हे लेख सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत ह्या दोन्हींच्यामध्ये आंदोलित होणाऱ्या मनासाठी आहेत!
ग्रंथनामा - झलक
गणेश देवी
  • ‘त्रिज्या’या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 14 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक त्रिज्या Trijya गणेश देवी Ganesh Devi

डॉ. गणेश देवी यांचं ‘त्रिज्या’ हे छोटेखानी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेलं हे मनोगत...

.............................................................................................................................................

या छोट्याशा पुस्तकात मराठी वाचकांसमोर माझ्या मनात गेले अनेक वर्षे पिंगा घालणारे काही प्रमुख विचार मांडले आहेत. पुस्तकात प्रस्तुत केलेल्या लिखाणास ‘लेख’ हे सन्माननीय नाव देणे योग्य नाही. लेखांना स्वत:ची काही शिस्त असते. त्यामागे काही संकल्पना-संदर्भ असतो. तो या लेखनाच्या मागे नाही. त्यातील काही, मी स्वत:पुरता विचार करत असताना केलेल्या त्रोटक नोंदी आहेत. काही फक्त विचारांचे पुसटसे धागे आहेत. काही जाहीर व्याख्यानात उच्चारलेले तात्पुरते विचार आहेत. पण जे आहे, ते सगळे एका विस्तृत विचारपटलावरचा सुस्पष्ट नकाशा आहे. हा नकाशा थोडासा, मध्ययुगातील खलाशांनी बनवलेल्या दर्याच्या नकाशासारखा. भूगोलाच्या अभ्यासकांना मान्य होणार नाही, तरीही त्या दर्यावर्दी भटक्यांना पूर्ण मार्गदर्शन करू शकेल असा. म्हणून, या पुस्तकात जे आहे त्याला मी थोड्याफार संकोचाने ‘वैचारिक लेख’ म्हणू इच्छितो. त्यातल्या कल्पना, संकल्पना माझ्यापुरता थोडाफार प्रकाश देत आल्या आहेत. तो प्रकाश तशाच प्रकारे वाचकास मिळेल हा माझा दावा नाही. किंबहुना दावे करणे वगैरेला मी कंटाळून गेलो आहे.

मला फक्त जाता जाता, जमेल तितके, जे मूल्यवान वाटते ते नमूद करावेसे वाटले. म्हणून हे सारे. हे लेख सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नाहीत. ते विचारवंतांसाठीपण नाहीत. पण ह्या दोन्हींच्यामध्ये आंदोलित होणाऱ्या मनासाठी आहेत.

या लेखांच्यामध्ये काही तुटक्या ओळी आहेत, त्या कविता नाहीत. ते फक्त विचार आहेत. काही सरळ आहेत. स्पष्ट आहेत. काही अस्पष्ट आहेत. त्या तुटक्या ओळीत वाचकांनी स्वत:चे विचार, कृती आणि आवाज मिळवून त्या कविता पूर्ण करायच्या आहेत. अर्थात, ही अपेक्षा जरा जबरदस्तीची आहे, पण जाता जाता, आणि कदाचित परतणे शक्य होणार नाही म्हणून तीही करतो.

जो केंद्र नाही आणि जो परीघ नाही, असा हा मधलाच लटकलेला आवाज, खूप अस्पष्ट, क्षीण, तुमच्यापर्यंत पोचवला आहे. तो सांभाळला जावा.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......