अजूनकाही
हार्दिक पटेल यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतरचे कवित्व
मोदीजी आणि विरोधी पक्ष असे दोघेही निशीसारख्या लोकांची मतं आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न करणार होते. कुठल्याच बाबतीत निश्चित मत नसलेले निशीसारखे लोक त्या निवडणुकीचा निकाल ठरवणार होते. ते काय ठरवणार आहेत, याचा त्यांनाच पत्ता नव्हता. त्यामुळे तो इतर कुणाला लागायची काहीच शक्यता नव्हती. मोदी, मोदीभक्त, मोदी-विरोधक, दोन्ही बाजूंचे ‘ओपिनियन पोल्स’वाले असे सगळेच हवेत बोलत होते.......
सगळे पक्ष एक-दुसऱ्याला भ्रष्ट म्हणत होते आणि मूलतः स्वतः सत्तेवर आल्यावर तेच करत होते, हे ‘मोदीकालीन भारता’तील दारुण वास्तव होते. शिरोजीने फक्त भ्रष्टाचार हा विषय घेऊन बखर लिहिली नव्हती. भ्रष्टाचार या विषयात पुरावे मिळणं फार दुरापास्त असल्याने शिरोजी भ्रष्टाचारावर लिहीत नव्हता. परंतु इलेक्टोरेल बाँडचे भांडे फुटल्यावर त्याचाही नाइलाज झाला असणार.......
पुढे कधी तरी चमत्कार झाला आणि इसाप बोलू लागला. मनात साठवलेलं सांगू लागला. गुलामांकडे गोष्टी असतात. गुलामांना गोष्टी रचता येतात. तो गोष्टी सांगू लागला. प्राण्यांच्या गोष्टी सांगून चलाख, धूर्त, दुष्ट, कपटी माणसांना उघडं पाडू लागला. इसाप गोष्टींच्या थारोळ्यात पडला, पण मेला नाही. इसाप अजूनही जिवंत आहे. गोष्टी सांगणारा मेला, तरी त्याच्या गोष्टी छळत राहतात. असो!.......
गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातल्या पक्षीय राजकारणाची आधी ‘ट्रॅजेडी’ झाली, मग त्या ‘ट्रॅजेडी’ची ‘कॉमेडी’ होत गेली… आणि आता ती ‘ट्रॅजिक-कॉमेडी’ झालेली दिसू लागली आहे. त्यात अनेक ‘कथा’, ‘व्यथा’, ‘शोकांतिका’, ‘सुखात्मिका’ आहेत, पण या सगळ्यापेक्षाही ‘विरुपिका’ सर्वांत जास्त आहेत, असं वाटतं. ही ‘राजकीय विरुपिका’ त्यापैकीच एक.......
येत्या काळात लोकसभा निवडणूक होईल. मग काय, भारत ‘महाशक्ती’ होईल आणि ‘विश्वगुरू’सुद्धा! फक्त या नव्या सरकारला वाढत्या लाभार्थ्यांसाठी नव्या ‘रेवड्यां’ची तरतूद तेवढी करावी लागेल. देशातील अजून काही बहुसंख्य समाजघटक ‘आम्हाला मागास ठरवा’, म्हणून आंदोलनं करतील, शेतकऱ्यांना पुन्हा ‘एमसीपी’साठी आंदोलन उभारावं लागेलच. पण हे तुम्ही विसरू नका की, क्रांती झाल्यासारखा देश बदललाय.......
‘मराठी भाषा गौरव दिन’ ज्या पद्धतीनं आणि रितीनं साजरा केला जातो, त्यावरून मराठी भाषा मेलीबिली की काय असा प्रश्न पडतो. कारण जिवंतपणी कुणाचंही तोंडावर कौतुक, सन्मान करण्याची महाराष्ट्रदेशाची परंपरा नाही. त्यामुळे मराठी भाषा निदान त्या मार्गावर तरी असावी. त्यामुळेच तिला तिथून मागे खेचण्यासाठी २७ फेब्रुवारी हा दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात, जोशाजल्लोषात साजरा केला जात असावा.......
राजकारणी, उद्योजक, प्रशासक, हजरजबाबी, व्यवहारकुशल मनोहर जोशी यांच्या सांगण्यासारख्या खूप आठवणी आहेत, पण इथं थांबतो. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचा राज्यव्यापी संपर्क असलेला एक उमदा, समंजसपणे राजकारण करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. उद्धव ठाकरे यांना भासत नसली, तरी आजच्या पडत्या काळात अशा नेत्याची शिवसेनेला नितांत गरज होती........
२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......
पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......
पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment