ज्यांचे ‘अच्छे दिन’ आले असतील, त्यांनी खुशाल आनंद साजरा करावा…
पडघम - देशकारण
अमित इंदुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 22 February 2019
  • पडघम देशकारण अच्छे दिन Achhe din नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP काँग्रेस Congress

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी सरकारने देशातील जनतेला विशेषतः युवकांना नोकरी आणि विकासाचे गाजर दाखवून त्यांचे लक्ष आणि मत आपल्या बाजूने वळवून घेतले. लोकांनीदेखील त्यावर विश्वास ठेवला. कारण काँग्रेसने लोकांच्या मनातून आपली विश्वासार्हता गमावली होती. देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना, वाढता भ्रष्टाचार, वाढती महागाई आणि महत्त्वाचे म्हणजे प्रदीर्घ काळ मिळालेली सत्ता. याच मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी निवडणूक जाहीरनामा तयार करून आपली व आपल्या पक्षाची प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला. वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला युवक पहिल्यांदाच मतदान करणार होता. त्यामुळे त्यांना भाजप आणि संघाची विचारधारा आणि त्यात नरेंद्र मोदींचे गुजरात येथील राजकारण माहीत नसल्यामुळे आणि देशातील मीडियाने नरेंद्र मोदींचा नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळे हा युवावर्ग त्यांच्या भूलथापांना बळी पडला.

‘विकास म्हणजे मोदी’ आणि ‘मोदी म्हणजेच विकास’ अशी समजूत ठेवून युवा मतदारांनी वर्तमान सरकारला बहुमताने सत्तेत बसवले. दोन कोटी रोजगार, १५ लाख रुपये, शेतकऱ्यांना हमी भाव, महिलांचा सन्मान यांसारख्या घोषणांच्या पायऱ्या तयार करून नरेंद्र मोदी संसदेपर्यंत पोहोचले. पण आपण दिलेल्या घोषणा पूर्ण करायचे बाजूला ठेवून त्यांनी गाय, पाकिस्तान, राम मंदिर, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, आधार कार्ड, शौचालय आणि विशेष म्हणजे ‘मन की बात’ यावरच देश चालवण्याचा सपाटा लावला. आणि हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी मतदाराला दिलेल्या घोषणांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.

या गोष्टींकडे देशातील सुजाण नागरिकांचे लक्ष जाऊ नये म्हणून ‘सर्जिकल स्ट्राईक’, भारत पाकिस्तान यांसारख्या मुद्द्यांचा बाऊ करून देशात राष्ट्रवादाची नवीन संकल्पना पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी सत्य इतिहासाला बगल देऊन कधी न घडलेल्या कपोलल्पित कथांना इतिहासाचा मुलामा लावून तो मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमांतून जनमानसांच्या मनात पेरण्याचा प्रयत्न केला. आणि ते त्यात काही प्रमाणात यशस्वीही झाले.

...............................................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y3g5mf7t

...............................................................................................................................................................

या कपोलकल्पित इतिहासाला व त्यावर रोज होणाऱ्या चर्चेला सर्वसामान्य जनता बळी पडून नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन विसरू लागली आणि देशात जणू काही स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले. आणि आपण त्यातील एक स्वातंत्र्यसैनिक आहोत या भावनेने एकमेकांशी भांडू लागली.

‘मॉब लिंचिंग’ हा यातीलच एक प्रकार आहे. नरेंद्र मोदींनी अचानक केलेली नोटबंदी म्हणजे 'देशातील भ्रष्टाचार एका क्षणात खल्लास झाला!’ हा आविर्भाव काही समर्थकांमध्ये मिरवू लागली, पण रिझर्व्ह बँकेने ९९ टक्क्यांच्या वर पैसे परत आले, असे जाहीर करताच सरकार आणि त्यांचे समर्थक मूग गिळून गप्प बसले. आणि लागलीच दुसरा विषय तयार करून त्यावर चर्चा सुरू झाल्या.

