टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 04 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१.

“रतन टाटा हे इतिहासातले सगळ्यात भ्रष्ट टाटा” : सुब्रह्मण्यम स्वामी

स्वामी म्हणतायत म्हटल्यावर युनेस्को आणि नासाही दुजोरा देतीलच… स्वामींकडे येरवडा आणि ठाणे या दोन्ही ठिकाणची प्रमाणपत्रं आहेत.

२.

(वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन करणारे आणि विषप्राशन करून आत्महत्या केलेले माजी सैनिक) “रामकिशन ग्रेवाल हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते होते” : जनरल व्ही. के. सिंह

...आणि एकदा काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हटल्यावर त्यांचा गोमूत्रफवारित पवित्र हिंदभूमीमध्ये राहण्याचा अधिकार असाही संपलाच होता. ते माजी सैनिक होते, याला काय किंमत? कसलं जय जवान नि कसलं काय? हो ना फुटकळ साहेब… म्हणजे इंग्रजीत ते आपलं जनरल हो!

३.

“लाइट सुरू होताच जसे मच्छर धावत येतात, तसे कॅमेरे सुरू होताच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल धावत येतात” : हरयाणाचे मंत्री अनिल विज

चूकच आहे ते. साफ चूक. कॅमेरे ऑन झाले की आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतो आहोत, कशासाठी आलो आहोत, इतर लोक कुठे पाहतायत, हे विसरून थबकून मंत्रमुग्ध झाल्यासारखं कॅमेऱ्याकडे पाहायचं असतं… हो की नाही हो विजकाका?

४.

“सोनिया गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाला आणखी एका वर्षाची वाढ”

अहो, वर्षावर्षाची धुगधुगी का देताय? राहुलबाबाच सक्रिय राहणार असतील आणि प्रियंकाताई सक्रिय होणार नसतील, तर तहहयात करून टाका… काँग्रेसजनांच्या नाजूक हृदयावर सतत ताण तरी किती आणत राहायचा!!

५.

“देशाची एकता सरदार पटेलांमुळेच कायम राहिली” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दत्तक पुत्र अनेक झाले, अनेक होतील; पण, दुसऱ्या पक्षाचा अख्खा नेताच दत्तक घेण्याचं हे पहिलंच उदाहरण असेल. अर्थात, त्यालाही नाईलाज आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात शून्य योगदान असलेल्या संघटनेला त्या काळातले स्वत:चे नेते मिळता मिळता मारामारच असणार ना!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......