टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 04 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१.

“रतन टाटा हे इतिहासातले सगळ्यात भ्रष्ट टाटा” : सुब्रह्मण्यम स्वामी

स्वामी म्हणतायत म्हटल्यावर युनेस्को आणि नासाही दुजोरा देतीलच… स्वामींकडे येरवडा आणि ठाणे या दोन्ही ठिकाणची प्रमाणपत्रं आहेत.

२.

(वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन करणारे आणि विषप्राशन करून आत्महत्या केलेले माजी सैनिक) “रामकिशन ग्रेवाल हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते होते” : जनरल व्ही. के. सिंह

...आणि एकदा काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हटल्यावर त्यांचा गोमूत्रफवारित पवित्र हिंदभूमीमध्ये राहण्याचा अधिकार असाही संपलाच होता. ते माजी सैनिक होते, याला काय किंमत? कसलं जय जवान नि कसलं काय? हो ना फुटकळ साहेब… म्हणजे इंग्रजीत ते आपलं जनरल हो!

३.

“लाइट सुरू होताच जसे मच्छर धावत येतात, तसे कॅमेरे सुरू होताच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल धावत येतात” : हरयाणाचे मंत्री अनिल विज

चूकच आहे ते. साफ चूक. कॅमेरे ऑन झाले की आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतो आहोत, कशासाठी आलो आहोत, इतर लोक कुठे पाहतायत, हे विसरून थबकून मंत्रमुग्ध झाल्यासारखं कॅमेऱ्याकडे पाहायचं असतं… हो की नाही हो विजकाका?

४.

“सोनिया गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाला आणखी एका वर्षाची वाढ”

अहो, वर्षावर्षाची धुगधुगी का देताय? राहुलबाबाच सक्रिय राहणार असतील आणि प्रियंकाताई सक्रिय होणार नसतील, तर तहहयात करून टाका… काँग्रेसजनांच्या नाजूक हृदयावर सतत ताण तरी किती आणत राहायचा!!

५.

“देशाची एकता सरदार पटेलांमुळेच कायम राहिली” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दत्तक पुत्र अनेक झाले, अनेक होतील; पण, दुसऱ्या पक्षाचा अख्खा नेताच दत्तक घेण्याचं हे पहिलंच उदाहरण असेल. अर्थात, त्यालाही नाईलाज आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात शून्य योगदान असलेल्या संघटनेला त्या काळातले स्वत:चे नेते मिळता मिळता मारामारच असणार ना!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......