टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, मुलायम-अखिलेश यादव, अरुण जेटली आणि जयललिता
  • Fri , 30 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi अरुण जेटली Arun Jaitley मुलायमसिंह यादव Mulayam Yadav अखिलेश यादव Akhilesh Yadav जयललिता Jayalalitha

१. नोटाबंदीच्या कठोर निर्णयानंतर निर्माण झालेली आर्थिक दु:स्थिती जवळपास संपुष्टात आल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा. हा दावा करताना त्यांच्या भाषणाचा सूर ‘हत्ती गेले अन शेपूट राहिले’ असा होता.

भले रे शाब्बास, खोटे बोलावे तर ते असे रेटून बोलावे. ‘चहापेक्षा किटली गरम’ यातलाच हा प्रकार आहे. तुमच्या पक्षाच्या पंतप्रधानांनी ५० दिवसांचा वायदा केला होता. ते पूर्ण झाले. आजची स्थिती ही ‘शेपूट गेले आणि हत्ती राहिला’ अशी आहे हो!

................................................

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी तालकटोरा स्टेडियममधील टाउन हॉल कार्यक्रमात दुपारी तीन वाजता बोलतील, उद्या सायंकाळी साडेसात किंवा आठ वाजता देशाला उद्देशून भाषण करतील आणि येत्या सोमवारी लखनौत होणाऱ्या भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेळाव्यात भाषण करतील. नंतरच्या दोनपैकी एका भाषणात ते अजून एक धमाका करणार असल्याची चर्चा चालू आहे.

मोदी पंतप्रधान आहेत की, भाषणबाज? रोजच्या रोज भाषण ठोकत बसत असतील तर देशाचा कारभार कधी आणि कसा करणार? नाहीतर म्हणा, ‘द मॅन हू किल्ड इंडियन इकॉनॉमी’, हा लौकिक त्यांनी गेल्या पन्नास दिवसांत मिळवलाच आहे. आता नवीन किताब मिळवण्यासाठी नवा धमाका करावा म्हणावा!

................................................

३. नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्ष कितीही टीका करत असले, तरी हा निर्णय देशाचे व्यापक हित लक्षात ठेवूनच घेण्यात आला आहे – नरेंद्र मोदी

अगदी बरोबर आहे!  रांगेत उभे राहून लोक मरावेत, यातही देशहित आहे. शेतकऱ्यांनी मातीमोल भावाने त्यांचा भाजीपाल विकावा यातही देशहितच आहे. उद्योगधंद्यांनी कामगारकपात करावी यातही देशहितच आहे. बाजारपेठेतील खरेदी-विक्री मंदावण्यातही देशहितच आहे. उद्या तुम्ही म्हणाल की, तीन वेळा जेवण्याऐवजी लोकांनी एकवेळच जेवावे. कारण त्यातच देशहित आहे.

................................................

४. तामिळनाडू सरकार जयललिता यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मद्रास उच्च न्यायालयाने खरे कारण शोधून काढण्यासाठी त्यांचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात का येऊ नये असा सवाल उपस्थित केला आहे.

जयललिता याच एक गूढ होत्या, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमध्ये काही गूढ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उगाच नाही त्यांच्या मृत्यूच्या बातमीने पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता त्यांचे पार्थिव तपासासाठी बाहेर काढले जाईल आणि ते परत दफन करताना अजून काही लोकांचा मृत्यू होईल.

................................................

५. विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी बुधवारी ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री असलेला त्यांचा मुलगा, अखिलेश यांनीही २३५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यादवांची ही यादवी तशी अपेक्षेनुसारच आहे, त्यात अनपेक्षित असे काही नाही. अखिलेशला पुन्हा सत्तेत यायचे आहे आणि त्याच्या वडलांना त्याला सत्तेतून घालवायचे आहे. त्यामुळे हे असे होणे अटळ आहे.

................................................

६. सरकार भाजपचे किंवा नरेंद्र मोदींचे नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. धार्मिक तेढ वाढविण्याचा दृढ निश्चय करून सत्तेत आलेले हे लोक ‘सब का साथ, सब का विकास’ ही निव्वळ धूळफेक करीत आहेत. या धर्मभेदी लोकांपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी बंधुतेचा विचार नेटाने पुढे न्यायला हवा. – समाजवादी नेते भाई वैद्य

भाई, तुमचे सगळे बरोबर आहे. पण तुम्ही इतकी वर्षं बंधुतेचा विचार पुढे नेण्याचे काम करत होतात, त्यापासून समाजाचे किती रक्षण झाले हो? उलट तुम्ही अल्पसंख्य होत गेलात आणि समाज आहे तिथेच राहिला. मोदींच्या राज्यात पहा, समाज कसा पुढे जातोय. मग सरकार कुणाचे का असेना, त्याने काय फरक पडतोय!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......