परान्जोय गुहा ठाकुरता, निखिल वागळेंवर सत्तेचा बहिष्कार का आहे?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • परान्जॉय गुहा ठाकुरता, ईपीडब्ल्यू, सडेतोड आणि निखिल वागळे
  • Thu , 27 July 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar परान्जॉय गुहा ठाकुरता Paranjoy Guha Thakurta ईपीडब्ल्यू Economic & Political Weekly सडेतोड Sadetod निखिल वागळे Nikhil Wagle टीव्ही 9 TV 9 रामचंद्र गुहा Ramchandra Guha

परान्जॉय गुहा ठाकुरता यांना ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ (ईपीडब्ल्यू)चं संपादक पद सोडावं लागणं आणि निखिल वागळे यांचा ‘सडेतोड’ हा डिबेट शो टीव्ही-9 या वृत्तवाहिनीनं तडकाफडकी बंद करणं, या दोन घटनांतून प्रसारमाध्यमांमध्ये सत्ता कसा हस्तक्षेप करतेय हे समोर आलं आहे. ठाकुरता आणि वागळे हे दोन्हीही ज्येष्ठ संपादक काही साधेसुधे नाहीत. ठाकुरता हे त्यांच्या शोध-पत्रकारितेसाठी जगभर ओळखले जातात. अदानी, अंबानी उद्योगसमूहांच्या विविध प्रकल्पांमध्ये काय काळंबेरं आहे, सत्ता या लोकांना कशी पाठीशी घालते आणि भारतीय जनतेचे करोडो रुपये घशात घालून हे उद्योग कसे नवनवी उड्डाणं घेत आहेत, याचा पर्दाफाश ठाकुरता यांनी न घाबरता सतत केला आहे.

निखिल वागळे हे स्वतंत्र भूमिका घेणारे निर्भिड संपादक म्हणून ओळखले जातात. ‘आपलं महानगर’, ‘आयबीएन लोकमत’, ‘महाराष्ट्र – 1’, अशा विविध प्रसारमाध्यमांत त्यांची पत्रकारिता महाराष्ट्रानं पाहिली आहे. सत्तेवर कुणीही असो त्यांची चिकित्सा करत लोकांची बाजू, हित पुढं मांडणं हे वागळे यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. काँग्रेस असो की शिवसेना असो, सर्वांची चिकित्सा त्यांनी केली आहे. प्रश्न विचारण्याचा, खरं बोलण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे उदंड चाहते आहेत, तसेच काही द्वेष करणारेही आहेत.

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर सनातन संस्थेचे वाभाडे काढण्याचं धाडस वागळे यांनी केलं होतं. त्यामुळे ते सनातनच्या हिटलिस्टवर सतत राहिले आहेत. पोलिस तपासात ही गोष्ट पुढे आली होती.

अशा या दोन स्वतंत्र वृत्तीच्या संपादकांना सत्तेच्या बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. पण मुद्दा केवळ या दोघांपुरता मर्यादित नाही. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी सप्टेंबर २०१३पासूनच प्रसारमाध्यमांना मॅनेज करायला सुरुवात केली होती. भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आणि प्रसारमाध्यमांतल्या स्वतंत्र वृत्तीच्या संपादकांवर कुऱ्हाड चालवणं सुरू झालं. तदनंतर लगोलग ‘हिंदू’ या आघाडीच्या इंग्रजी दैनिकातून सिद्धार्थ वरदराजन यांना बाहेर पडावं लागलं. पी. साईनाथ यांना याच ‘हिंदू’मधून ‘रुरल इंडिया एडिटर’ हे पद गमवावं लागलं. ‘नेटवर्क 18’ हा माध्यमसमूह अंबानींनी घशात घातल्यानंतर तिथले संपादक राजदीप सरदेसाई, सागरिका घोष यांना बाहेर पडावं लागलं. याच टीमचा भाग असलेल्या निखिल वागळे यांनाही जून २०१४मध्ये ‘आयबीएन-लोकमत’चा राजीनामा द्यावा लागला.

