टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ‘कोल्ड प्ले’चं पोस्टर, गाय आणि राजनाथ सिंह
  • Wed , 09 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. पत्नी सकाळी उशिरा उठून पतीकडे चहा मागत असेल, तर ती केवळ आळशी आहे, ते काही क्रौर्य ठरत नाही. त्या आधारावर घटस्फोट मिळणार नाही : दिल्ली उच्च न्यायालयाची टिपणी

- मुळात पत्नी सकाळी इतकी उशिरा उठणार असेल आणि पतीला ती जागी होण्याआधी सकाळचे दोन-तीन तास तिचं बोलणं ऐकावं लागणार नसेल, तर पतीने चहाबरोबर ब्रेकफास्टही द्यायला हवा आपणहून. घटस्फोट कसला मागतो इतक्या गुणी पत्नीकडून!

...

२. माणसाचे आणि गायीचे जीन्स ८० टक्के सारखे, त्यामुळे गाय पवित्र : राजनाथ

- माणसासारख्या जीन्सचं प्रमाण गायीपेक्षा चिम्पांझी आणि मांजर यांच्यात जास्त आहे. माणूस आणि केळे यांच्यातही ५० टक्के जीन्स सारखे असतात, ही सगळी वैज्ञानिक माहिती छद्मविज्ञानप्रवर्तक राजनाथांना माहिती असणं शक्य नाही. पण, गाय आणि काही माणसं यांच्यातलं समान जीन्सचं प्रमाण जवळपास शंभर टक्के असावं, अशी शंका काही गोपुत्र आणि गोरक्षकांना पाहिल्यावर येते.

...

३. गरिबी निर्मूलन आणि युवकांमध्ये सामाजिक जाणीवेच्या जागृतीसाठी आयोजित केलेल्या आणि राज्य सरकारने सवलतीचा वर्षाव केलेल्या ‘कोल्ड प्ले’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमस्थळी दारूविक्रीची परवानगी मागण्यात आल्याने गदारोळ.

- यात गदारोळ करण्यासारखं काय आहे? ‘कोल्ड प्ले’चा वाद्यवृंद ऐकण्यासाठी जे कोणी तरुण येतील, त्यांच्यात गरिबी निर्मूलनाचा आणि सामाजिक जाणीवेचा जोश उत्पन्न व्हावा असं विरोधकांना वाटत नाही का? दारू न पिता हा जोश निर्माण होऊ शकला असता, तर ही उद्दिष्टं साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ कशाला आली असती.

...

४. सामाजिक विज्ञानाच्या संदर्भात जगभरातल्या ख्यातनाम नियतकालिकांमध्ये २००९ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या १६ लाख ६० हजार लेखांमध्ये भारताचा वाटा अवघा १.६ टक्क्यांचा.

- काय सांगताय? फेसबुकवरच्या समाजप्रबोधनाच्या पोष्टी काउंट करत नाहीत की काय अभ्यासपूर्ण सामाजिक लेखनात? मग बरोबर. त्या मोजा, मग भारतीयांचा वाटा २००० टक्क्यांच्या आसपास निघेल.

...

५. उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता द्या, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सगळी थकबाकी सहा महिन्यांत माफ करू : राजनाथ सिंह

- अहो, थांबा थांबा काका, आधीच प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या १५-१५ लाखांचं काय करायचं, हेच ठरलेलं नाही. त्यात तुम्ही थकबाकीही माफ करणार. एवढे पैसे खर्च तरी कसे करणार बिचारे शेतकरी! शिवाय एखाद्याला हर्षवायू होऊन प्राणावर बेतलं तर.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......