टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सरताज अझीझ, नरेंद्र मोदी, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, निशा देसाई-बिस्वाल, सलमान खान, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतीन
  • Thu , 19 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump व्लादिमिर पुतीन Vladimir Putin सरताज अझीझ Sartaj Aziz सलमान खान Salman Khan रिंकू राजगुरू Rinku Rajguru आकाश ठोसर Akash Thosar

१. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची दादागिरी पाकिस्तान अजिबात सहन करणार नाही; मोदींचा पाकिस्तानविरोध हा केवळ निवडणुकांपुरता मर्यादित आहे. निवडणुका आटोपल्या की, त्यांचा हा विरोधसुद्धा मावळेल. : पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ.

अझीझभौ, तुम्ही तर टॉपमोस्ट सिक्रेटच सांगून टाकलंत राव! ही ट्रिक समजण्यासाठी तुम्हाला भारताकडे पाहण्याची गरज काय? तुमच्याकडचे लष्करी उच्चाधिकारी आणि राजकीय नेतेही तिकडे परिस्थिती बिघडली की, लोकांचं लक्ष विचलित करायला भारताविरुद्ध गरळ ओकायला सुरुवात करतात, तीही त्यासाठीच.

…………………………………………..

२. तरुणाईला ‘सैराट’ वेड लावणारी आर्ची आणि परशा यांची जोडी राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोघे राज्य निवडणूक आयोगाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनले असून ते निवडणूक आयोगाच्या पोस्टरवर झळकले आहेत.

मतदानाच्या दिवशी 'सैराट'चा शो ठेवू नका टीव्हीवर म्हणजे झालं. नाहीतर सगळंच मुसळ केरात जाईल. आता या निवडणुकीत हरलेले उमेदवार म्हणतील, 'आर्ची बसली अन् फांदी मोडली'!

…………………………………………..

३. विविध धर्म, महिला आणि अमेरिकेतल्या स्थलांतरितांच्या विरोधात गरळ ओकणारे डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर आपल्याला देश सोडून जावं लागेल का, असं माझी मुलं विचारतायत. ती खूप घाबरली आहेत. : भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री निशा देसाई-बिस्वाल (यांची नियुक्ती अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती. त्या २० जानेवारीला पायउतार होतील.)

अमेरिकन ट्रोलभैरवांनी त्यांचा वंश, धर्म, जात वगैरेंचा अश्लाघ्य भाषेत उद्धार करून त्यांना सहकुटुंब पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला नाही का अजून? की त्यांच्याकडे 'देशद्रोह्यां'ना क्यूबाला पाठवण्याची पद्धत आहे?

…………………………………………..

४. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणीच्या खटल्यातून सबळ पुराव्याअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता.

ये बेचारा, शूटिंग के बोझ का मारा, इसे चाहिए जंगल का टॉनिक चिंकारा, अशी जाहिरात वाचल्यामुळे त्याचा गैरसमज झाला, असं न्यायाधिशांनी सांगितलं की नाही निकाल देताना?

…………………………………………..

५. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सेक्स टेपवरून सुरू झालेल्या विवादाविषयी बोलताना पुतीन यांनी ट्रम्प यांच्यावरचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून रशियातील सेक्स वर्कर्स जगात सर्वोत्कृष्ट असल्याचं सांगितलं.

रशियाचे अध्यक्ष अनुभवी दिसतात. बाकी या विधानात ट्रम्प यांना हिंदी सिनेमातल्या 'लॉयन'च्या स्टायलीत दिलेली गर्भित धमकीच दिसते आहे. ट्रम्पही अनुभवी आहेतच. यांच्या अनुभवांची त्यांना माहिती आहेसे दिसते.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......