‘तैमूर’ या अरेबिक शब्दाशी आपलं भांडणं असण्याचं काही कारण नाही!
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • तैमूर लंग
  • Thu , 22 December 2016
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar तैमूर लंग Timur Lang तारेक फतेह Tarek Fatah इरफान हबीब Irfan Habib करिना कपूर Kareena Kapoor सैफ अली खान Saif Ali Khan

तैमूर लंगडा…चेंगिजखानाइतकाच हिंदुस्थानी लोकांनी ज्याचा धसका घेतला आणि द्वेषही केला असा आक्रमक, क्रूर, लुटारू शासक. त्याचं नाव करिना कपूर-सैफ अली खान या दांपत्यान आपल्या नवजात बाळाला दिलं म्हणून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आले.

चर्चेखोर मंडळी भरमसाठ युक्तीवाद, मुद्दे हिरीरीने मांडत आहे, पण दोन युक्तीवाद महत्त्वाचे आहेत. पहिला, पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी मांडलाय. त्यांनी करिना-सैफ यांना उद्देशून म्हटलं आहे की, ‘अरे बाबांनो, तुम्ही अशिक्षित, अडाणी, घमेंडखोर, अहंकारी आहात काय? ज्याने हिंदुस्थानला लुटलं, त्या क्रूर शासकाचं नाव मुलाला का ‌ठेवलंत? तुम्हाला तैमूरचा काळा इतिहास, कर्मे माहीत नाहीत वाटतं! तुम्ही हे कर्म करून लोकांना काय संदेश देता आहात?’

दुसरी प्रतिक्रिया ख्यातनाम भारतीय इतिहासकार इरफान हबीब यांची आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘तैमूर लंग (लंगडा) याने हिंदू आणि मुसलमान दोघांच्याही कत्तली केल्या. तो हिंदुस्थानी मुस्लिमांचाही द्वेष करी. तो लुटारू शासक होता. हिंदुस्थानची लूट हे त्याचं उद्दिष्ट होतं. त्या उद्देशापायी त्याने इथं काळी कर्मे केली, पण त्याने फक्त हिंदूचीच कत्तल केली हे अर्धसत्य आहे. त्याने इथल्या सर्व हिंदू-मुस्लिम जनतेला त्रास दिला, लुटलं. त्यामुळे भारतीय मुस्लिमांनी कधी तैमूरविषयी प्रेम दाखवलेलं नाही. आणि दाखवायचं काही कारणही नव्हतं.’

हे असं सगळं असलं तरी इरफान हबीब यांचं म्हणणं असं आहे की, तैमूर हे नाव फक्त त्या अत्याचारी शासकाशी जोडलेलं आहे म्हणून कुणी ठेवू नये असं नाही. मुळात तैमूर हा अरेबिक भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ पोलादी, खुद्दार, इमानदार, न वाकणारा, खंबीर असा आहे. या चांगला अर्थ असणाऱ्या अरेबिक शब्दाबरोबर आपलं भांडणं असण्याचं काही कारण नाही. मध्य आशियात अनेक कुटुंबात तैमूर हे मुलाचं नाव ठेवलेलं आढळतं. हबीब यांनी स्वत:च्या हैदर नावाच्या मित्राने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्याचा दाखला दिला आहे.

हे मुद्दे मांडताना हबीब म्हणतात, एखाद्या कुटुंबाचा त्यांच्या मुलाचं नाव ठेवण्याचा अधिकार आपण मान्य केला पाहिजे. भारतात, दक्षिणेत ‘रावण’ हे अनेक मुलांचं नाव ठेवलेलं आढळतं. हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा मामला आहे. इतरांनी त्या मर्जीवर आक्रमण करता कामा नये.

यासारखीच अनेक मतं माध्यमांमधून पुढे येत आहेत आणि आणखीही येतील.

यातून एक दिसतं. आपला समाज सत्तेबद्दल खूप जागरूक दिसतो. चांगल्या सत्ताधाऱ्यांना तो डोक्यावर घेतो, तर वाईट सत्ताधाऱ्यांना पायदळी तुडवू पाहतो. सत्ता या घटकाची जादूच अशी असते. सत्ता लोकजीवन घडवते आणि बऱ्याचदा कुजवतेही. म्हणून सत्ता आणि सत्ताधारी यांच्या वर्तनाबद्दल लोक कमालीचे जागरूक असतात.

