आपलं माणूसपण मिळावं, अशी आस असलेली आजच्या पिढीतली ही कवयित्री स्वतःशी ओळख करून घेते आहे!
चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात राहून स्वतःची ओळख स्वतःशी करून घेण्याचं धाडस दाखवणाऱ्या स्त्रियांपैकी त्या एक आहेत. एका ठरावीक साच्यात रहाणं नाकारणारी ही कवयित्री स्त्री आणि पुरुष या जैविक आणि सामाजिक ओळखीपलीकडे जाऊन आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे असं ठासून सांगते आहे. आपल्या स्त्रीत्वापलीकडे जाण्याचा प्रयत्न ही कवयित्री करते आहे.......