“हत्तिणीला मारणं आमच्या हिंदू संस्कृतीत बसत नाही…”
सदर - वास्तव-अवास्तव
संजय
  • केरळमधील फटाके भरलेले अननस खाल्लेली गर्भवती हत्तीण
  • Fri , 12 June 2020
  • सदर वास्तव-अवास्तव प्रकाश जावडेकर Prakash Javadekar गर्भवत्ती हत्तीण pregnant elephant केरळ keral

म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...

..................................................................................................................................................................

मराठी वृत्तवाहिनीचं ऑफिस.

एडिटिंग रूम.

“जावडेकर शोची टाईमलाईन तयार कर. कंटेंट मी देतोय. २२ मिनिटांचा शो आहे” संपादक व्हिडिओ एडिटरला म्हणाले- “योग्य ठिकाणी मध्ये मध्ये व्हिडिओ इन्सर्ट करायचे आहेत. तेवढं तू पहा.”

एडिटर कामाला लागला.

२२ मिनिटांचा शो होता आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद हा कणा होता, हीच शोची टाईमलाईन होती.

एडिटरनं एडिटिंगला सुरुवात केली.

सुरुवातीला जावडेकर हत्ती मेल्याबद्दल अतीव दुःख व्यक्त करतात. म्हणतात, “एकदा माननीय नरेंद्र मोदीजींनाही त्यांच्या गाडीखाली कुत्रं आल्यानं अतीव दुःख झालं होतं. हे आहे आमच्या पक्षाचं नेतृत्व आणि ही आहे आमच्या पक्षाची परंपरा.”

जावडेकरांनी थोडक्यात घटना सांगितली. केरळमध्ये एका मादी हत्तीचा मृत्यू झाला होता. फटाके भरलेला अननस चुकून हत्तिणीनं खाल्ला, फटाक्याचा स्फोट झाला आणि जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

हे कथन चाललं असताना हत्तीण दोरखंडानं पाण्यातून ओढून नेली जात असतानाचा व्हिडिओ एडिटरनं इन्सर्ट केला.

नंतर जावडेकर म्हणाले की, संबंधित गुन्हेगाराला शोधून काढण्यात वुई विल लीव नो स्टोन अनटर्न्ड. हे वाक्य झाल्यावर एका पत्रकारानं काही तरी प्रश्न विचारला. 

एडिटरला वर्गातली शिकवण आठवली. एकच दृश्य एक मिनिटापेक्षा जास्त काळ दाखवता कामा नये, फास्ट एडिटिंग. पटापट दृश्यं बदलली पाहिजेत, बोलता माणूस फार दाखवायचा नाही, दृश्यं इन्सर्ट करायची.

स्टोन अनटर्न्ड म्हणजे दगड आला. त्यानं दगड आणि जावडेकर असे शब्द टाकून सर्च मारला. जावडेकर दगड वरखाली करत आहेत असा व्हिडिओ मिळेना. जावडेकर वृक्षारोपण करताहेत असे अनेक व्हिडिओ मिळाले, पण त्यात दगड कुठं दिसेनात. सर्व प्रयत्न करू असा होता हा जावडेकरांच्या म्हणण्याचा अर्थ, हे काही एडिटरला कळलं नव्हतं, कारण एडिटरला इंग्रजीचं ज्ञान नव्हतं.

दगडाचं व्हिज्युअल न सापडल्यानं निराश झालेला एडिटर पुढं सरकत असतानाच संपादक एडिटिंग रूममध्ये घुसले. त्या क्षणी जावडेकर या घटनेला केरळ सरकारला जबाबदार ठरवत होते. जणू त्या हत्तिणीनं केरळच्या मुख्यमंत्र्यांचं घोडं मारलं होतं आणि त्यासाठी अननसाचा वापर करून त्यांनी हत्तिणीला मारलं होतं.

स्क्रीनकडं पाहून संपादक म्हणाले, “या ठिकाणी केरळच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो घाल, कारण या घटनेला तेच जबाबदार आहेत.”

व्हिडिओ एडिटरनं प्रश्नार्थक मुद्रेनं संपादकाकडं पाहिलं.

“घटना कोणाच्या राज्यात घडली? कम्युनिष्ट पक्षाचं राज्य आहे ना? मग ते जबाबदार नाहीत काय?” संपादक.

“मग आपण नरेंद्र मोदींचाही फोटो टाकूया का? तेही जबाबदार नाहीत काय, त्यांच्याच  देशात ती घटना घडलीय.” व्हिडिओ एडिटर.

संपादकांच्या डोक्यात तिडीक गेली. “गधड्या, तुला राजकारण कळतं की नाही?”

व्हिडिओ एडिटरनं मान हलवली. “सर, मी चार आठवड्याच्या कोर्समध्ये एडिटिंग शिकलो. तिथं आम्हाला राजकारण हा विषय नव्हता. क्लिप्स कशा तोडायच्या, कशा जोडायच्या तेवढंच आम्हाला शिकवलं.”

“मी सांगतो तेवढं कर, गाढव आहेस.” येवढं बोलून संपादक निघून गेले.

एडि़टरनं मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकला आणि पुढं सरकला. आता पुढल्या इन्सर्टसाठी तो जागा शोधू लागला. एक वाक्य आलं, “हत्तिणीला मारणं आमच्या हिंदू संस्कृतीत बसत नाही…”

एडिटरनं यू-ट्यूबवर ‘संस्कृती’ असा सर्च मारला.

