आता अंतिम समयी तरी आपण आयुष्यात निश्चितपणे काय केलेत हे सांगा, असे ठकी विचारते, आणि एका फालतू विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधकाची ते सांगता सांगता पुरेवाट होते!
साहित्यिक/विचारवंतानी २०१४ नंतरच्या काळात काही निश्चित भूमिका घेतलेली दिसत नाही, हे वारंवार नाटकाच्या निमित्ताने पुढे येत राहते. यातच नाटकाचे यश आहे. मात्र असे प्रत्यक्ष न म्हणता त्याचे फक्त सूचन केले आहे. भारतातील व्यवस्थेवर भाष्य करताना सलमान रश्दी यांनी त्यांच्या ‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’मध्ये १५ ऑगस्ट १९४७ला जन्मलेले सलीम सिनाई हे पात्र उभे केले होते, तसेच काहीसे हे पात्र आहे.......