बुक्सनामा : गोरक्षण, गोहत्या आणि गोमाता वगैरे
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
टीम अक्षरनामा
  • गायीविषयी चर्चा करणाऱ्या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Tue , 02 May 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक गाईचे अर्थशास्त्र गोहत्या : एक यक्षप्रश्न Gohatya : Ek Yashprshna गाईचे मिथक हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण Hinduni kelele Gomansbhakshan

भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व देशभर पसरल्यानंतर समाजात सर्वच पातळीवर गोवंश हत्या, गोरक्षक, गोपालन वगैरे मुद्द्यांवरून वातावरण तापले आहे. गाईचे हिंदू धर्मातील महत्त्व, गोपालनातील अर्थकारण आणि एकूणच त्यामागील समाजकारण आणि राजकारणाचे विश्लेषण करणारी चार पुस्तके ‘बुक्सनामा’वर उपलब्ध झाली आहेत.

‘कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही’ अशी एक मराठीमध्ये म्हण आहे, पण गेल्या काही दिवसांत मात्र  ‘गायीच्या नावाखाली’ काही माणसांना टार्गेट केलं जात आहे. गायीच्या पोटीत ३३ कोटी देव राहतात, हे हिंदू संस्कृतीतील मिथक आता ‘गायीच्या पोटात केवळ माणसांचा मृत्यू राहतो’ या थराला पोहचले आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीच्या संदर्भातील गायीविषयीच्या पूर्वपरंपरेपासून व्यावहारिक कारणांपर्यंतच्या विविध प्रश्नांची चर्चा करणारी ही पुस्तके महत्त्वाची आहेत. या पुस्तकांच्या वाचनातून गोहत्याबंदीपासून गायीच्या उपयुक्ततेपर्यंत अनेक प्रश्नांच्या विविध बाजू समजून घ्यायला मदत होते.

१. गाईचे अर्थशास्त्र - वि. म. दांडेकर

केंद्र आणि काही राज्य सरकारांनी केलेली गो हत्याबंदी कशी चुकीची आहे, ते या पुस्तकातून सप्रमाण मांडले आहे. केंद्र सरकारने गोहत्याबंदीचा विचार केला, तेव्हा त्या पार्श्वभूमीवर प्रा. वि.म. दांडेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. यात दांडेकर यांनी आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून गायीच्या प्रश्नाची चर्चा केली आहे.

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने – ७५, मूल्य – ७० रुपये. सवलत - १० टक्के

ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/316

……………………………………………………………………………………………

२. गोहत्या : एक यक्ष प्रश्न – संपा. अ. भि. शहा

या संपादित पुस्तकात ‘भारतातील गोसंप्रदाय’ (मुकंदी लाल), ‘गुरांचा प्रश्न’ (वि.म.दांडेकर), ‘गायींची कत्तल : आर्थिक बाजू’ (एम.एम. शहा) आणि ‘गायींची कत्तल : कायद्याची बाजू’ (एल.पी. साठे) असे चार विचारप्रवर्तक लेख आहेत. या पुस्तकाला अ.भि. शहा यांनी विवेचक प्रस्तावना लिहिली आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद दीपक उपाध्ये व नंदकुमार पुरोहित यांनी केली आहे.

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने – ९६, मूल्य – ८० रुपये. सवलत - १० टक्के

ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2688

……………………………………………………………………………………………

३. गाईचे मिथक - द्विजेंद्रनारायण झा

हा ‘मिथ ऑफ होली काऊ’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. मूळ इंग्रजी पुस्तक बहुचर्चित असून त्यावर काही काळ बंदीही घातली गेली होती. या पुस्तकात गायीच्या पवित्र्यातील फोलपणा, गायीच्या मिथकाचा ऐतिहासिक वापर आणि वास्तव यावर भाष्य केले आहे. तसेच गाईचे ‘माता’ म्हणून असलेले मिथक, त्यातून निर्माण झालेली उग्र अस्मिता व गाईच्या मांसावरून दलित, आदिवासी आणि मुस्लीम यांच्यावर झालेले हल्ले यांचा धर्मातील पितृसत्ता आणि जात वास्तवाशी कसा संबंध आहे याचीही चर्चा केली आहे.

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने - १५८, मूल्य – १६० रुपये. सवलत - १० टक्के

ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2688

……………………………………………………………………………………………

४.  हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण - एस. एल. सागर

हिंदू कधीही गोमांस भक्षण करत नव्हते असा दावा केला जातो. मात्र हा या पुस्तकात लेखकांनी साधार खोडून काढला आहे. लेखकांनी वैदिक काळापासून हिंदू गोमांस भक्षण करत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करत होते, असे लेखक पुराव्यानिशी दाखवून देतात. गोरक्षा आंदोलनावरही यात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले, या प्रश्नाच्या उत्तराचाही शोध घेतला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे.

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने - ९२ , मूल्य – १०० रुपये. सवलत – १० टक्के

ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2701

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......