किशोरीताई गेल्या… हे कसं शक्य आहे?
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • गानसरस्वती किशोरी आमोणकर - १० एप्रिल १९३१-३ एप्रिल २०१७
  • Sat , 08 April 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe किशोरी आमोणकर Kishori Amonkar

किशोरीताई गेल्या… हे कसं शक्य आहे? मन मानायलाच तयार नाही, तरीही एक आक्रोश आतल्या आत…त्यांनी किती सांगितलं आणि किती ऐकलं, किती कळलं? एकेका गोष्टीवर अजून खूप काही विचारायचं होतं. त्या नेहमी म्हणत, ‘मी आज आहे, उद्या नाही.’ मी मनाशी म्हणे, ‘तो उद्या दहा-बारा वर्षं तरी येत नाही.’ मला कसलीच घाई वाटत नव्हती, पण त्यांना वाटत असावी. त्यांच्या सांगण्याचा मनाशी हळूहळू पडताळा घेतला जात होता, घेतला जाईल. त्यांच्याकडून ऐकलेलं उमजायला हे आयुष्य नक्कीच पुरणार नाही. खूप विरोधास होते त्यांच्या सांगण्यात. विरोधाचा आभास दूर होईल, समजुतीच्या अशा कोनावर जाऊन उभं राहावं लागतं आपल्याला. उमजून घेण्याचं हे एक सूत्र! अशी आणखी काही सूत्रं शोधायला हवीत.

कला आणि कारागिरी या मागच्या वेळच्या लेखावर चौफेर प्रतिक्रिया आल्या. हा विषय सर्वांनाच जिव्हाळ्याचा वाटला. किशोरीताईंनी या विषयाची मांडणी माध्यम आणि त्याचा उद्देश या सूत्रानं केली आहे. ‘अरे, किती अडकून पडाला त्या माध्यमात...माझ्यासारख्या अभुताचं किती प्रदर्शन मांडता?’ असं त्या म्हणत. संगीत ही सुरांची भाषा आहे. संवाद हा भाषेचा उद्देश आहे. ‘या हृदयीचे त्या हदयी’ असा भावसंवाद संगीत या भाषेइतका अन्य कोणात्याही माध्यमातून परिपूर्ण होत नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. सुरांचं काम ‘सांगणं’ आहे, आपण गातो-वाजवतो त्या सुराचा स्वरार्थ काय आहे, हे न समजताच गाणं-वाजवणं करीत सुटतात कलाकार अशी त्यांची तक्रार असे.

त्यांचा हा विचार शब्दबद्ध करताना मी एक उदाहरण दिलं की, मराठी अनोळखी प्रांतात कुणी अगदी अनोळखी लिपीतली एखादी ओळ पाहिली तर त्यासाठी ती ओळी एक नक्षी मात्र असेल. अनभिज्ञपणे तो ती नक्षी कुठे तरी रेखाटेलही, पण ज्याला ती लिपी अवगत आहे त्याला ती ओळ म्हणजे एक संदेश असेल. अर्थ न कळता रेखाटलेली ती नक्षी अनर्थ घडवू शकेल?

ताईंना या उदाहरणाचं हसू आलं. त्यांना हे उदाहरणं पटलं. सुरांना अंगभूत सौंदर्य आहे. सौंदर्य (अर्थात श्रुती सुभगता) हा स्वरांचा स्थायीभाव. पण म्हणून संगीत निर्मितीत-श्रवणात, स्वर फक्त सौंदर्याची निर्हेतूक पखरण करत नाहीत. सुंदर सुरांना भावार्थ असतो आणि सूर एकमेकांच्या हातात हात घालून भावार्थ प्रतीयमान (ताईंचा लाडका शब्द) करतात.

या सगळ्या मांडणीत चकवे आहेत, निरागस जिवांना हरवून जाण्यासाठी आणि वस्तांदांना दुनियेला झुकवण्यासाठी! माध्यम आणि हेतू यांना वेगळं पाहणं ही विश्लेषणाची सोय आहे. तात्त्विक चर्चेत हा भेद मानणं जितकं सोपं आहे, तितकं व्यवहारात ते सोपं नाही. हेतू प्रधान मानला की, माध्यमाला आपोआप गौणत्व येतं आणि मग या गौणत्वाची परिणती कलासक्तीतच होणार! माध्यमाला अवाजवी महत्त्व दिलं की, तंत्रापलीकडे काही दिसू नये असा अपारदर्शीपणा येणार. सर्व कलाव्यवहार यांत्रिक बनणार. अशी तारेवरची कसरत आहे आणि मौजेची गोष्ट अशी की, ताणलेल्या तारेवर आपण चालत आहोत की, खाली गटांगळी खाल्ली आहे हेही वर्षानुवर्षं उमजत नाही. पण कधी इकडे झुकत तर कधी तिकडे झुकत, तोल सावरीत कलेची जी वाटचाल होते, ती संस्कृतीच्या अधिक उन्नत शिखराकडे आणि असे मानण्याला व्यापक मांडणीत पर्याय नाही. माध्यम आणि हेतू ही जोडगोळी शरीर-अशरीर अस्तित्व या जोडगोळीसारखी आहे.

