सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे!
सदर - सत्योत्तरी सत्यकाळ
परिमल माया सुधाकर
  • मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१८
  • Mon , 26 November 2018
  • सदर सत्योत्तरी सत्यकाळ परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar नोटबंदी Demonetization जीएसटी GST नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP शिवराज सिंग चौहान Shivraj Singh Chouhan

छोटी शहरे व मोठी गावे ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीची केंद्रे! आजूबाजूच्या पाच-पंचवीस-पन्नास छोट्या गावांना, तांड्यांना, वस्त्यांना आर्थिक चक्रात गुंफत स्वत:चे हित साधणारी ही छोटी शहरे व मोठी गावे तशी सामाजिक चर्चाविश्वात थोडी दुर्लक्षलेलीच आहेत. महात्मा गांधींच्या काळात जर भारत खेड्यांमध्ये वसलेला होता, तर आजच्या काळात तो खेड्यांएवढाच महानगरांमध्ये आणि स्वत:ला शहर म्हणण्यात धन्यता मानणाऱ्या मोठ्या गावांमध्ये वसलेला आहे. महानगरांमध्ये जसा खेड्यांमधील मजूर रोजगाराच्या शोधात पोहोचलेला आहे, तसा मोठ्या गावांतील शिक्षित तरुण महानगरांकडे झेपावलेला आहे. त्याच वेळी खेड्यापाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या गावांमध्ये घर करत तिथून शेतीचा गाडा हाकण्यास सुरुवात केली आहे.

अशी ही छोटी शहरे व मोठी गावे म्हणजे तालुक्यांची केंद्रे, मागासलेल्या जिल्ह्यांची मुख्यालये आणि लवकर राजकीय बदल न घडणारी विधानसभा क्षेत्रे आहेत. या गाव-शहरांमधील व्यापारी वर्गांमध्ये जनसंघ व त्यानंतर भारतीय जनता पक्षाने बसवलेल्या बस्तानानेच या पक्षाची ‘बनिया पार्टी’ अशी ओळख प्रस्थापित झाली होती. ज्या काळात भाजप हमखास जमानत जप्त होणारा पक्ष होता, त्या काळात या व्यापारी वर्गाने पक्षाला जिवंत ठेवले होते. या व्यापारी वर्गाच्या राजकीय व्यवस्थेकडून कधी फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्याला धास्ती होती, ती सरकारी अधिकाऱ्यांच्या जाचाची, ज्यापासून इंदिरा गांधींची काँग्रेस त्यांची सुटका करेल असे त्यांना कधी वाटले नाही. शहरांमधील मोठ-मोठे उद्योगपती, सरकारी नोकरवर्ग, सार्वजनिक उपक्रमांमधील नोकरवर्ग, आदिवासी आणि अख्खा ग्रामीण मतदार काँग्रेसच्या बाजूने झुकलेला असताना मोठ्या गावांमधील छोटा व्यापारी भाजपशी मोट बांधत होता.

पुढे-पुढे समाजातील वेगवेगळ्या घटकांना आरक्षण आणि/अथवा वेगवेगळ्या सबसिडी जशा मिळत गेल्या, तसा हा व्यापारी वर्ग भाजपच्या अधिकाधिक जवळ येत गेला. याच व्यापारीवर्गाच्या सहाय्याने भाजपची मातृ-संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदूंच्या सण-उत्सवांचे मोठ्या प्रमाणात बाजारीकरण केले. व्यापाऱ्यांसाठी हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे होते, तर भाजपसाठी राजकीयदृष्ट्या!

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

डॉ. मनमोहन सिंग सरकारद्वारे खुर्दा क्षेत्र परकीय गुंतवणुकीला खुले करण्याच्या प्रयत्नांनी या व्यापारी वर्गाचा काँग्रेस विरुद्धचा राग पराकोटीला पोहोचला होता. १९७० च्या दशकापासून सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात कटुता निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत याची पहिल्यांदा प्रचिती आली होती आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुन्हा तेच दृश्य बघावयास मिळत आहे.

लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेपासून ते नरेंद्र मोदींच्या पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकपर्यंत भाजपच्या प्रत्येक कृतीचा जल्लोष करणारा मध्य प्रदेशातील व्यापारी वर्ग आज भाजप-समर्थक व भाजप-विरोधी गटांमध्ये विभागला गेला आहे. भाजपच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसप्रमाणेच गोर-गरिबांसाठी सबसिडीच्या योजना, विशेषत: स्वस्तात अन्न-धान्य उपलब्ध करून देण्याच्या योजना राबवल्या जाणे या व्यापारी वर्गाला तसे कधीच रुचले नव्हते. मात्र त्याशिवाय त्यांचा पक्ष विजयी होणार नाही हा राजकीय शहाणपणा त्यांच्यात होता. त्याचप्रमाणे, आरक्षण वगैरे लगेच रद्द करणे भाजपला शक्य होणार नाही याची जाणीव या वर्गाला होती.

ज्या तीन मुद्द्यांवरून व्यापारी वर्गाने काँग्रेसशी फारकत घेत भाजपशी घरोबा केला होता, त्यापैकी वरील दोन मुद्द्यांवर व्यापारी वर्गाने स्वत:हून राजकीय तडजोड स्वीकारली होती. मात्र देशातील कोणत्याही सामाजिक गटांकडून मागणी नसताना व अर्थव्यवस्था कोसळण्याची कोणतीही चिन्हे नसताना करण्यात आलेली नोटबंदी आणि घाई-गडबडीने राबवण्यात आलेला जीएसटी यामुळे व्यापारी वर्गाचा संयमाचा बांध तुटला आहे. भाजप सबसिडी व आरक्षणाच्या मुद्द्यावर फार काही ‘दिव्य’ करेल अशी त्यांची अपेक्षा कधीच नव्हती. पण भाजपच्या कार्यकाळात सरकारी अधिकाऱ्यांचा धाक व जाच लक्षणीयरीत्या कमी होईल, एवढी किमान अपेक्षा व्यापारी वर्गाची होती. मोठे उद्योगपती व मोठ्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत कदाचित हे घडलेही असेल, पण छोट्या व्यापाऱ्यांच्या मनातील भीती कैकपटींनी वाढली आहे.

यासाठी मुख्यत: जीएसटीची अंमलबजावणी आणि नोटबंदीनंतर मंदावलेली बाजारपेठ कारणीभूत आहे. प्रत्यक्ष नोटबंदीच्या प्रक्रियेत व्यापारी वर्गाचे काहीच नुकसान झाले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तत्काळ विरोधही झाला नाही. मात्र, नोटबंदीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याचे जे भाकित केले होते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव या व्यापारी वर्गाला वर्षभराने यायला लागला. नोटबंदीला वर्ष होत आले तरी बाजार भरारी घ्यायला तयार नव्हता, तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्याच सुमारास नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली आणि व्यापाऱ्यांमध्ये सरकारकडून छळ होत असल्याची भावना बळावली. जीएसटी वेळेत न भरल्यास आयकर खाते त्रास देईल, दंड भरावा लागेल, सतत जीएसटी भरण्यात खूप वेळ वाया जातो, व्यापाऱ्यांच्या तुलनेत सीएंची संख्या तोकडी असणे, ऑनलाईन प्रक्रियेची सवय नसणे इत्यादी कारणांनी अनेकांना जीएसटी आवडलेला नाही.

आधी होलसेलचा माल विकला न गेल्यास १ टक्के कर कापून परत करण्याची सोय होती, आता तब्बल ५ टक्के जीएसटी बसणार आहे. काँग्रेसच्या काळात हा कर जेव्हा १ टक्क्यावरून २ टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न झाला होता, तेव्हा मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्यांनी त्याला जोरदार विरोध केल्याची आठवण देत आता एकदम ५ टक्के जीएसटी म्हणजे निव्वळ अन्याय असल्याचे छोटे व्यापारी आवर्जून सांगतात.

