भिलार : पुस्तकांचं गाव
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • सर्व छायाचित्रं : आनंद काटीकर
  • Thu , 04 May 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक भिलार Bhilar पुस्तकांचं गाव Books Village

महाबळेश्वरजवळील ‘भिलार’ या गावाची ओळख कालपर्यंत स्ट्रॉबेरीसाठी होती, आजपासून ते ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणार आहे. आज संध्याकाळी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ‘पुस्तकांच्या गावा’चं उदघाटन करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकाच्या गावाची घोषणा केली होती, आज ती प्रत्यक्षात उतरलेली पाहायला मिळणार आहे.

……………………………………………………………………………………………

हा भिलार गावाचा कच्चा नकाशा. गावात २५ ठिकाणांचं ग्रंथालयात रूपांतर करण्यात आलं असून त्या ठिकाणी बसून मनसोक्तपणे पुस्तकं वाचता येणार आहेत. पुणे-सुरूर-वाई-महाबळेश्वर आणि सातारा-वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पुस्तकांच्या गावाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. रंगरंगोटी करून संपूर्ण गाव आकर्षक करण्यात आलं आहे. ब्रिटनमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर हे पुस्तकांचं गाव साकारलं आहे.

कथा, कादंबरी, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारातील सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त पुस्तके या ठिकाणी त्यांच्या विषयावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

भिलारची लोकसंख्या तीन-साडेतीन हजार. साधारण साडेपाचशे उंबऱ्यांचं हे गाव. सात घरं, सहा लॉज, तीन मंदिरं, दोन शाळा अन् एक खासगी कार्यालय या प्रकल्पात सामील झाले आहेत.

राज्य शासनाच्या या प्रकल्पासाठी स्वत्व या स्वयंसेवी संस्थेच्या सुमारे ७५ चित्रकारांनी गावातील निवडलेल्या २५ ठिकाणांची रंगरंगोटी करून सुशोभीकरण केलं आहे. या प्रकल्पासाठी एशियन पेंटस या कंपनीनेही मदत केली आहे.

एखादं गाव केवळ पुस्तकांचं असतं, पुस्तकप्रेमानं भारलेलं असू शकतं, याचा प्रत्यय भिलारमध्ये फिरताना येतो. पुस्तकांविषयी असोशी असणारी माणसं गावात सर्वत्र दिसतात.

महाबळेश्वर-पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. त्याचा फायदा होईल या अनुषंगाने भिलारची ‘पुस्तकांच्या गावा’साठी निवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर-पाचगणी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची पावलं ‘पुस्तकांच्या गावा’त वळली, तिथं आपल्या आवडीच्या पुस्तकांच्या सहवासात काही काळ रमली, तर हे त्यातून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण होईल यात शंका नाही.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Rajendra Mundhe

Thu , 04 May 2017

mahiti purn lekh


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......