गुंतवणूकदारांसाठी संत कबीर आणि संत रहीम यांच्या जादूमय शैलीतले दोहे
ग्रंथनामा - झलक
विनायक सप्रे
  • ‘दोहानॉमिक्स’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 08 February 2019
  • ग्रंथनामा झलक दोहानॉमिक्स Dohanomics विनायक सप्रे Vinayak Sapre

गुंतवणूक कशी करावी, कधी करावी, गुंतवणूक करतान काय काळजी घ्यावी, अशा विविध प्रश्नांची उत्तरं संत कबीर आणि संत रहीम यांच्या विचारातून देत गुंतवणूकदारांसाठी चिरंतन कानमंत्र देणारं ‘दोहानॉमिक्स’ हे गुंतवणूक सल्लागार विनायक सप्रे यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. सीनएनबीसी टीव्ही 18 यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला लेखकानं लिहिलेल्या मनोगताचा हा सुधारित, संपादित अंश...

.............................................................................................................................................

भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यावर आपल्या देशात अनेक बदल झाले. या २५-२७ वर्षांत समाजाच्या वर्तणुकीत डोंगराएवडे बदल जाणवले. त्यातील अनेक बदल नकळतपणे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले. ते अंतर्भूत झाल्याचे फारसे कोणाला कळले नाही. या काळात एका पिढीच्या विचारपद्धतीत झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे.

सर्वांत मोठ्या बदलांमधील एक म्हणजे समाजाची खर्च करण्याची पद्धत. सण आणि लग्नसराई सोडल्यास भारतीय लोक हात राखूनच खर्च करतात, तसेच गुंतवणुकीचे प्रमाणही कमीच. मागील २७ वर्षांत आमूलाग्र बदल खर्च करण्याच्या पद्धतींमध्ये दिसून आले आहेत. ऐशोरामाच्या वस्तूंचे रातोरात गरजांमध्ये परिवर्तन झाले. पहिल्या १५-१६ वर्षांत भरपूर प्रमाणात पगारवाढ झाली. ज्यामुळे खर्च करण्याची ताकद वाढली. त्याच वेळी व्याजदर कमी झाले आणि गाड्या, घरांपासून प्रवासाच्या तिकिटांपर्यंत सर्व काही कर्जावर मिळायला लागले. आज कपडेही मासिक हप्त्यांवर मिळतात.

‘आज विकत घ्या, उद्या पैसे द्या’ ही विचारसरणी तरुण पिढीच्या मनात पटकन झिरपली. उच्च पगार आणि कमी व्याजदर यांनी आगीत इंधन ओतले. तथापि, हे सगळे घडत असताना, अजून एक मोठा बदल घडला. तो म्हणजे या झगमगाटीत त्या पिढीवरचे आप्तेष्टांकडून येणारे दबाव. प्रतेयक क्षेत्रात आव्हाने कैकपटीने वाढली. दिलेले कर्तव्य पूर्ण करा किंवा मरा हा मंत्र सर्वांच्या मुखी होता, ज्यामुळे तणाव वाढले. विभक्त कुटुंबातील आणि छंद जोपासण्यातील वेळेच्या अभावामुळे लोकांनी खरेदी हाच उपचार, याचा शोध लावला.

हे सर्व खर्चांच्या बाजूला बदल होत असताना गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेमध्ये फारसे बदल दिसत नव्हते. आर्थिक साक्षरतेबाबत कोणीच फारशी पावले उचलताना दिसले नाही. नियामक मंडळांच्या स्थापना झाल्या, पण वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वेगवेगळे नियम असल्याकारणाने गुंतवणूकदार अधिक गोंधळून गेले.

म्युच्युअल फंड लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने पहिल्या २० वर्षांत त्यापैकी बहुतेक त्यांची गुणवत्ता दाखवण्यात मग्न होते. ज्यामुळे उत्पादनाच्या खऱ्या लाभापेक्षा त्यातील लोभाची विक्री जास्त झाली. गेल्या पाच वर्षांत त्यांना हे जाणवले आहे की, बाजारात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी म्युच्युअल फंड हे काहीतरी मिळवण्यासाठीचे उपाय असलेले उत्पादन आहे, असे सांगण्याची, पटवून देण्याची गरज आहे.

संकल्पना म्हणून म्युच्युअल फंडची जन्मभूमी ही सातासमुद्रापारची असल्याने त्यातील अनुभवाचे बोल हे वैश्विक स्वरूपाचे आहेत. म्हणजेच सर्व उदाहरणे, म्हणी या परदेशी आहेत. ज्या आपल्या देशातील गुंतवणूकदार आणि सल्लागार यांच्याशी फारशी काही आपुलकी बाळगत नाहीत. त्यामुळेच २७ वर्षांनंतरही म्युच्युअल फंडाकडे अनोखे उत्पादन म्हणून पाहिले जाते. अत्याधुनिक गुंतवणूकदारांसाठीचे वैश्विक स्वरूपाचे उत्पादन म्हणून त्याची ओळख केली जाते.

त्यामुळे मला या सगळ्याला भारतीय अवतार देण्याचे सुचले. म्युच्युअल फंडाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यातील संदर्भ आणि दळणवळण मातीशी जोडलेले असावे असे जाणवले. ज्या देशावर अनेक संत-महात्म्यांनी संस्कार केले, त्यात दोन संत हेरणे अवघड नव्हते, ज्यांना सर्व जाती-धर्म आणि विचारवंतांमध्ये मान असेल. हे दोन ज्ञानी म्हणजे संत कबीर आणि संत रहीम. दोघेही विशेषत: संत कबीर, उत्तम निरीक्षक होते. त्यांनी संपूर्ण उत्तर भारताचे भ्रमण केले. त्यांचे दोहे शिखांच्या आदी ‘ग्रंथसाहिब’मध्येही नमूद केलेले आहेत. हलाखीच्या दिवसात वाढलेले असतानाही संत कबीर यांना समाजाच्या विचारसरणींना आव्हान देता आले.

उत्पन्नावरील परताव्यांपेक्षा (रिटर्न्स), जे गुंतवणुकीच्या यशात मोठी कामगिरी बजावतात, गुंतवणूकदारांची पैशांच्या बाबतीतील वर्तणुकीमुळे कसे फरक पडतात हा संदेश मी देऊ इच्छितो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जरी म्युच्युअल फंड नि उच्च परतावे दिले असतील तरी बोटांवर मोजता येतील एवढ्याच गुंतवणूकदारांनी अनुषंगिक पैसा कमवला. आणि हाच संदेश पोचवण्यासाठी संत कबीर आणि संत रहीम यांनी आपल्या जादूमय शैलीत दोहे लिहून माझे काम खूप सोपे केले.

.............................................................................................................................................

'दोहानॉमिक्स' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4721/Dohanomics

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......