जीएसटी विरुद्धच्या रोषाचे एक मोठे कारण छोट्या-छोट्या वस्तूंची स्थानिक निर्मिती थांबल्याने फक्त ब्रँडेड वस्तू विकाव्या लागणे हे असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, स्थानिक निर्मिती असलेल्या बल्ब-होल्डरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत ब्रँडेडपेक्षा कमी असल्याने ग्रामीण उपभोक्त्यांमध्ये त्याला जास्त मागणी असते. मात्र, जीएसटीच्या किचकट प्रक्रियेने अशा वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची साखळी कुठेतरी खंडीत तरी झाली आहे किंवा जीएसटी लावल्यानंतर अत्यल्प दरात अशा वस्तूंची निर्मिती आता शक्य नाही. याचा सरळ परिणाम छोट्या व्यापाऱ्यांच्या गल्ल्यावर झाला आहे.

याच्या जोडीला नोटबंदीने व शेतीक्षेत्रातील उत्पन्नात वाढ न झाल्याने आलेली मंदी जाण्याची चिन्हे नसल्याने छोट्या व्यापाऱ्यांची चिंता वाढलेली आहे. आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर अवलंबून असतो, अशी खुली कबुली छोटे व्यापारी देत आहेत. वर्षा-दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातीच फारसे काही लागत नसल्याने त्याचे बाजारहाट करण्याचे प्रमाण घटले आहे.

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अशा वातावरणात नरेंद्र मोदी सरकारने एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने आणलेल्या सुधारणा रद्दबातल केल्याचे या व्यापारी वर्गाला विशेष बोचले आहे. ‘सरकार आमचा छळ करते आहे आणि दलित-आदिवासींना अवाजवी कायदेशीर संरक्षणासह सबसिडी व आरक्षण देत आहे’ या भावनेने उचल खाल्ली आहे. ‘काँग्रेसने वरच्या स्तरावर जो काही भ्रष्टाचार केला असेल-नसेल, पण व्यापाऱ्यांना विनाकारण छळले नाही’ असे सूरसुद्धा काही ठिकाणी उमटत आहेत. पुन्हा भाजपचे सरकार आले तर जीएसटीमध्ये सुधारणा होण्याच्या व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या शक्यता संपुष्टात येतील, ही भावना हळूहळू जोर पकडू लागली आहे.

अर्थात, हे सर्व भाजप-विरोधी उघडपणे बोलू लागलेल्या व्यापारी वर्गाबद्दल खरे असले तरी, भाजपचा समर्थक व्यापारी वर्ग शिवराज सिंह चौहान यांच्या ‘बिजली-सडक-पाणी’ च्या कर्तृत्वावर समाधानी आहे. या समर्थकांच्या बळावर भाजपने अद्याप हार मानलेली नाही. मध्य प्रदेशात ग्रामीण भागाप्रमाणेच छोटी शहरे व मोठ्या गावांमध्ये चुरशीची लढत होते आहे. इथे शिवराज सिंह यांच्यापेक्षा नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणास लागली आहे.

एक तर, भाजपच्या विरोधात जाणारे मुद्दे नरेंद्र मोदींशी संबंधित आहेत, शिवराज सिंह चौहान यांच्याशी संबंधित नाहीत. अधिक महत्त्वाचे, ज्या पायावर भाजपचा विस्तार होत मोदी पंतप्रधान झाले आहेत, तो व्यापारी वर्गाच्या समर्थनाचा पायाच जर त्यांच्या कार्यकालात डळमळीत झाला तर ते नागपूरच्या मुख्यालयात काय तोंडाने जाणार? गुजरात निवडणुकी दरम्यान संपूर्ण सुरतेत आज मध्य प्रदेशातील छोटी शहरे व मोठ्या गावांमध्ये जी स्थिती आहे, तशीच दैना होती. तरीसुद्धा अमित शहांनी सुरतेच्या सर्व जागा भाजपच्या खाती जमा केल्या होत्या. शाह-मोदी जोडगोळी हे संपूर्ण मध्य प्रदेशात साध्य करू शकेल का हा आता लाखमोलाचा प्रश्न झाला आहे.

.............................................................................................................................................

लेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे इथं अध्यापन करतात.

parimalmayasudhakar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......