टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 04 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१.

“रतन टाटा हे इतिहासातले सगळ्यात भ्रष्ट टाटा” : सुब्रह्मण्यम स्वामी

स्वामी म्हणतायत म्हटल्यावर युनेस्को आणि नासाही दुजोरा देतीलच… स्वामींकडे येरवडा आणि ठाणे या दोन्ही ठिकाणची प्रमाणपत्रं आहेत.

२.

(वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन करणारे आणि विषप्राशन करून आत्महत्या केलेले माजी सैनिक) “रामकिशन ग्रेवाल हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते होते” : जनरल व्ही. के. सिंह

...आणि एकदा काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हटल्यावर त्यांचा गोमूत्रफवारित पवित्र हिंदभूमीमध्ये राहण्याचा अधिकार असाही संपलाच होता. ते माजी सैनिक होते, याला काय किंमत? कसलं जय जवान नि कसलं काय? हो ना फुटकळ साहेब… म्हणजे इंग्रजीत ते आपलं जनरल हो!

३.

“लाइट सुरू होताच जसे मच्छर धावत येतात, तसे कॅमेरे सुरू होताच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल धावत येतात” : हरयाणाचे मंत्री अनिल विज

चूकच आहे ते. साफ चूक. कॅमेरे ऑन झाले की आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतो आहोत, कशासाठी आलो आहोत, इतर लोक कुठे पाहतायत, हे विसरून थबकून मंत्रमुग्ध झाल्यासारखं कॅमेऱ्याकडे पाहायचं असतं… हो की नाही हो विजकाका?

४.

“सोनिया गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाला आणखी एका वर्षाची वाढ”

अहो, वर्षावर्षाची धुगधुगी का देताय? राहुलबाबाच सक्रिय राहणार असतील आणि प्रियंकाताई सक्रिय होणार नसतील, तर तहहयात करून टाका… काँग्रेसजनांच्या नाजूक हृदयावर सतत ताण तरी किती आणत राहायचा!!

५.

“देशाची एकता सरदार पटेलांमुळेच कायम राहिली” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दत्तक पुत्र अनेक झाले, अनेक होतील; पण, दुसऱ्या पक्षाचा अख्खा नेताच दत्तक घेण्याचं हे पहिलंच उदाहरण असेल. अर्थात, त्यालाही नाईलाज आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात शून्य योगदान असलेल्या संघटनेला त्या काळातले स्वत:चे नेते मिळता मिळता मारामारच असणार ना!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......