अखेर, गंगेत घोडं न्हालं, ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’चं जमलं!
पडघम - राज्यकारण
सुधीर अग्रवाल
  • ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’च्या पत्रकार परिषदेचं एक छायाचित्र
  • Mon , 25 March 2019
  • पडघम राज्यकारण संयुक्त पुरोगामी महाआघाडी United Progressive Alliance काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP सेना Shivsena भाजप BJP

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप-सेना युतीपुढे तगडं आव्हान उभं करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक छोट्या पक्षांना सोबत घेऊन ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ उभारत एल्गार पुकारला आहे. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी युतीच्या सरकारवर सडकून टीका करत भाजप-सेना युतीपुढं आव्हान उभं केलं आहे.

या महाआघाडीत खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी आघाडीचा समावेश आहे. राज्यातील ४८ जागांपैकी काँग्रेस पक्ष २४ जागा लढेल, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. राजू शेट्टी यांच्या पक्षाला दोन जागा, हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला पालघरची जागा, तर अमरावतीची जागा राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्यासाठी सोडली जाणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत संपन्न झाली. संयुक्त पुरोगामी महाआघाडीची अधिकृत घोषणाही या वेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, अजित पवार, छगन भुजबळ, राजेंद्र गवई, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार हितेंद्र ठाकूर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

“भाजप-शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना बाजूला करण्यासाठी महाराष्ट्रात आम्ही संयुक्त पुरोगामी महाआघाडी स्थापन करत आहोत. देशातील हुकूमशाही सरकार उलथून लावण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एवढे पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीला चांगला पाठिंबा मिळाला आणि या पुढेही मिळत राहील, अशी मला खात्री आहे. सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांच्या प्रेरणेनं आम्ही ही आघाडी स्थापन करत आहोत. आज धर्मांध विचारांच्या पक्षाची ताकद वाढली आहे. फसवणूक करणाऱ्या घोषणा, जुमलेबाजी करून हे सरकार सत्तेत आलं. मात्र पाच वर्षांत त्यांनी काहीच केलं नाही. आज संविधान धोक्यात आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठीच आम्ही एकत्र येत आहोत,” असं अशोक चव्हाण, जयंत पाटील यांनी सांगितलं.

देशाचे पंतप्रधान गुपचूप पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा देतात हा दुटप्पीपणा आहे. मोदींचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे. या दुटप्पी लोकांना जनता धडा शिकवेल. भाजप सरकारनं शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही. आघाडीचं सरकार आलं, तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम मिळावी असा आम्ही प्रयत्न करू. अनेक कामगार, शेतकरी, सामाजिक संघटनांनी या आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच लोकसभेत महाआघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून जातील याची खात्री आहे, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

विखेंची पत्रकार परिषदेला दांडी

संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारल्याचं दिसलं. मुलगा सुजय भाजपमध्ये गेल्यापासून विखेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर येणं टाळलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांत माझ्याबाबत अविश्वास आहे. त्यामुळे आगामी काळात मीच त्यांच्यापासून दूर राहीन. नगरमध्ये मी माझ्या मुलाचा तसंच महाआघाडीचाही प्रचार करणार नाही, असं विखेंनी म्हटलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून विखेंनी नगरमध्ये तळ ठोकला असून, मुलाच्या प्रचारासाठी ते गुपचूप बैठका घेत असल्याचं समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर महाआघाडीत बिघाडी तर निर्माण होणार नाही ना, असा प्रश्न आतापासूनच पडायला लागला आहे. भाजप-सेना विरोधात सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र यावं म्हणून गेल्या जूनमध्ये कर्नाटक विधानसभा निकालानंतर प्रयत्न सुरू झाले होते. सहा महिने वाटाघाटीनंतर अखेरीस संयुक्त पुरोगामी महाआघाडी अस्तित्वात आली.

विशेष म्हणजे या महाआघाडीत राज्यातील काही राजकीय पक्ष सहभागी झालेले नाहीत. उदा. बसप, सप, वंचित बहुजन आघाडी, जद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लोकभारती आघाडी. महाआघाडीचं आव्हान भाजप-शिवसेना युती पेलेलं काय, हे निवडणूक निकालानंतरच कळेल. सध्या तरी या युतीसमोर या महायुतीचं आव्हान राहणार हे मात्र निश्चितच!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......