टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अम्मा (ज्युनिअर). चित्र - सतीश सोनवणे
  • Mon , 06 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Sasikala Natarajan शशिकला नटराजन Ashish Shelar आशिष शेलार Narendra Modi नरेंद्र मोदी Arvind Kejriwal नरेंद्र मोदी

१. अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती होणार, हे आता पक्कं झालं आहे. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत विधिमंडळाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड झाली आहे.

चला, आता अम्मा म्हणून कोणाच्या पायावर लोटून घ्यायचं, कोणाचे उत्तुंग कटआउट उभे करायचे, कोणाच्या पायाशी पायपोसापेक्षा वाईट वागणूक प्रेमाने मिळवायची आणि कोणाच्या मृत्यूनंतर आत्महत्या करायची, हे सगळे प्रश्न सुटले एकदाचे!

……………………………………

२. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे भाजपची मुंबईतील ताकद वाढली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये भाजपची थेट लढत शिवसेना आणि काँग्रेसविरुद्ध आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसने मॅचफिक्सिंग केली आहे. या दोन्ही पक्षांनी भाजपला टक्कर देण्यासाठी एकमेकांना पूरक असे उमेदवार दिले आहेत. ४२ प्रभागांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेने मॅच फिक्सिंग केली आहे. : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार

बायदवे, विषय निघालाच आहे, तर जरा सांगाल का शेलारमामा की मागच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद एकदम कशी काय वाढली? राष्ट्रवादीच्या 'निवडून येण्यास सक्षम' नेत्यांना कमलदलांवर विराजमान करूनच ना? आताही गावोगावचे भ्रष्टवादी गुंड गोळा करताय, तर त्यांना टिपून काढण्यासाठी 'सामना' करायला धनुष्य कोणाच्या तरी 'हाता'त जाणारच ना?

……………………………………

३. नोटाबंदीच्या माध्यमातून मी चुकीचे काम करणाऱ्यांचे स्क्रू टाईट केल्याने विरोधी पक्ष माझ्यावर चिडले आहेत. : पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्याच अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी सर्वसामान्य लोक बँकांबाहेर आणि एटीएमबाहेर रांगा लावत होते, चोरांसारखी कागदपत्रं सादर करत होते आणि स्वत:ला सीबीआय अधिकारी समजणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या अप्रस्तुत प्रश्नांना उत्तरं देत होते, ते सगळे चुकीचं काम करत होते, ही मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. स्क्रू तर त्यांचेच टाइट केले होते तुम्ही. एखाद्याचा 'स्क्रू ढिला' आहे, असा शब्दप्रयोगही कानावरून गेलाच असेल ना तुमच्या?

………………………………………….

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये वापरल्याप्रकरणी ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा खात्याने पेटीएम आणि रिलायन्स या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. मोदींचे छायाचित्र छापण्यापूर्वी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा या खात्याने केली आहे.

अच्छा, त्या अँटिलियामधून गडगडाटी हसण्याचा आवाज येतोय तो त्यामुळे होय. मुकेश अंबानी आणि पेटीएमचे चाळीस टक्के मालक असलेल्या चिनी 'अलीबाबा'चे सर्वेसर्वा जॅक मा हे दोघे म्हणे एकमेकांना सारखे फोन करून नुसते ख्या ख्या हसत होते दिवसभर. घाबरा रे घाबरा जरा; पटकन् सर्जिकल स्ट्राइक करून मोकळे होतील आमचे डेअरडेव्हिल पंतप्रधान, तेव्हा कळेल. पाचपाचशे रुपये तयार ठेवा दंडाचे मुकाट्याने.

…………………………………………………..

५. रक्तातील साखर वाढल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विश्रांती आणि निसर्गोपचार घेणार.

केजरीवालांच्या शरीरप्रकृतीची काही वेगळी तपासणी करायला हवी. ते सतत काँग्रेसपासून भाजपपर्यंत प्रत्येक पक्षाच्या नेत्यांबद्दल कटुशब्द बोलत असतात. सर्व पारंपरिक पक्षांचे नेते आणि अनुयायी त्यांच्या नावाने कडाकडा बोटं मोडत असतात. या कडू कारल्यासारख्या गृहस्थाच्या रक्तात साखर येते तरी कुठून?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......