टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • डाळ आणि मासे
  • Wed , 16 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Modi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. अभेद्य सुरक्षाव्यवस्था भेदून मोदींना डासही चावू शकणार नाही : शिवसेनेचा टोला

शिवाय मित्रपक्षांनी आता माँ जगदंबेलाही साकडं घातलंय. आता फक्त सतत डोकं चावणाऱ्या मित्रपक्षांची डासांच्या चाव्यापेक्षा भयानक वाटणारी भुणभुण सोडली, तर मोदींना कसलाच धोका नाही, हे स्पष्टच आहे.

..........

२. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्याने निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले सख्य आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

'आम्ही लहानपणापासूनचे घट्ट मित्र आहोत. मी अजूनही त्याला डोन्या-टोण्याच म्हणतो. मी चहा विकायचो, तेव्हा तो कप विसळायला मदत करायचा. एकाच शाखेत जायचो आम्ही. तो अमेरिकेचा अध्यक्ष बनावा, अशी माझी लहानपणापासूनची इच्छा होती…' हे भाषण मॅडिसन स्क्वेअरमध्ये ऐकायला कान आतुरले आहेत…

..........

३. केरळमधल्या एका चर्चने सर्वसामान्यांसाठी दानपेटी खुली केली असून 'दानपेटीतले सुटे पैसे घेऊन जा आणि शक्य होईल तेव्हा ते परत करा', असा उपक्रमच राबवला आहे.

देशातल्या सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी या चर्चचा कित्ता गिरवायला हवा. माणुसकीचा धर्म सगळ्यात मोठा असतो, याचं भान नसलेले धर्म आणि त्यांची भव्य मंदिरं यांचा भुईला भार करण्यापलीकडे उपयोग काय?

..........

४. नोटबंदीमुळे ईशान्य भारतात वस्तू विनिमय पद्धतीचं पुनरुज्जीवन, एक किलो माशांच्या बदल्यात तीन किलो डाळ.

बघा, दैनंदिन व्यवहारातही परस्परांमध्ये प्रेम वाढवण्याचा हा किती सुंदर मार्ग आहे. एकमेकां साह्य करून देश काळा पैसामुक्त करण्याचा सुपंथ धरण्याची ही केवढी मोठी संधी आहे. शिवाय आपल्या उज्ज्वल परंपरांचंही पुनरुज्जीवन होतंय. लवकरच आपण वल्कलं धारण करून कंदमुळंही खायला लागू.

..........

५. नोटबंदी जाहीर झाल्यापासून काश्मीरमध्ये एकदाही दगडफेक झालेली नाही : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

काश्मीरमध्ये सगळे अतिरेकी आणि आंदोलक पाचशे रुपयाला दोन किलो आणि हजार रुपयांना पाच किलो रेटने दगड विकत घेत होते दगडफेकीसाठी. त्यांच्या या देशद्रोही उद्योगाला चांगलंच बूच बसलं आहे. गोवा आधी फेणीसाठी प्रसिद्ध होता, आता तर्री… सॉरी, पर्रीकरांसाठी प्रसिद्ध होणार, यात शंकाच नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......