तोही एक सदोष मनुष्यवध होता, हाही एक सदोष मनुष्यवध आहे…
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 20 September 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar डॉ. दीपक अमरापूरकर Dr Deepak Amrapurkar मॅनहोल Manhole

सध्या राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव, वाढती महागाई, वाढते कर आणि नारायण राणेंची नाराजी, तर सेनेचा अल्टिमेटम अशा विविध बातम्यांनी माध्यमांचं चर्चाविश्व व्यापलंय.

या गदारोळात एक छोटेखानी बातमीकडे अनेकांचं दुर्लक्ष झालेलं दिसतं. मुळातली ही पहिल्या पानावरची बातमी आता आतल्या पानात गेलीय. वर्तमानपत्रात आतल्या पानात गेलेली बातमी, वृत्तवाहिन्यांवर दिसणं दुर्लभ.

२९ ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे व मुंबईचे प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा साचलेल्या पाण्यातून पाच मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या घराकडे जाताना उघड्या गटारात पडून करुण अंत झाला. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळीला सापडला. उद्धव ठाकरे यांनी आठ-नऊ फुटांचा ढग मुंबईवरून गेला आणि झाली त्यापेक्षा मोठी हानी होण्यापासून मुंबई वाचली आणि २९-२९-३० ऑगस्ट रोजी जे घडलं ते नैसगिर्क आपत्ती या सदराखाली दप्तरबंद केलं. पालिका आयुक्तांनी त्यांना साथ दिली. राज्य सरकारनं आपत्ती निवारणाचं नैमित्तिक सोपस्कार पार पाडले. सेना-भाजपनं आपापली पक्षीय गरळ ओकून घेतली.

मुंबईनं एक मोठा आणि तुलनेनं तरुण तज्ज्ञ डॉक्टर गमावल्यानं डॉ. अमरापूरकर यांच्या बेपत्ता होण्याची बातमी दोन दिवस प्रसारमाध्यमांत ठळकपणे येत राहिली. अनेक तर्क-वितर्क आणि चमत्कारांच्या भाबड्या आशेला दोन दिवसांनी पूर्णविराम मिळाला, जेव्हा वरळीला त्यांचा मृतदेह सापडला.

घरी जाण्यासाठी स्वत:च्या वाहनातून उतरून डॉक्टर निघाले ती जागा आणि नंतर सापडलेला त्यांचा मृतदेह यातून उघड्या मेनहोलमध्ये पडून प्रचंड पाण्याच्या ओघात डॉ. अमरापूरकर वाहून गेले आणि त्यांचा करुण अंत झाला हे स्पष्ट झालं. काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. सरकारनं मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष पथक, समिती गठित केली. त्याच्याही बातम्या आल्या.

१९ सप्टेंबरच्या वर्तमानपत्रात या चौकशीची बातमी जी आतल्या पानात आलीय, ती वेगानं तपास केल्याबद्दल अभिनंदनीय आहे. पण त्याचवेळी त्यातल्या सामाजिक वास्तवानं हादरवणारी आहे. शिवाय व्यवस्थेची तत्परता ‘नाही रे’ वर्गाच्या मुसक्या आवळण्यात किती प्राधान्यानं धडपड करते हे दिसून येतं.

बातमीप्रमाणे पोलिसांनी त्या जागेजवळील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, पण काही हाती लागलं नाही. मग पोलिसांनी आजूबाजूचे नागरिक, खबरे यांच्याकडून माहिती जमवायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांना तपासाचा पुढचा धागा मिळाला. तो धागा असा होता – घटनास्थळापासून जवळच कामगारनगर नावाची रस्त्यावरची वसाहत आहे. किती जुनी माहीत नाही. पण इथं पाणी साचतं आणि ते पाणी कामगारनगराच्या घरांत शिरतं. पूर्वी काही ठराविक सखल भागात पाणी तुंबायचं. यंदाच्या पावसात ठाण्या-मुंबईच्या नवीन कॉम्प्लेक्समध्येही पाणी शिरलं. असं पाणी शिरलं की, माणसं बादल्या, मिळेल ते सामान घेऊन पाणी बाहेर काढतात. ज्यांना परवडतं ते पंप लावून काढतात. साध्या झोपडीधारकांचंही १०-२० हजारांचं नुकसान सहज होतं.

