टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ‘कोल्ड प्ले’चं पोस्टर, गाय आणि राजनाथ सिंह
  • Wed , 09 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. पत्नी सकाळी उशिरा उठून पतीकडे चहा मागत असेल, तर ती केवळ आळशी आहे, ते काही क्रौर्य ठरत नाही. त्या आधारावर घटस्फोट मिळणार नाही : दिल्ली उच्च न्यायालयाची टिपणी

- मुळात पत्नी सकाळी इतकी उशिरा उठणार असेल आणि पतीला ती जागी होण्याआधी सकाळचे दोन-तीन तास तिचं बोलणं ऐकावं लागणार नसेल, तर पतीने चहाबरोबर ब्रेकफास्टही द्यायला हवा आपणहून. घटस्फोट कसला मागतो इतक्या गुणी पत्नीकडून!

...

२. माणसाचे आणि गायीचे जीन्स ८० टक्के सारखे, त्यामुळे गाय पवित्र : राजनाथ

- माणसासारख्या जीन्सचं प्रमाण गायीपेक्षा चिम्पांझी आणि मांजर यांच्यात जास्त आहे. माणूस आणि केळे यांच्यातही ५० टक्के जीन्स सारखे असतात, ही सगळी वैज्ञानिक माहिती छद्मविज्ञानप्रवर्तक राजनाथांना माहिती असणं शक्य नाही. पण, गाय आणि काही माणसं यांच्यातलं समान जीन्सचं प्रमाण जवळपास शंभर टक्के असावं, अशी शंका काही गोपुत्र आणि गोरक्षकांना पाहिल्यावर येते.

...

३. गरिबी निर्मूलन आणि युवकांमध्ये सामाजिक जाणीवेच्या जागृतीसाठी आयोजित केलेल्या आणि राज्य सरकारने सवलतीचा वर्षाव केलेल्या ‘कोल्ड प्ले’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमस्थळी दारूविक्रीची परवानगी मागण्यात आल्याने गदारोळ.

- यात गदारोळ करण्यासारखं काय आहे? ‘कोल्ड प्ले’चा वाद्यवृंद ऐकण्यासाठी जे कोणी तरुण येतील, त्यांच्यात गरिबी निर्मूलनाचा आणि सामाजिक जाणीवेचा जोश उत्पन्न व्हावा असं विरोधकांना वाटत नाही का? दारू न पिता हा जोश निर्माण होऊ शकला असता, तर ही उद्दिष्टं साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ कशाला आली असती.

...

४. सामाजिक विज्ञानाच्या संदर्भात जगभरातल्या ख्यातनाम नियतकालिकांमध्ये २००९ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या १६ लाख ६० हजार लेखांमध्ये भारताचा वाटा अवघा १.६ टक्क्यांचा.

- काय सांगताय? फेसबुकवरच्या समाजप्रबोधनाच्या पोष्टी काउंट करत नाहीत की काय अभ्यासपूर्ण सामाजिक लेखनात? मग बरोबर. त्या मोजा, मग भारतीयांचा वाटा २००० टक्क्यांच्या आसपास निघेल.

...

५. उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता द्या, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सगळी थकबाकी सहा महिन्यांत माफ करू : राजनाथ सिंह

- अहो, थांबा थांबा काका, आधीच प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या १५-१५ लाखांचं काय करायचं, हेच ठरलेलं नाही. त्यात तुम्ही थकबाकीही माफ करणार. एवढे पैसे खर्च तरी कसे करणार बिचारे शेतकरी! शिवाय एखाद्याला हर्षवायू होऊन प्राणावर बेतलं तर.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......