अजूनकाही
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मुलाखती-प्रवचनं ऐकून, त्यांच्या पुस्तकांच्या वाचनामुळे माणसाला जटील प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत व्हायची. सुखाचा, आनंदाचा, दुःखाचा अर्थ कळायला लागायचा, माणुसकीची, चांगुलपणाची महत्ता लक्षात यायला मदत व्हायची. इतकंच नाही तर त्या चांगुलपणाचा, माणुसकीचा, सहानुकंपेचा झेंडा खांद्यावर घेणारा नवा माणूस त्यांच्या प्रेरणेमुळे तयार व्हायचा!...
हे म्हणजे ‘धिंड’ कथेतील दारूड्याची धिंड काढण्यासारखे आहे. एखाद्या गावात दारू पिऊन फिरणारा पकडायचा, दारू विक्रेता, दारू निर्माता, त्याला निर्मितीची परवानगी देणारा, त्याला कच्चा माल पुरवणारा यांना मात्र कधीच जनतेसमोर आणायचे नाही. फक्त जो समोर दिसतो, त्याचीच ‘धिंड’ काढायची. यातून आपल्या शिक्षण व्यवस्थेचेच धिंडवडे निघत आहेत...
‘अनकही’ एक दर्जेदार नाटक आहे, यात शंका नाही. उच्च दर्जाचं दिग्दर्शन आणि त्याला साजेसा अभिनय असला तर रंगमंचावर जादुई परिणाम गाठता येतो. काही अभ्यासकांच्या मते रंगमंचावर ‘भीती’ ही भावना दाखवणं तसं अवघड असतं. ही भावना ‘सिनेमा’ या माध्यमात फार प्रभावीपणे सादर करता येते. अशा सुविधा रंगमंचावर नसतात. ‘अनकही’ने या मर्यादांवर मात केली आहे...
आत-बाहेरच्या पर्यावरणात एकमेळ होता. ‘इको सिस्टिम’ संवादी होती. परस्परावलंबन समंजस होतं. रोखलेल्या कॅमेऱ्यात टिपण्यापलीकडचं... निसर्गाची ही प्राचीन ‘टेपेस्ट्री’ आरपार बदलण्याचा हव्यास घाट आता रोज घातला जातोय. ज्ञान-विज्ञानाच्या सगळ्या शक्यता आजमावत. संवेदनाहीन तंत्रज्ञानाला होकार भरत. नेमक्या कुठल्या सुखासाठी? नेमकं कुणाच्या हितासाठी? या अवघड प्रश्नांची उत्तरं तर त्याहून अवघड...
एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते...
आपल्या प्रिय माणसाला निरोप सावकाशच देता येतो. निरोप देता देताच आठवणींचा दिवा उजळतो. त्या उजेडात समजतं ‘तिने माझ्यामध्ये तिला स्वतःलाच जन्म दिला होता कदाचित. म्हणून एवढी माया केली... ’ उजळलेल्या वाटेवर सम्यक भाव तिच्या मनाला सहज उभारी देतात. लेखिका ‘दिवसातल्या प्रत्येक तासाचा, मिनिटाचा एकेक टाका घालत… देखणी, अगदी घट्ट गोधडी शिवताना दोऱ्याला गाठ मारायची विसरत’ नाही! ...
धार्मिक भावना असणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण काहीसे कमी असते, पण धार्मिक नशेमध्ये बुडालेले ते एकप्रकारचे मनोरुग्ण असतात. जेव्हा श्रद्धा कार्यकारण संबंध नाकारू लागते, वैज्ञानिक उपचारांना विरोध करते, आणि भ्रामक आशेच्या नादी लावून माणसाची फसवणूक करते, तेव्हा ती अंधश्रद्धा बनते. त्यामुळे जी जी श्रद्धा चिकित्सेला नकार देते, ती प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते...