कामगारनगरात पाणी साचणं हा नित्यनेम. पण म्हणून आहे ती घरं सोडून कुठे जाणार? नेहमीच्या या आजारावर तिथल्या मुलांनी आपल्या पद्धतीनं एक प्रथमोपचार शोधून काढला. तो म्हणजे पाणी साचलं की, गटाराचं झाकण काढायचं. हा प्रथमोपचार लागू पडायचा आणि झाकण काढलं की पाणी ओसरून जायचं. २९ ऑगस्टलाही त्यांनी हेच केलं, पण नैसर्गिक  आपत्तीच एवढी मोठी होती की, पाणी ओसरण्याऐवजी वाढलं. ते एवढं वाढलं की रस्ता कुठे, गटार कुठे हे कळणं अशक्य होऊन गेलं. दुर्दैवानं डॉ. अमरापूरकर त्या उघड्या गटारात पडले आणि वाहून गेले. कामगारनगरचा प्रथमोपचार डॉ. अमरापूरकरांसाठी जीवघेणा ठरला.

गटाराचं झाकण काढल्याची बातमी तपासात मिळताच पोलिसांनी कामगारनगरातून सिद्धेश भेसलेकर, राकेश कदम, नीलेश कदम (हे दोघेही भाऊ भाऊ), दिवार पवार या चौघांना अटक केली. त्यांचे दोन साथीदार (!) फरार आहेत. त्यांचा शोध चालू आहे असं बातमी सांगते. पण या बातमीतील सर्वांत धक्कादायक व खळबळजनक  बाब म्हणजे पोलिसांनी या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय!

पोलिसांची ही तत्परता डॉ. खोलेबाईंची तक्रार घेताना दिसून आलीच होती. पण वस्तीतल्या या पोरांवर थेट सदोष मनुष्यवधाचंच कलम काय म्हणून लावलं? आणि जे तर स्पष्ट झालं तर मग रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यासाठी कंत्राटदार, पालिका, आयुक्त, वार्ड ऑफिसर यांपैकी किती जणांवर आजपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावलाय?

सिंधुदुर्गातला आंबेडकरी आणि सांस्कृतिक चळवळीतला उत्तम पवार नावाचा तरुण कार्यकर्ता वर्षभरापूर्वी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे स्वत:चा जीव गमावून बसला. संतप्त गावकरी व कार्यकर्ते अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. सार्वजनिक बांधकाम खातं व संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय. पण पोलिसांनी उत्तमच्या पत्नीवर (जी पोलिस दलातच कार्यरत आहे) परिस्थितीजन्य दबाव आणून, गुन्हा दाखल न करताच अंत्यसंस्कार करायला भाग पाडलं. उत्तमच्या आधीही तिथं दोघाजणांना जीव गमवावा लागला होता.

कोकणातच सावित्री नदीवरचा पूल पडला. अनेकांना जलसमाधी मिळाली. डॉ. अमरापूरकरांचा देह तरी मिळाला, त्या अपघातात तर आठ दिवस वाट पाहून नातेवाईकांनी नदी किनारा साश्रु नयनांनी सोडला.

सावित्री नदीवर विक्रमी वेळात नवा पूल बांधूनही झाला, त्याचा लोकार्पण सोहळा झाला. पण जे गेले त्यांच्या मरणाबद्दल कुणाकुणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय?

कामगारनगरातल्या चार मुलांनी गटाराचं झाकण काढणं, गटार उघडं ठेवणं, तिथं कसलीही धोक्याची सूचना न ठेवणं हा अक्षम्य अपराधच आहे. त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवीच. पण थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा?

हे करताना त्यांनी काही डॉक्टरांच्या मागावर राहून ते त्या गटारात पडतील अशी काही योजना आखली होती का? डॉ. अमरापूरकरांच्या ऐवजी कामगारनगरातीलच कुणी म्हातारा, लहान मूल वाहून गेलं असतं तर?

