टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अनुपम खेर, जुन्या नोटा, गॅस सिलेंडर, डोनाल्ड ट्रम्प आणि एटीएम
  • Thu , 02 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अनुपम खेर Anupam Kher जुन्या नोटा Old notes गॅस सिलेंडर Gas Cylinder डोनाल्ड ट्रम्प Donald Trump एटीएम ATM

१. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि गुरमेहेर कौरची सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवरून सुरू झालेल्या वादात आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेतली आहे. ‘असहिष्णुतांची टोळी परत आली आहे. त्यांच्या घोषणा वेगळ्या असल्या तरी चेहरे मात्र तेच आहेत,’ असे अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अरे, अनुपम अंकल आले, टाळ्या वाजवा! किती मिस करत होते सगळे अंकलना! मुलांनो, शांत बसा. अनुपम अंकल आता सगळ्यांना द्वेषभक्ती… सॉरी, देशभक्ती शिकवतील. त्यांनी आरशात पाहूनच ट्वीट केलेलं दिसतंय. असहिष्णू टोळीचे डॉन डॉ. डेंग यांचं स्वागत असो. हेल अनुपम!!!

…………………………………………………………………………

२. चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाळगणाऱ्यांवर आता दंड आकारला जाणार आहे. पाचशे आणि हजाराच्या १० पेक्षा जास्त नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या नव्या नियमानुसार दोषींवर किमान १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. रद्द करण्यात आलेल्या नोटांच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था चालवली जाऊ नये, यासाठी संसदेने हा कायदा पारित केला आहे.

या सरकारचं आणि त्याची बटीक झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या एकंदर धोरणकोलांट्या अदभुत आहेत. यांनी दिलेल्या मुदतीत नोटा भरणाऱ्यांना संशयाच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा एक प्रयोग करून पाहिला. ३१ डिसेंबरनंतर ३१ मार्चपर्यंत विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता करून, सबळ पुरावा देऊन या नोटा भरता येतील, असं सांगणाऱ्या रिझर्व्ह बँकेने आता 'वरून आदेश आल्या'मुळे या नोटा, कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही स्वीकारायला नकार दिला आहे. जो मुळात बेकायदा आहे. त्यानंतर हे त्या नोटा बाळगणाऱ्यांवरही दंड लावणार? यांना सर्वोच्च न्यायालयाकडून गालगुच्चाची गरज आहे.

…………………………………………………………………………

३. काही बँकांनी एक मार्चपासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही खासगी बँकांकडून बचत खात्यांमधून होणाऱ्या रोकड व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांतील व्यवहारांबरोबरच एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत.

एकंदर तळागाळातल्या लोकांना बँकिंग व्यवस्थेतून बहिष्कृत करण्याचीच ही व्यवस्था सुरू आहे. ‘आपलीच मोरी आणि लघुशंकेची चोरी’ अशी अवस्था यांनी आपल्याच बँक खात्यातल्या आपल्याच पैशांबद्दल आणायला सुरुवात केली आहे. या आचरटपणाला कंटाळून लोकांनी या बँकांवर सामुदायिक बहिष्कार घालायला सुरुवात केली की, यांचा राजापेक्षा राजनिष्ठ उद्दामपणा आटोक्यात येईल बहुतेक.

…………………………………………………………………………

४. तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आल्याने विना-अनुदानित सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एक मार्च २०१७ पासून विना अनुदानित १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८६ रुपयांनी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर एलजीपी संबंधित उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक स्तरावर या दरांमध्ये घट झाली, ते कोसळले तेव्हा कसले कसले अधिभार जोडून ग्राहकांची लुबाडणूक करण्यात आली, त्याचे निर्णय जाहीर होत नाहीत वाटतं. आताही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमधून सरकार इतर ठिकाणच्या लयलुटीची तूट भरून काढण्याची चतुराई करतं आणि वर ‘अच्छे दिन’ आणल्याच्या बाता मारतं.

…………………………………………………………………………

५. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रवेशाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर रविवारी नायजेरियाहून अमेरिकेला जाणाऱ्या एका अभियंत्याला जॉन एफ. केनेडी विमानतळावर आपण अभियंता असल्याचं सिद्ध करण्यास सांगितलं गेलं. ओमिनला अमेरिकेच्या दौऱ्यासाठी अत्यंत कमी मुदतीचा व्हिसा देण्यात आला.

प्रत्येक भस्मासुर आपल्याच कर्माने मरतो, हा सृष्टीचा नियमच आहे. अमेरिकेच्या बाबतीत काही वेगळं घडणार नाही. मात्र, जगातल्या एकमात्र महासत्तेच्या या भस्मासुराने आपल्याच डोक्यावर हात ठेवून राख बनून जाण्यासाठी ट्रम्पतात्यांसारखी अत्यंत गद्य आणि अंतर्बाह्य कुरूप मोहिनी शोधावी, हे आश्चर्यकारक आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती अशी!

…………………………………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......