टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ‘कोल्ड प्ले’चं पोस्टर, गाय आणि राजनाथ सिंह
  • Wed , 09 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. पत्नी सकाळी उशिरा उठून पतीकडे चहा मागत असेल, तर ती केवळ आळशी आहे, ते काही क्रौर्य ठरत नाही. त्या आधारावर घटस्फोट मिळणार नाही : दिल्ली उच्च न्यायालयाची टिपणी

- मुळात पत्नी सकाळी इतकी उशिरा उठणार असेल आणि पतीला ती जागी होण्याआधी सकाळचे दोन-तीन तास तिचं बोलणं ऐकावं लागणार नसेल, तर पतीने चहाबरोबर ब्रेकफास्टही द्यायला हवा आपणहून. घटस्फोट कसला मागतो इतक्या गुणी पत्नीकडून!

...

२. माणसाचे आणि गायीचे जीन्स ८० टक्के सारखे, त्यामुळे गाय पवित्र : राजनाथ

- माणसासारख्या जीन्सचं प्रमाण गायीपेक्षा चिम्पांझी आणि मांजर यांच्यात जास्त आहे. माणूस आणि केळे यांच्यातही ५० टक्के जीन्स सारखे असतात, ही सगळी वैज्ञानिक माहिती छद्मविज्ञानप्रवर्तक राजनाथांना माहिती असणं शक्य नाही. पण, गाय आणि काही माणसं यांच्यातलं समान जीन्सचं प्रमाण जवळपास शंभर टक्के असावं, अशी शंका काही गोपुत्र आणि गोरक्षकांना पाहिल्यावर येते.

...

३. गरिबी निर्मूलन आणि युवकांमध्ये सामाजिक जाणीवेच्या जागृतीसाठी आयोजित केलेल्या आणि राज्य सरकारने सवलतीचा वर्षाव केलेल्या ‘कोल्ड प्ले’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमस्थळी दारूविक्रीची परवानगी मागण्यात आल्याने गदारोळ.

- यात गदारोळ करण्यासारखं काय आहे? ‘कोल्ड प्ले’चा वाद्यवृंद ऐकण्यासाठी जे कोणी तरुण येतील, त्यांच्यात गरिबी निर्मूलनाचा आणि सामाजिक जाणीवेचा जोश उत्पन्न व्हावा असं विरोधकांना वाटत नाही का? दारू न पिता हा जोश निर्माण होऊ शकला असता, तर ही उद्दिष्टं साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ कशाला आली असती.

...

४. सामाजिक विज्ञानाच्या संदर्भात जगभरातल्या ख्यातनाम नियतकालिकांमध्ये २००९ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या १६ लाख ६० हजार लेखांमध्ये भारताचा वाटा अवघा १.६ टक्क्यांचा.

- काय सांगताय? फेसबुकवरच्या समाजप्रबोधनाच्या पोष्टी काउंट करत नाहीत की काय अभ्यासपूर्ण सामाजिक लेखनात? मग बरोबर. त्या मोजा, मग भारतीयांचा वाटा २००० टक्क्यांच्या आसपास निघेल.

...

५. उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता द्या, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सगळी थकबाकी सहा महिन्यांत माफ करू : राजनाथ सिंह

- अहो, थांबा थांबा काका, आधीच प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या १५-१५ लाखांचं काय करायचं, हेच ठरलेलं नाही. त्यात तुम्ही थकबाकीही माफ करणार. एवढे पैसे खर्च तरी कसे करणार बिचारे शेतकरी! शिवाय एखाद्याला हर्षवायू होऊन प्राणावर बेतलं तर.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......