श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या साहित्याचे दर्शन कालदर्शिकेच्या माध्यमातून
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
निवड व संपादन – हिमांशू स्मार्त
  • कालदर्शिकेचे श्रावण महिन्याचे पान
  • Fri , 28 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक ‌Book of the Week श्रीनिवास विनायक कुलकर्णी हिमांशू स्मार्त

श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतील एक सर्वोत्तम ललितलेखक. त्यांची ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ ही चार ललितलेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही चारही पुस्तके मराठी ललितलेखनातील मानदंड मानली जातात. अतिशय तरल, आशयघन आणि चित्रमय शैली ही कुलकर्णी यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या लेखनाचा हा आविष्कार कालदर्शिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे नाटककार-ललितलेखक हिमांशू स्मार्त आणि प्रकाशक राहुल कुलकर्णी यांनी.

मराठीमधला हा एकमेवाद्वितीय म्हणावा असा प्रयोग आहे.

ही कालदर्शिका ११ एप्रिल २०१३ (गुढीपाडवा) रोजी प्रकाशित करण्यात आली. मात्र ही दिनदर्शिका नसून कालदर्शिका आहे. त्यामुळे ती तुमच्या लेखनाच्या, कामाच्या टेबलवर, ग्रंथसंग्रहात, कपाटात असायलाच हवी अशी आहे.

या कालदर्शिकेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे बारा मराठी महिने आहेत. या प्रत्येक महिन्याला साजेसा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या साहित्यातील एक उतारा हिमांशू स्मार्त यांनी निवडला आहे. त्या महिन्याला साजेसे असे अतिशय सुंदर पेंटिंग रिचा वोरा या चित्रकर्तीने केली आहे. सोबत दिलेल्या छायाचित्रांमधून तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पानाची किती सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे याची कल्पना येईलच. आणि या सर्वांची अतिशय कल्पक कालदर्शिकेची निर्मिती रावा प्रकाशन, कोल्हापूरच्या राहुल कुलकर्णी यांनी केली आहे. याशिवाय कालदर्शिकेत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या ऋतूंचाही उल्लेख आहे.

तर अशी ही कालातीत साहित्य, चित्र, मराठी महिने आणि मराठी ऋतु यांचा अतिशय सुंदर मिलाफ असलेली कालदर्शिका प्रत्येक साहित्यप्रेमीच्या संग्रही असायलाच हवी.

या कालदर्शिकेची ही एक झलक

या सुरुवातीच्या परिचयपर दोन पानानंतर कालदर्शिका सुरू होते

चैत्र

वैशाख

ज्येष्ठ

आषाढ

श्रावण

भाद्रपद

अश्विन

कार्तिक

मार्गशीर्ष

पौष

माघ

फाल्गुन

आणि हे कालदर्शिकेचे शेवटचे पान

.............................................................................................................................................

अशी ही संग्राह्य कालदर्शिका केवळ ५० रुपयांना उपलब्ध आहे.

या कालदर्शिकेच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3748

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......