‘ठरवून केलेल्या लग्ना’च्या मुळांचा शोध… ‘मनुस्मृती’पासून ‘इंडियन मॅचमेकिंग’पर्यंत…
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अदरिजा रॉयचौधरी
  • ‘इंडियन मॅचमेकिंग’ वेबसिरीजमधील एक दृश्य
  • Tue , 04 August 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र इंडियन मॅचमेकिंग ठरवून केलेले लग्न arrange marriage वेबसिरीज Web series

काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहत होतो. तेव्हा श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय सामाजिक-सांस्कृतिक संस्कृतीने प्रभावित झालेल्या जिज्ञासू परकियांना वारंवार भेटायचो. सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीला भारतीय आहार, चित्रपट आणि कुटुंब अशा अनेक भारतीय सामाजिक-सांस्कृतिक परंपरेबद्दल प्रचंड मोठं आकर्षण आहे. असं असलं तरीही निःसंशयपणे, या सगळ्या चर्चांच्या वेळी सर्वांत जास्त चर्चा कोणत्या विषयाची होत असेल तर ती ‘कांदे-पोहे लग्ना’ची.

मला आठवतं की, आमच्या प्राध्यापिकेसोबत माझी खूपच वादावादी झाली होती. त्यांचं म्हणणं होतं, त्यांनी भारताबद्दल जे काही वाचलं, त्यामुळे त्यांना भारताबद्दल प्रचंड घृणा निर्माण झाली. उदा., भारतातील दारिद्रय, अस्वच्छता, प्रचंड गर्दीनं भरलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, झोपडपट्टया इत्यादी इत्यादी. तरीही आयुष्यात किमान एकदा तरी भारताला भेट देऊन भारतीय विवाहसोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.

भारतीय विवाहसोहळा, विशेषतः ‘ठरवून केलेल्या लग्ना’बद्दल पश्चिमेकडील देशांमध्ये फारच आकर्षण दिसून येतं. अलीकडे ‘इंडियन मॅचमेकिंग’ या नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना वैवाहिक जीवनासाठी जोडीदार मिळवण्याच्या भिन्न अशा भारतीय पद्धतीचं ओझरतं दर्शन घडवलं आहे. ही वेबसिरीज खास आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी बनवल्याचं दिसतं. मुंबईस्थित वधू-वरांना एकत्र आणणारं ‘सुटेबल रिश्ता’ नावाचं एक विवाहमंडळ आहे. त्या सिमा टपारिया चालवतात. त्या या बेवसिरीजच्या नायिका आहेत. त्याचं म्हणण असं आहे- ‘‘भारतात विवाह हा एक फारच मोठा उद्योग आहे.’’ आठ भागाची ही वेबसिरीज आहे. तिच्या नायिका टपारिया यांचा ग्राहक प्रामुख्याने भारतातील धनाढ्य कुटुंब आणि परदेशस्थ भारतीय हा आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

टपारिया भारतातील विवाह संकल्पनेची ओळख पुढील शब्दांत करून देतात - ‘‘भारतात विवाहाला ‘ठरवून केलेल्या लग्न’ असं आम्ही म्हणत नाही. अगोदर विवाह होतो आणि त्यानंतर प्रेमविवाह होतो. हा विवाह दोन कुटुंबांमधील असतो. या दोन कुटुंबांची स्वतःची प्रतिष्ठा असते आणि त्यामध्ये लक्षावधी रुपयांचे भागभांडवल पणाला लागलेले असते. म्हणून आई-वडील त्यांच्या मुला-मुलींना मार्गदर्शन करतात… आणि हेच वधू-वर जोड्या जुळवून देणाऱ्याचंही काम असतं.’’

या वेबसिरीजमध्ये टपारिया आणि त्यांचा ग्राहक वर्ग गोरा रंग, उंच व सुंदर जोडीदार, लवचीकता व तडजोड, कुंडली जुळणे इत्यादींबद्दल आग्रही असल्याचं दिसतं. या वेबसिरीजवर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. विवाहाचं असं समस्याग्रस्त चित्रण व्हायला नको, असं अनेकांचं मत त्यामधून व्यक्त झाल्याचं दिसून येतंय. त्याच वेळी या वेबसिरीजने ‘कांदे-पोहे लग्ना’च्या मूळ पद्धतीवरही चर्चा सुरू केली आहे.

‘ठरवून केलेल्या लग्ना’ची प्राचीन परंपरा

हे गंमतीशीर आहे की, प्राचीन काळापासून भारतीय कला-साहित्य प्रणय व मोह यांनी व्यापलेलं आहे. परंतु असं असलं तरी, विवाहासारख्या विषयात कुटुंबांमधील वयस्कर मंडळींनी घेतलेल्या निर्णयाला कमालीचं महत्त्व दिलं जातं. भारतामधील विवाहसंस्थेवर काम करणारे समाजशास्त्रज्ञ यावर सहमती व्यक्त करतात की, जात-शुद्धता टिकवून ठेवण्याच्या कल्पनेमधून ‘कांदे-पोहे लग्ना’ची कल्पना पुढे आली आहे.

अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मैत्रीश घातक आणि जीनी लॅफोर्च्यून यांनी विवाहातील अर्थकारणावर २००९मध्ये एक अभ्यास केला होता. तो असं सांगतो की, ‘‘या निर्णयाचं आर्थिक महत्त्व असलं तरी ‘प्रतिष्ठे’सारख्या गुणविशेष असलेल्या गोष्टी – उदा. भारतात जात - विवाह निर्धारित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसून आलं… भारतात अलीकडे झालेल्या मत चाचणीमध्ये ७४ टक्के उत्तरदात्यांनी आंतरजातीय विवाहास नकार दिलाय.’’ पुढे ते असंही म्हणतात की, “अगदी आता देखील वृत्तपत्रातील विवाहाच्या जाहिराती या सातत्याने जातीच्या कॉलममध्ये विभागल्या जात असल्याचं दिसतं.”

‘मनुस्मृती’च्या आधारे हिंदूंमधील जात विभागणी करण्यात आली होती. हा ग्रंथ भारतातील प्राचीन समाजाने समजून घेतलेल्या विवाहपद्धती संदर्भात एक गंमतीशीर मर्मदृष्टी देतो. मानसशास्त्रज्ञ टुलिका जैस्वाल यांनी ‘A Social Psychological Perspective’ या त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे की, ‘‘विवाह हा काही एका व्यक्तीचं व्यक्तिगत सुख नसून ते एक सामाजिक कर्त्यव्य आहे, असं मनुस्मृती मानते.’’

..................................................................................................................................................................

हेही वाचा :  ‘नव-उदारमतवादी युगा’चा अंत होऊ घातलाय. आता पुढे काय?

..................................................................................................................................................................

इ.स.पूर्व २०० ते इ.स. ९००च्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या हिंदू धर्मशास्त्र-पुराणांनी वैवाहिक जोडीदार मिळवण्याच्या आठ भिन्न मार्गांची यादी दिली आहे. ब्रह्म, दैव, अर्श, प्रजापत्य, असूर, गांधर्व, राक्षस आणि पैशाचा, असे विवाहाचे आठ प्रकार हिंदू धर्मग्रंथांमध्ये आहेत. या पैकी पहिल्या चार विवाहांनाच ‘धार्मिक विवाह’ म्हणून मान्यता होती. उर्वरित चार विवाह हे स्त्रीला पळवून नेण्यामधून निर्माण झालेले होते. ‘‘पहिले चार विवाह हे ठरवून केलेल्या विवाहाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये माता-पिता विधिवतपणे त्यांची मुलगी सुयोग्य वर-मुलास देतात. हा आदर्श हिंदू समाजात आजही टिकून आहे,’’ असं समाजशास्त्रज्ञ गिरीराज गुप्ता त्यांच्या ‘Love, Arranged Marriage And The Indian Structure’ या लेखात नमूद करतात. गुप्ता पुढे असं विशद करतात की, हिंदूमधील ठरवून केलेल्या विवाहाच्या धार्मिक व जातीय गुणविशेषांच्या उलट भारतातील मुस्लीम आणि ख्रिश्चनांनी विवाहाकडे एक ‘सामाजिक करार’ म्हणून पाहिलं आहे. असं असलं तरीही त्यांच्यातलेही बहुतेक विवाह त्यांच्या कुटुंबीयांनी ठरवलेले असतात. 

त्याच वेळेला ठरवून केलेल्या विवाहाची संकल्पना राजकीय आणि आर्थिक गरजांमध्ये खोलवर रुजलेली होती. सबिता सिंह या लेखिकेनं मध्ययुगीन राजस्थानातील विवाहाचा सखोल अभ्यास करून असं लिहिलं आहे की, राजकीय विवाह हे मुख्यतः राज्य निर्मितीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य होते. तेव्हा स्वतःच्या भूप्रदेशाचा विस्तार करण्यासाठी, शत्रुत्व नष्ट करण्यासाठी आणि सत्ता व प्रतिष्ठा वाढवण्यासाठी  वैवाहिक युती वापरली जायची… अशा वैवाहिक युतींच्या उत्क्रांत होणाऱ्या तऱ्हांनी मध्ययुगीन राजकीय उतरंडीमध्ये रजपूत वंशाच्या बदलणाऱ्या प्रतिष्ठेला प्रतिबिंबित केले.’’ 

त्या पुढे असं लिहितात की, ‘‘जेव्हा पंधराव्या शतकाच्या मध्यामध्ये मारवाडचे राठोड बलशाली व प्रतिष्ठित झाले, तेव्हा राठोड घराण्याशी वैवाहिक संबंध जोडण्यास इतर राजांनी उत्सुकता दाखवली. अगदी याचप्रमाणे शेखावत आणि बघेला यांच्यासारख्या वंशजांचे मुघलांच्या मनसबदारी व्यवस्थेत आगमन होताच त्यांची वाढलेली प्रतिष्ठा वैवाहिक आखाड्यात प्रतिबिंबित झाली.’’