व्यक्तीने परंपरेला प्रश्न विचारून तत्त्वज्ञान घडवायचे, त्या तत्त्वज्ञानाचा पाया वापरून जीवन चांगले, सुंदर आणि न्याय्य बनवायचे, वेळ पडली तर धर्माला आणि परंपरेला प्रश्न विचारून त्यांच्यात बदल घडवून आणायचे, आणि या सगळ्या प्रकारात कायद्याने अन्याय्य शिक्षा जरी केली, तरी ती परंपरेचा, कायद्याचा, पूर्वजांचा आणि समाजाचा आदर म्हणून भोगायची, अशी ही संगती सॉक्रेटिसने आपल्याला लावून दिली आहे...
उपलब्ध ऐतिहासिक पुरावे आणि विविध स्रोतांचा तुलनात्मक विचार केला असता टिपू सुलतानची प्रतिमा एकरेषीय स्वरूपात मांडणे कठीण ठरते. काही प्रसंगी त्याने बंडखोर प्रदेशांमध्ये गैरइस्लामिक लोकांच्या विरुद्ध कठोर उपाययोजना केल्या, तर दुसरीकडे आपल्या राज्यातील हिंदू धार्मिक संस्थांशी सलोख्याचे संबंध राखले. आपल्या प्रशासनातसुद्धा हिंदूंना महत्त्वाचे स्थान दिले...
आपण एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे युद्धाचे पारडे पूर्णपणे इराणच्या बाजूने झुकले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इराणने दाखवलेला समजूतदारपणा, स्वाभिमानाने दाखवलेला ताठरपणा आणि अमेरिका-इस्राईलच्या आक्रमणाला जशाला तसे उत्तर देण्याची सिद्ध केलेली क्षमता. या युद्धातील धोरण व डावपेच, लष्करी प्रयत्न या सगळ्या बाबतीत इराण अमेरिका-इस्राईलला पुरून उरला आहे...
हे तर उघडच आहे की, लोकसभेची सदस्यसंख्या वाढवणारी कोणतीही मतदारसंघ पुनर्रचना केवळ अंकगणितीयच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही न्याय्य असली पाहिजे. कुटुंब नियोजनात अग्रेसर असलेली राज्ये आणि लहान राज्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रमाणानुसार किंवा सापेक्षतः तोट्यात टाकता कामा नये. प्रमाणानुसार वाढ झाल्यास, वास्तविक पाहता सापेक्ष प्रभाव कमी होऊ शकतो, कारण एकूण संख्येतील फरक अधिक मोठा होतो ...
पत्रकारितेच्या साडेचार दशकांच्या काळात दत्ताभाऊंसारखा सहृदयी राजकारणी अपवादानेच पाहण्यात आला. आणखी एक म्हणजे, पाय जमिनीवर ठेवून लोकांशी वागणं, हाही त्यांचा दुर्मीळ गुण होता. अशी माणसं राजकारणात फार अपवादानं पाहायला मिळतात. दत्ताभाऊ त्यापैकी एक होते. माणसं काळाच्या पडद्याआड जातात... उरतात त्या त्यांच्या आठवणी. दत्ताभाऊ गेले, पण त्यांच्या असंख्य आठवणी माझ्या मनात आहेत...
भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. ...
प. बंगालमध्ये विविध अंदाजानुसार २८ ते ३० टक्के मुस्लीम मतं आहेत आणि ती साहजिकच निर्णायक ठरतात. या निवडणुकीत हे मतांचं ध्रुवीकरण कसं केलं जातं. ही २८ ते ३० टक्के विरुद्ध बाकीची मतं आणि त्यातली भाजपच्या पारड्यात किती पडतात किंवा ‘पाडून घेतली’ जातात, यावरसुद्धा भाजपचं यश अवलंबून आहे. एक निर्विवाद आहे, यापुढे प. बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध भाजप अशी सरळ लढाई असेल. कारण काँग्रेस आणि डावे नेस्तनाबूत झाल्यातच जमा आहे...
अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे...
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.