काही महिन्यांपूर्वी एनडीटीव्ही या प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक-मालक असलेल्या प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयनं धाड टाकली होती. प्रणव रॉय आणि रविशकुमार यांची पत्रकारिता दाबण्यासाठी ती होती हे आता लपून राहिलेलं नाही.

‘आम्हाला प्रश्न विचाराल तर तुमची बरी गत नाही’ हे सांगण्याचा प्रयत्न सत्ताधारी या अशा कारनाम्यांतून करत आहेत. याउलट ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी, रजत शर्मांचा ‘इंडिया टीव्ही’ अशा तद्दन आगलावू बातम्या देणाऱ्या, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा स्टोऱ्या बनवून त्या प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर सरकार काहीही कारवाई करताना दिसत नाही. उलट त्यांना मोकळं रान निर्माण करून देत आहे. हा पक्षपात आता उघड दिसू लागलाय.

सत्ताधाऱ्यांची मीडिया मॅनेजमेंटची कलाबाजी वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सपोज होताना दिसते आहे. केंद्र सरकारनं आतापर्यंत ११०० कोटी रुपयांच्या जाहिराती वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांना दिल्या आहेत. हा आकडा मोठा आहे. एकेका वृत्तवाहिनीच्या आणि वर्तमानपत्रांच्या मालकाला यातले पाच-दहा कोटी नक्कीच मिळाले असतील. एवढी मोठी रक्कम मिळाली तर कोण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारेल?

माध्यमांना मॅनेज करण्याची सत्ताधाऱ्यांची कलाबाजी कशी आहे? निखिल वागळे सांगतात, ‘सत्ताधाऱ्यांनी जे पत्रकार त्यांचं ऐकतील, पूरक भूमिका घेतील त्यांना संपादक किंवा इतर महत्त्वाच्या पदावर माध्यमसमूहामध्ये बसवलं. जे कुंपणावरचे पत्रकार आहेत त्यांना प्रलोभनं दाखवून आपल्याजवळ घेतलं. मात्र जे आपलं ऐकणार नाहीत त्यांना दूर केलं. त्यांच्या नोकऱ्या जातील अशी व्यूहरचना केली. आता मराठीत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यासारखे मोजके अपवाद उरलेत. जे स्वतंत्र भूमिका घेऊ शकतात. इतर कुणी मला फारसं दिसत नाही.’

राज्यातला भाजप सरकारचा कारभार किती विसंगतीनं भरलेला आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं कर्जमाफी जाहीर केलीय. पण सरकार दररोज भूमिका बदलतंय. किती रुपयांची कर्जमाफी होणार? किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार? सगळं गोल गोल आहे. प्रसारमाध्यमं त्याविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. वस्तुस्थिती पुढे आणत नाहीत.

संपादकांवर सत्ताधारी दबाव कसा आणतात याचा अनुभव निखिल वागळे यांनी घेतलाय. त्याविषयी ते सांगतात, ‘मी ‘आयबीएन-लोकमत’मध्ये होतो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांच्या सरकारी घरांची बातमी आम्ही चालवली. मला स्वत: जावडेकरांनी फोन केला. त्यानंतर मालक दर्डा यांचा समजावणीचा फोन आला- ‘आता सत्ताबदल झालाय. आपल्याला काळजी घ्यावी लागेल’. दुसरा अनुभव ‘महाराष्ट्र-1’ या वृत्तवाहिनीमध्ये आला. जनता सहकारी बँकेनं ‘महाराष्ट्र-1’च्या जाहिरात विभागाला सांगितलं की, ‘वागळे संपादक असतील तर जाहिरात मिळणार नाही.’ ही बँक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. सत्ता इतक्या विविध स्तरावर दबाव आणते. खरं म्हणजे मी काँग्रेस सरकारवरही खूप टीका केली. त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं वेशीवर टांगण्यात सतत पुढे राहिलो. त्यावेळी भाजप, संघवाले खुशीत असत. त्यांच्यावर टीका करायला लागलो तर त्यांना रूचेना, पचेना.’

