‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ : फुटत जाणाऱ्या शहरांच्या गोष्टी
शहरं प्रसरण पावत जातात, फुटतात. माणसांचा लोंढा आणि त्यांनी विकासाच्या नावाखाली केलेलं अतिक्रमण त्यांना झेपत नाही, तेव्हा शहरं पहिला बळी माणसांचाच घेतात. जवळच्या नात्यांमध्ये येणारा दुरावा, प्रत्येकाला हवी असणारी स्वतःची स्पेस, आत्मकेंद्री जगणं, ज्याला मी स्वतःही अपवाद नाही, अशा सगळ्या गोष्टी त्याचाच परिपाक म्हणून समोर येतात.......