एक व्हिडिओ होता कुठल्याशा दंगलीचा. कपड्यांवरून मुसलमान वाटावी अशा माणसांना कपड्यावरून हिंदू वाटावेत अशी माणसं मारत होती. मारहाण करणारी माणसं ‘जय श्रीराम’ अशा घोषणा करत होती. क्लिपमध्ये गुजराती पाट्या असलेली दुकानं दिसत होती. क्लिपचं साल होतं २००२.

एडिटरनं ते बाजूला काढलं.

आणखी एक क्लिप मिळाली. आधीच्या क्लिपसारखीच, माणसं घरात घुसून हाणामारी करत होती, खाणाखुणांवरून दृश्य उत्तर प्रदेशातलं दिसत होतं. ‘जय बजरंग बली’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.

आणखी एक दृश्य मिळालं. बारमधून मुली बाहेर पडत होत्या, भगवे रुमाल डोक्याला बांधलेले लोक त्या मुलींना झोडत होते. रुमालावर ‘श्रीराम सेना’ असे शब्द होते.

हे व्हिडिओ थरारक होते. मुसलमानांना आणि मुलींना ठोकून काढत आहेत, हे एडिटरला जाम आवडलं होतं. तीनही व्हिडिओ एडिटरनं ठिकठिकाणी पसरले.

झालं एकदाचं काम असं म्हणत एडिटरनं हात वर-खाली करून, मागं करून हाडं कडकडा वाजवली.

संपादक यायची वाट पाहत एडिटरनं टीव्हीवर बातम्या लावल्या.

मुझफ्फरपूर स्टेशनावर एक स्त्री मरून पडली होती. दिल्ली का कुठून तरी ती ट्रेननं आली होती. लॉकडाऊनमुळे तिच्यावर, तिच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती, निदान आपल्या घरी तरी जावं असं म्हणून ती दिल्ली सोडून निघाली होती. दोन दिवस ट्रेनमध्ये तिला अन्नपाणी न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला होता. तिच्या दोन-अडीच वर्षाच्या मुलीला आई निपचित का पडलीय ते कळत नव्हतं. ती आईच्या अंगावरची चादर काढत होती, पुन्हा पांघरत होती. ते दृश्य संपलं.

गाठोडी घेऊन रस्त्यावर अनवाणी चालणाऱ्या माणसांचं दृश्य दिसलं. मजूर, त्याच्या खांद्यावर एक मूल, एक स्त्री, तिच्या कंबरेवर एक मूल आणि हाताशी दुसरं मूल. मजूर कुटुंब महाराष्ट्रातून झाडखंडमध्ये निघालं होतं. चालत.

एडिटर ती दृश्य पाहून हळहळत होता.

 संपादक आले.

“कामं सोडून बातम्या काय पहात बसलास? जावडेकर शो तयार झाला का? अरे, तो लगेच टेलेकास्ट करायचाय. त्यांच्या ऑफिसमधून सारखे चौकशीचे फोन येताहेत.”

एडिटरनं तयार झालेला शो दाखवायला सुरुवात केली. केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोपर्यंतची दृश्य त्यानं पाहिली होती. तिथून पुढला भाग दाखव म्हणाला. एडिटर दाखवू लागला.

संपादकाचं खरं म्हणजे लक्षच नव्हतं, तो सेल फोनवर बोलत होता. दंगलीचं दृश्य पाहिल्यावर संपादक जोरात ओरडला, ‘मादरचोद’.

फोनवरच्या माणसाला संपादक म्हणाला, “सॉरी, सॉरी, मी इकडे कार्यक्रम पहात असताना ओरडलो, तुम्हाला नाही बोललो. जरा थांबा, होल्ड करा.”

फोनवर हात ठेवून त्यानं तिन्ही संस्कृती दृश्यं पाहिली.

पुन्हा शिवी हासडून म्हणाला, “माझी नोकरीच जाईल असं नव्हे तर माझं लिंचिंग करतील. तुला काही कळतं की नाही? चालता हो. तुला फायर केलंय. आताच्या आता चालता हो.”

संपादक एवढा का चिडला ते एडिटरला कळलं नाही.

संपादक तणतणत खोलीतून बाहेर पडला.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 13 June 2020

पुढची कथा ऐकायचीये?

मी पोटुशी जनावर वर गूगल सर्च मारला तेव्हा सफूरा झरगरचं नाव आलं. त्यावरून केरळात गर्भवती हत्तींणीस अननसातनं स्फोटकं खायला घालून ठार मारलं होतं त्याची आठवण झाली. त्या गरीब बिचाऱ्या हत्तीणीऐवजी सफूरा झरगर तोंड फुटून मेली असती तर भारताचं अधिक भलं झालं असतं काय, असा विचार माझ्या मनी तरळून गेला. पण अशा सुसंस्कृत विचारापासून लगेच मी स्वत:स सावरलं. त्या अजात बालकाचा काय दोष?

सफूरा जिवंत राहिली पाहिजे व तिचं अपत्य घोर भारतप्रेमी निपजलं पाहिजे. मग जे सफूराचं थोबाड फुटेल त्यास अवघ्या त्रिखंडात तोड नसेल. बघा, पहिला पर्याय जास्त सुसंस्कृत आहे की दुसरा? होऊ द्या वादविवाद.

-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......