागतील.

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......