माध्यमातल्या या अघोषित आणीबाणी विरोधात विविध स्तरावर आवाज उठू लागलेत. मार्च २०१७मध्ये जनता दल युनायटेडचे खासदार शरद यादव यांनी माध्यमसमूहांच्या मालकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या मिलिभगतचा पर्दाफाश राज्यसभेत एक भाषण करून केला होता. माध्यमसमूहांचे मालक आणि सत्ताधारी संगनमत करून सत्य, वस्तुस्थिती जनतेपासून लपवण्याचा कट करताहेत. लोकशाहीला धोका पोहचवू पाहत आहेत, असं प्रतिपादन शरद यादवांनी केलं होतं.

ठाकुरता-वागळे यांच्यावरील दबावानंतर ज्येष्ठ विचारवंत रामचंद्र गुहा, इरफान हबीब यांनी सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ठाकुरता यांना पाठिंबा देण्यासाठी तर जगातले १५५ विचारवंत पुढे आले. त्यात डॉ. अमर्त्य सेन व अँगस डिटस हे दोन नोबेल पारितोषिक विजेते विद्वान आहेत.

ईपीडब्ल्यूचा राजीनामा दिल्यानंतर ठाकुरता यांनी एक मुलाखत दिलीय. त्यात त्यांनी म्हटलंय ते तर संतापजनक आहे. त्यांनी म्हटलंय की, ‘राजीनामा दिल्यानंतर मला सांगितलं गेलं की, अदानी विरोधातले ते दोन लेख काढून टाकेपर्यंत तुम्हाला ऑफिसमधून बाहेरही जाता येणार नाही.’ म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला जशी वागणूक द्यावी, तशी समीक्षा ट्रस्टसारख्या प्रतिष्ठित माध्यमाकडून ठाकुरता यांना दिली गेली.

विद्यमान सत्ताधारी २०१९च्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत. भाजप नेते राम माधव यांनी म्हटलंय की, देशावर पुन्हा आमची सत्ता आणायचीय. देशातल्या सर्व राज्यांतही आमची सत्ता येईल. म्हणजे त्यासाठी खूप घनघोर तयारी करावी लागेल, हे उघडच आहे. या तयारीत जनमत घडवण्यात प्रसारमाध्यमांची खूप मोठी मदत होणार हे चतुर सत्ताधाऱ्यांना स्वानुभवातून माहीत आहेच. त्यासाठी प्रसारमाध्यमांमध्ये सर्व आपल्या बाजूनं आलबेल असावं अशी डागडुजी सुरू आहे. हे प्रत्येक राज्यात बघायला मिळतंय. ठाकुरता-वागळे यांच्यावरचा बहिष्कार हा त्या चतुर तयारीचा एक भाग दिसतोय.

सत्ता कितीही बळकट असो, लोकांचा तिला कितीही भरघोस पाठिंबा असो, ती आरशात तोंड बघायला घाबरते म्हणतात. कारण भीती असते, खरी प्रतिमा दिसण्याची.

काय लपवायचं आणि काय दाखवायचं याचे सत्ताधाऱ्यांचे हिशेब स्पष्ट असतात. हिशेब धुळीस मिळवण्याची क्षमता आरशात असते. ठाकुरता-वागळे हे लोक असे आरसे घेऊन हिंडतात. सत्ताधाऱ्यांना दाखवतात. तेच सत्ताधाऱ्यांना नको असतं. म्हणून त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकला जातो.

या बहिष्काराविरोधात सर्वांनी बोललं पाहिजे. अन्यथा बहिष्काराचं जाळं वाढत राहील. त्यात स्वतंत्रवृत्तीचा प्रत्येक माणूस सापडणार नाही कशावरून?

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Kumar Bobade

Thu , 27 July 2017

ही तर सुरुवात आहे,सत्तेसाठी कोणाचाही आवाज दाबण्याची त्यांची तयारी आहे।


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......