टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • चित्र - श्रीनिवास आगवणे
  • Fri , 24 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शिवसेना Shiv Sena विराट कोहली Virat Kohli डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. शिवसेना ही योद्धाप्रमाणे लढली. असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. परिणामांची पर्वा न करता ही लढाई सुरूच राहील. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला असून आम्ही परिणामांची पर्वा करत नाही. हा लढा फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म, विचारांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच आहे.

साक्षात शिवछत्रपतींच्या काळातल्या कागदपत्रांची छाननी केली, तरी असली बंडल चेवाची भाषा त्यांत आढळणार नाही. निखारे काय, झेंडा निसटू दिला नाही काय, घाव काय, अस्मिता काय? ही मंडळी सकाळी दात घासतात तीही ज्वलंत विचारांनीच घासत असावीत, अशी शंका येते. एवढ्या राणा भीमदेवी गर्जना केल्यानंतर ही म्याँव कमळाच्या डिझाइनच्या ताटलीतून ऊन ऊन दूध पिणार नाही, याची गॅरंटी काय?

………………………………….

२. सहा मजली झोपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वांद्रे पूर्वच्या मुस्लिमबहुल बेहरामपाड्यात शिवसेनेने एमआयएमकडून आयात केलेल्या उमेदवाराला पालिका निवडणुकांसाठी तिकीट देऊन या विभागात शिरकाव केला आणि ती खेळी यशस्वी झाली. बेहरामपाड्यात भगवा फडकला.

भारतीय मन केवढं उदार, विशाल आणि क्षमाशील आहे हो! दंगलीच्या काळात या बेहरामपाड्याविषयी इतकी आग ओकण्यात आली होती की, विजय तेंडुलकरांच्या 'रामप्रहर' या स्तंभाला 'बेहरामप्रहर' म्हणून हिणवलं गेलं होतं. मुंबईत जरा कुठे खुट्ट झालं की, मुखपत्रात बेहरामपाड्याचा उद्धार व्हायचा. त्याच पाड्यातले सगळे तथाकथित 'दहशतवादी' सत्तेसाठी रातोरात 'राष्ट्रीय मुसलमान' बनलेले दिसतात. गंमत म्हणजे त्यांनीही हा इतिहास मागे टाकून दगडापेक्षा वीट मऊ म्हणून भाजपला नाकारण्यासाठी शिवसेना स्वीकारली. सत्य कल्पितापेक्षा अद्भुत असतं ते असं.

………………………………….

३. हैदराबादच्या एका अभियंत्याची बुधवारी रात्री अमेरिकेतील कान्सस शहरातील एका बारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोराने गोळी झाडण्यापूर्वी ‘गेट आऊट ऑफ माय कंट्री’ (माझ्या देशातून चालता हो!) असे ओरडत होता. या घटनेत आणखी एक भारतीय जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

ट्रम्प तात्यांच्या प्रत्येक मूर्ख विधानाला आणि कृतीला चेकाळून प्रतिसाद देणाऱ्यांना आता तरी भानावर यायला हरकत नाही. तात्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांना टिपण्याचा आनंद लुटताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की, तात्या त्याच बंदुकीने भारतीयांनाही टिपणार आहेच. त्यांच्या तुघलकी फर्मानांनी आधीच तीन लाखांहून अधिक भारतीयांवर हकालपट्टीची टांगती तलवार लटकली आहे. या जाणीवेने किमान तिकडच्या शासनप्रणीत उन्मादाची एतद्देशीय आवृत्ती काढण्यापासून वाचलो तरी पुष्कळ.

………………………………….

४. आपल्याकडून कमी वयात जास्त अपेक्षा केल्या गेल्या. भारतात क्रिकेट हा धर्म असल्याने प्रेक्षकांकडे संयम नसतो. मी जेव्हा अवघ्या २२ वर्षांचा होतो, तेव्हा माझ्याकडून ३५ वर्षीय खेळाडूच्या प्रगल्भतेच्या अपेक्षा केल्या गेल्या. पण मला माझ्या खेळावर आत्मविश्वास आहे. :  विराट कोहली

मित्रा, चूक प्रेक्षकांची नाही. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे त्यापेक्षाही कमी वयाचे पाहिले आहेत. ते खेळातही अव्वल होते आणि मैदानातल्या, मैदानाबाहेरच्या वर्तनातही प्रगल्भ आणि सुसंस्कृत होते. क्रिकेट हा या देशाचा धर्म आहे, म्हणूनच आपण यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर आहोत- एकदा धर्म स्वीकारला की यमनियमही स्वीकारायला लागतातच. त्याबाबतीत सोयीसोयीचं पाहून कसं चालेल?

………………………………….

५. बिहारमध्ये दोन प्रेयसींचे खर्च भागवण्यासाठी अभियंता असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ची टोळी स्थापन केली आणि महामार्गावर वाहने लुटण्याचे काम सुरू केले. आंतरराज्य टोळीतील पाच कुख्यात दरोडेखोरांना मोबाइल सर्व्हिलन्सच्या आधारे पकडण्यात आले.

इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांना विचाराल तर ते सांगतील, हा मनुष्य इंजीनियर असूच शकत नाही. इंजीनियरिंगच्या अभ्यासात इतका वेळ आणि इतकी शक्ती जाते की एक प्रेयसीही सांभाळताना अवघड. त्यात याने दोन प्रेयसींना सांभाळून त्यांचे लाडकोड केले असतील, तर तो इंजीनियर असूच शकत नाही, सुपरमॅनच असायला हवा, असं ते म्हणतील. आता ही बातमी बाहेर आल्यानंतर पोलिसांआधी त्या दोघी मिळून सुपरमॅनचा पाचोळामॅन करून टाकतील, यात शंका नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......