साहित्यात कथ्य आणि शिल्प – भाषा आणि आशय असा भेद कल्पिला जातो. जातो म्हणण्यापेक्षा जात असे. अत्याधुनिक समीक्षा किंवा साहित्यशास्त्र असा भेद मानत नाही. अस्सल आशय त्याची स्वत:ची भाषा, त्याचा स्वत:चा घाट (Form) घेऊनच अवतीर्ण होतो असं सप्रमाण सांगितलं जातं. आधुनिक साहित्याने अलंकारिक, सांकेतिक भाषेचं जोखड फेकून दिलं असं सांगितलं जातं. आता कोणी फार अलंकारिक लिहीत नाहीत, अतिशय विकसित अशी अक्षरगण आणि मात्रावृत्तांची पद्य पद्धती आता कोणी अनुसरत नाही. छंद, वृत्त गमावली तरी आधुनिक कवितेची कमाई खूप मोठी आहे हे मत सर्वमान्य आहे.

आता हेच प्रारूप (Model) असंच्या असं शास्त्रीय संगीताला लावता येईल का? शतकानुशतकांच्या संस्कारांनी जागृत केलेली, चिमटीत पकडलेली स्वर-लय संवेदना गमावण्याची गोष्ट आहे का? आज चमत्कार म्हणून गणली गेलेली जी बाल कलाकार मंडळी आहेत, त्यांची सांगीतिक संवेदना उपजतच एवढी जागृत, तीक्ष्ण आहे! अनेक कलाकार उघडपणे हे मान्य करतात की, आजकालची मुलं जास्त शार्प आहेत. हे जर खरं असेल तर निसर्गाने सांगीतिक संवेदना ही बाब उत्क्रांती मोडमध्ये टाकली आहे. तयारी, कौशल्य, माध्यमावरचं प्रभुत्व ही बाब नाकारता येण्यासारखी नाही. तांत्रिक कौशल्य नाकारलं जाऊ लागलं तर संगीतकलेची अधोगती सुरू होईल. तान घेतली नाही की (आणि तरच) भाव प्रकट होतो का हो? सूक्ष्म लयकारी केली नाही तरच तबलावादन दर्जेदार होतं का हो? कलाविष्कार दर्जेदार, भावप्रवण वाटावा म्हणून काही पथ्यं, काही संकेत पाळणं बेगडी नाही का? आधुनिक कला अभ्यासक म्हणतात की, लिहिलेल्या ओळीला – ती वाचली, वाचता आली की - एक अर्थ असतो. पण म्हणून त्या ओळीचं जे दृश्यरूप आहे, त्याला काही अर्थ नाही, असं म्हणता येत नाही. ओळीचा अर्थ (शब्दार्थ) कळो न कळो ओळीच्या दृश्यरूपाला त्याचा एक अर्थ असतो!

‘या हृदयीचे त्या हृदयी’ हे संगीतकलेच्या हेतूचं परिपूर्ण विधान होऊ शकत नाही. ‘संगीतातून भावाभिव्यक्ती’ असंच ते विधान असू शकतं. संगीताच्या माध्यमातून घडणाऱ्या भाववहनाचं महत्त्व आहे. संगीतातून भावाचं रिपोर्टिंग नको आहे. रसिक मनात भाव जागृत व्हायला हवा आहे. भाव नव्हे तर स्वरभाव हा संगीताचा आत्मा आहे.

किशोरीताई सतत हेच सांगत आल्या. स्वराच्या जितकं निकट जाता येईल तितकं निकट जा – शब्दांत, वाद्यतालात बद्ध अशा अवस्थेपेक्षा निखळ, केवल स्वरूपात स्वराला पहा. स्वर सुंदर आहे. भावमय आहे. प्रावाहिक आहे. चैतन्यमय आहे. दयाळू आहे. समर्थ आहे. वैश्विक आहे. तुमची अनुभूती सुंदर आहे. उत्कट आहे, चैतन्यमय आहे आणि नितळ पारदर्शी सूर त्या तुमच्या जाणीवेचं प्रतिबिंब होऊन आहेत.

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......