सरकारने आपण दिलेल्या घोषणा लोकांना आठवू नये म्हणून नवनवीन पण अनावश्यक मुद्दे उकरून काढण्याचा सपाटा सुरू केला. शेतकऱ्यांना हमीभाव तर सोडाच, पण त्यांना त्यांच्या शेतात लागणाऱ्या खर्चाचे साधे उत्पन्नही मिळाले नाही. कोट्यवधी बेरोजगार युवकांना रोजगार देऊ म्हणणारे सरकार एका खासगी वाहिनीवर व संसदेतदेखील ‘पकोडे विकणे’ हादेखील एक रोजगाराचा भाग आहे, असे म्हणून रोजगाराच्या प्रश्नाला बगल देण्याचा पद्धतशीर प्रयत्न करतात. महाराष्ट्रात मेगाभरती करू म्हणणारे फडणवीस सरकार या ना त्या कारणाने ती भरती पुढे ढकलण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे.

आपल्या या त्रासदायक कामाकडे सामान्य जनतेचे लक्ष जाऊ नये वा त्याकडे कुणी लक्ष वेधू नये म्हणून या सरकारने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील काही विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे खटले टाकून त्या विद्यापीठाला बदनाम करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. देशातील गरीब, बेरोजगार विद्यार्थी आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले.

आता उंबरठ्यावर असणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आपल्या विरोधात जाणारा जनमताचा कौल पाहून केंद्र सरकारने पुन्हा सर्वसामान्य जनतेला योजनांचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे. येणारी २०१९ ची लोकसभा निवडणूक प्रत्येक पक्ष युद्धपातळीवर लढणार आहे. आता जनतेचा भाषणांवरील विश्वास कमी झालेला आहे.

गेल्या साडेचार वर्षांत गौ रक्षकांचे, नेत्यांचे आणि माल्या, अंबानी, अडाणी, चौक्सी यांसारख्या उद्योगपतींचे ‘अच्छे दिन’ नक्कीच आलेत, पण देशातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचे ‘बुरे दिन’ आले आहेत. ज्या समर्थकांचे ‘अच्छे दिन’ आले असतील त्यांना नक्कीच पंधरा लाख रुपये आणि घरातील सदस्यांना नोकरी मिळाली असेल. त्यांनी खुशाल आनंद साजरा करावा, पण ज्यांचे ‘अच्छे दिन’ होते, तेदेखील हिरावून घेतले गेले. ते मात्र निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत बदल घडवावण्याकरता सज्ज असतील.

.............................................................................................................................................

लेखक अमित इंदुरकर पत्रकार आहेत.

mr.amitindurkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 25 February 2019

ओ इंदुरकर भाऊ, जरा जागे व्हा. मोदी हिंदू मतांवर निवडून आलेत. हिंदू धर्माच्या आधारे उघडपणे मतं मागता येत नाहीत म्हणून मोदी विकासाच्या गप्पा मारताहेत. तसंही पाहता काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या सत्तेत सामान्य माणूस स्वत:चा विकास स्वत:च करायला शिकलाय. मोदींकडून सामान्य माणसाच्या ज्या कः इअपेक्षा आहेत त्या अत्यंत किरकोळ आहेत. त्या पुऱ्या झालेल्या बघण्यासाठी कुठल्याही आकडेवारीची गरज नाही. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गावगन्ना उगवलेल्या भुरट्या तत्ज्ञांच्या तथाकथित विश्लेषणांची तर आजिबात नाही. हे झालं गावच्या मतदारांविषयी. शहरांत तर मोदींना याहून अधिक पाठींबा आहे. मी शहरी मध्यमवर्गीय आहे. माझा विकास करायला मी समर्थ आहे. मला कुठल्या मोदीबिदीनी भीक घालायची गरज नाही. मी मोदींना मत देतो, कारण की ते हिंदुहितदक्ष आहेत म्हणून. त्यामुळे मोदींच्या नावाने तुम्ही कितीही कंठशोष केला तरी लोकं ऐकणारे नाहीत. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......