भांडवलशाही विकासात जे विविध वर्ग तयार होतात, ते एकमेकांना परस्परपूरक असतात. जे टॉवर उभे राहतात, त्याच्या शेजारच्या एसआरए इमारतीतून पेपरवाला, कामवाली, गाडी धुणारे, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांचा पुरवठा होत असतो. शहराकडून शहराकडे स्थलांतरित होणारा शिक्षित, उच्चवर्ग असतो, तसा खेड्याकडून शहराकडे स्थलांतरित होणारा मजूर वर्ग असतो. मतांच्या राजकारणात त्यांच्या वस्त्या वसवल्या जातात. त्यांना वीज, पाणी आणि स्थानिक गुंडांचं सशुल्क संरक्षण देण्यात येतं. पोलिसांचीही हप्तेबाजी चालू राहते. ‘जीवो जीवस्य जीवनम’ या न्यायानं व ‘बळी तो कान पिळी’ या वृत्तीनं ही शहराच्या काखा-जांघातलं बांडगुळं इथली व्यवस्थाच वाढवत असते. आणि मग शेणातला किडा जसा त्यातही जगण्याचे मार्ग शोधतो, तसे या वस्त्या जगण्याचे मार्ग शोधतात.

पोलिस चौकशीत हे स्पष्ट झालंय की, याआधीही पाणी तुंबलं की गटाराची झाकणं काढून आपली घरं वाचवणं हा या वस्तीचा नित्यनेम होता. याचा अर्थ जगण्याचं रूपक म्हणून सांगितली जाणारी माकडीण व तिच्या पिलाची गोष्ट आणि या मुलांनी गटाराची झाकणं काढणं यात मूल्यात्मक फरक काय? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर नक्की दाखल करायला हवा?

महापालिका स्तरावर जे आरोप-प्रत्यारोप चालू होते, त्यात एक गोष्ट सांगितली जात होती सतत की, गटाराच्या तोंडाशी झाकणाखाली लोखंडी जाळी हवी. कारण अनेकदा सफाई कामगारांना किंवा अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी ही झाकणं काढावी लागतात. अनेकदा झाकण काढल्यावर तिथं धोक्याचा बावटा लावला जातो. काही वेळा राहून जातो. व्यवस्थापन, प्रत्यक्ष अमलबजावणी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा हा सरकारी गटार, रस्ते, पाईपलाईन, इस्पितळ अगदी स्मशानातही आढळतो. नाशिकच्या बालमृत्यूंसाठी कुणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच रस्ते अपघाताची आकडेवारी जाहीर केली, त्यातील रस्ते व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे किती, याचा तपशील त्यांनी जाहीर केला असता तर बरं झालं असतं.

डॉ. अमरापूरकरांचा मृत्यू चटका लावणारा आहेच, पण त्यासाठी केवळ गटाराचं झाकण काढणारे चार-सहा तरुण पकडून त्यांना मनुष्यवधाचं कलम लावणार? त्याच पावसात आणखी काही जण वाहून गेले असतील ज्यांची नोंदच नाही. त्यांचं काय करणार?

त्या मुलांना सोडून द्या, त्यांना शिक्षा नको, ती रस्त्यावर राहतात, गरीब आहेत अशा ढाली यानिमित्तानं पुढे करायच्या नाहीत. पण त्यांनी झाकणं काढलं नसतं आणि वस्तीच, आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला असता तर?

मागे अंधेरी स्टेशनजवळ एक पाईपलाईन फुटून बाजूंच्या वस्तीतील मुलं वाहून गेली होती. वस्ती पातळीवर होणाऱ्या अशा नैसर्गिक आपत्तीची नोंद झाली तर झाली, नाही तर ‘दर्या में खसखस’ सारखं शहर चालू राहतं.

शेवटी एकच वाटतं, या सहा पोरांच्या बचावासाठी दिल्लीहून अॅड. हरिश साळवे येण्याची शक्यता नाही. ज्यांनी सलमानला तासात जामीन मिळवून दिला होता. आणि त्या आधी तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल नव्हता केला. तो नंतर माध्यमांच्या दबावानंतर दाखल केला गेला. पुढे त्या प्रकरणात काय व कसं घडत गेलं आपण पाहिलंच.

राजेश खन्नाचा एक प्रसिद्ध संवाद आहे – “वो भी एक दौर था, ये बी एक दौर है.”

त्याच लयीत म्हणता येईल – “तोही एक सदोष मनुष्यवध होता, हाही एक सदोष मनुष्यवध आहे.”

देखते हैं आगे आगे होता है क्या…

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......