टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • डाळ आणि मासे
  • Wed , 16 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Modi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. अभेद्य सुरक्षाव्यवस्था भेदून मोदींना डासही चावू शकणार नाही : शिवसेनेचा टोला

शिवाय मित्रपक्षांनी आता माँ जगदंबेलाही साकडं घातलंय. आता फक्त सतत डोकं चावणाऱ्या मित्रपक्षांची डासांच्या चाव्यापेक्षा भयानक वाटणारी भुणभुण सोडली, तर मोदींना कसलाच धोका नाही, हे स्पष्टच आहे.

..........

२. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्याने निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले सख्य आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

'आम्ही लहानपणापासूनचे घट्ट मित्र आहोत. मी अजूनही त्याला डोन्या-टोण्याच म्हणतो. मी चहा विकायचो, तेव्हा तो कप विसळायला मदत करायचा. एकाच शाखेत जायचो आम्ही. तो अमेरिकेचा अध्यक्ष बनावा, अशी माझी लहानपणापासूनची इच्छा होती…' हे भाषण मॅडिसन स्क्वेअरमध्ये ऐकायला कान आतुरले आहेत…

..........

३. केरळमधल्या एका चर्चने सर्वसामान्यांसाठी दानपेटी खुली केली असून 'दानपेटीतले सुटे पैसे घेऊन जा आणि शक्य होईल तेव्हा ते परत करा', असा उपक्रमच राबवला आहे.

देशातल्या सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी या चर्चचा कित्ता गिरवायला हवा. माणुसकीचा धर्म सगळ्यात मोठा असतो, याचं भान नसलेले धर्म आणि त्यांची भव्य मंदिरं यांचा भुईला भार करण्यापलीकडे उपयोग काय?

..........

४. नोटबंदीमुळे ईशान्य भारतात वस्तू विनिमय पद्धतीचं पुनरुज्जीवन, एक किलो माशांच्या बदल्यात तीन किलो डाळ.

बघा, दैनंदिन व्यवहारातही परस्परांमध्ये प्रेम वाढवण्याचा हा किती सुंदर मार्ग आहे. एकमेकां साह्य करून देश काळा पैसामुक्त करण्याचा सुपंथ धरण्याची ही केवढी मोठी संधी आहे. शिवाय आपल्या उज्ज्वल परंपरांचंही पुनरुज्जीवन होतंय. लवकरच आपण वल्कलं धारण करून कंदमुळंही खायला लागू.

..........

५. नोटबंदी जाहीर झाल्यापासून काश्मीरमध्ये एकदाही दगडफेक झालेली नाही : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

काश्मीरमध्ये सगळे अतिरेकी आणि आंदोलक पाचशे रुपयाला दोन किलो आणि हजार रुपयांना पाच किलो रेटने दगड विकत घेत होते दगडफेकीसाठी. त्यांच्या या देशद्रोही उद्योगाला चांगलंच बूच बसलं आहे. गोवा आधी फेणीसाठी प्रसिद्ध होता, आता तर्री… सॉरी, पर्रीकरांसाठी प्रसिद्ध होणार, यात शंकाच नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......