करिना-सैफ यांच्या बाळाच्या निमित्ताने तैमूरच्या सत्ताकाळाची, काळ्या कर्माची चर्चा सुरू झाली. तैमूर लंग किंवा तैमूर लंगडा याच्याविषयीचा खरा इतिहास या निमित्ताने समजून घेतला पाहिजे. त्यातून खोट्या गोष्टी खड्यासारख्या बाजूला टाकल्या पाहिजेत. तैमूरला तो लंगडा असल्याने ‘लंग’ हे नाव पडलं. (लंगचा अर्थ लंगडा.) त्याच्या जन्माची ८ एप्रिल १३३६ आणि मृत्यूची १८ फेब्रुवारी १४०५ अशी अधिकृत नोंद आहे.

चौदाव्या शतकातला हा शासक मूळचा मंगोलियन. त्याने तैमुरी राजवंशाची स्थापना केली. त्याचं राज्य पश्चिम आशियापासून मध्य आशिया पादाक्रांत करत भारतापर्यंत पसरलं होतं. त्याची गणना जगातल्या मोठ्या शासकांमध्ये जशी केली जाते, तशीच सर्वांत क्रूर शासकांमध्येही केली जाते. एका पाठोपाठ मोठमोठे विजय मिळवत त्याने अल्पावधीत स्वत:चं साम्राज्य पसरवलं. चेंगिजखान हा त्याचा ‘रोल मॉडेल’ होता.

तैमूरच्या बापानं इस्लाम धर्म कबुल केला आणि दोघे बाप-बेटे मुस्लीम झाले. तैमूर जसा आक्रमक आणि क्रूर होता, तसाच प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षीही होती. क्रूरता आणि प्रतिभा या एकाच माणसात फुलल्या तर काय महान रसायन तयार होतं हे तैमूरकडे पाहिल्यावर कळतं. महत्त्वाकांक्षी आणि आक्रमकता एकत्र आली की, जगाला पायाखाली तुडवत विश्वविजयी होण्याची धुंदी चढते. अशी धुंदी तैमूरला चढली आणि त्याने चेंगिजखानाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा संकल्प केला. सिकंदरसारखा जगज्जेता होण्याचा निर्धार केला.

सैन्यानं कसं वागावं? तैमूरने नियम घालून दिला की, चेंगिजखानाच्या सैनिकी पद्धतीसारखं वागावं. क्रूरपणे आणि निष्ठुरतेनं शत्रूला तुडवत जावं, असा त्याने सैनिकांना हुकूमच केला होता. १३८० ते  १३८७ या फक्त सात वर्षांत तो खुरासान, सीस्तान, अफगाणिस्तान, फारस, अजर बैजार आणि कुर्दीस्तान पादाक्रांत करत हिंदुस्थानमध्ये घुसला.

भारतातल्या सोन्याच्या साठ्यांचं त्याला विशेष आकर्षण होतं. भारतातल्या वैभव आणि समृद्धीच्या लुटीची पूर्ण योजना बनवून त्याने १३९८मध्ये स्वारी केली. त्याची राजधानी समरकंद इथून तो सप्टेंबर महिन्यात सिंधू, झेलम, रावी पार करून ऑक्टोबर महिन्यात मुलतानात आला. मुलतान, पानीपत लुटून लोकांच्या कत्तली करत तो दिल्लीत घुसला. पाच दिवस त्याचं सैन्य दिल्ली लुटत होतं. दिल्लीतून त्याने अनेक शिल्पकारांना कैद करून समरकंदला नेलं. भारतावर राज्य करणं हा त्याचा मुख्य हेतू होता. त्यामुळे त्या लुटीच्या आड जे हिंदू-मुस्लिम येतील, त्यांची कत्तल हा त्याचा खाक्या होता. भारतातून कैद करून नेलेल्या शिल्पकारांकडून त्याने समरकंदमध्ये अनेक आकर्षक, भव्य इमारती बांधल्या. तिथली प्रसिद्ध, भव्य जामा मशिद या शिल्पकारांनीच बांधलेली आहे.

अशा या क्रूर सत्ताधाऱ्याविषयी भारतीय जनमानसात तीव्र भावना असणं साहजिक आहे. पण तरीही ‘तैमूर’ या अरेबिक शब्दाशी आपलं भांडणं असता कामा नये. करिनाला हा इतिहास माहीत आहे की नाही, हे कळायला मार्ग नाही. तिला तैमूर हा भोपाळच्या नवाबाचा वंशज आहे, पाच हजार कोटी रुपयाच्या संपत्तीचा वारस आहे आणि त्यात एक हजार एकर जमीन आहे, याचंच आकर्षण असणं स्वाभाविक आहे. तिच्यातल्या आईला बाकी कशाहीपेक्षा पुत्रप्रेमापुढे इतर मुद्दे गौण वाटतील हेही साहजिक म्हणावं असंच आहे.

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......