युद्ध आणि भूप्रदेशीय महत्त्वाकांक्षा ही राज्यकर्त्यावर्गातल बहुपत्नीत्वामागील सर्वांत मोठी कारणं होती. सिंग यांनी त्यांच्या संशोधनात असंही निरीक्षण नोंदवलंय की, ‘‘बहुतांश रजपूत राज्यकर्ते आणि सरदारांचे बहुपत्नी विवाह हे त्यांच्या शौर्यगाथेचं राजकीय प्राबल्य टिकवून ठेवण्यासाठीचा एक मार्ग होता. आणीबाणीच्या प्रसंगी अशा विवाहसंबंधांमुळे जोडला गेलेला एक राजा दुसऱ्या राजाला मदतीसाठी बोलावत असे.’’

त्याच वेळेला भारतातील विस्तृत भागात, विशेषतः पर्वतीय भागात, बहुपत्नीत्वामागे अर्थशास्त्र आणि भूगोल हे घटकही होते.

केवळ भारतातच नाही, तर…

भारतात ‘ठरवून केलेल्या लग्ना’च्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, ही पद्धती केवळ दक्षिण आशिया खंडापुरती मर्यादित नाही. विवाहसंस्थेने संपूर्ण जगात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भूमिका निभावल्या आहेत. उदाहरणार्थ, जपानमध्ये ठरवून केलेल्या विवाहाची परंपरा आजही मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. त्याची मुळे सोळाव्या शतकात सापडतात. जपानमध्ये लष्करी वर्ग किंवा सरदारांमधील लष्करी युतींना संरक्षण देण्यासाठी ‘मियाई’ नावाची पद्धत रुजवली.

तुर्कीमध्ये ठरवून केलेल्या विवाहाचं प्राबल्य दिसतं. अगदी अलीकडे म्हणजे २०१६मध्ये तुर्की संख्याशास्त्र संस्थेनं प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार १५ ते २४ वयोगटातील ४५ टक्के तुर्की तरुणींनी त्यांचा जोडीदार ठरवून केलेल्या विवाहामधून शोधण्याला संमती दिली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

चीनची तर एक गंमतीशीर गोष्ट आहे. १९५० मध्ये माओ झेडाँगने नवीन विवाह कायदा पारित केला. ठरवून केलेल्या विवाहाच्या संरजामशाही पद्धतीचं निर्मूलन करणं आणि संबंधित व्यक्तीच्या संमतीला प्राधान्य देणं, यासाठी त्याने हा कायदा केला होता. या विवाह कायद्याच्या सुधारित आवृत्तीला साम्यवादी क्रांतीदरम्यान केलेल्या जमीन सुधारणांशी जोडण्यात आलं. त्यातून असा संदेश दिला गेला की, इथून पुढे स्त्रिया ‘त्यांच्या वडिलांच्या व्यावसायिक विनिमयाच्या किंवा त्यांच्या नवऱ्याचं वर्चस्व असलेल्या वस्तू असणार नाहीत.’ या अशा सुधारणा झाल्या असल्या तरी बीबीसी २०१७चा अहवाल असं दाखवतो की, चिनी आई-वडील त्यांच्या मुला-मुलींच्या वैवाहिक निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतलेले होते आणि त्यांनी वारंवार वधू-वर सूचक मंडळांचा उपयोग केला.

‘इंडियन मॅचमेकिंग’ ही वेबसिरीज पाहताना, तिच्यावर टीकाटिप्पणी करताना प्रेक्षकांनी भारतातील व जगभरातील विवाहाची सामाजिक-राजकीय, धार्मिक मुळे; तसेच ही विवाहसंस्था ज्या पद्धतीनं उत्क्रांत झाली आहे, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये २००० साली प्रकाशित झालेला अहवाल सांगतो की, दक्षिण आशियाई तरुण जोडीदार निवडण्यासाठी अधिकाधिक वैवाहिक संकेतस्थळांचा उपयोग करत आहेत आणि ते या सगळ्यामधून त्यांच्या कुटुंबीयांना बाजूला ठेवत आहेत. स्वतःसाठी जोडीदार निवडण्यासाठी मुक्त स्वातंत्र्य असतानाही हा अहवाल गंमतीशीरपणे हेही स्पष्ट करतो की, तरुणांनी जात, रंग, धर्म इत्यादी पारंपरिक निकष वापरणं चालूच ठेवलं आहे.

त्यामुळे कदाचित सिमा टपारियांचं बहुचर्चित विवाह जुळवणीचं कौशल्य, आपण ज्या समाजात राहतो त्याचंच प्रतिबिंब आहे, असं म्हणावं लागेल.

..................................................................................................................................................................

अनुवाद - राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे. हे प्राध्यापकद्वय बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे कार्यरत आहेत.

rajkranti123@gmail.com 

..................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख दै. ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये २६ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......