‘हिंदू’ :  कादंबरीलेखन स्पर्धा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
एक निवेदन
  • भालचंद्र नेमाडेलिखित ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Sat , 28 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade हिंदू Hindu

भालचंद्र नेमाडेलिखित ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी महाकाव्यात्म स्वरूपाची आहे. महाकाव्यात असावीत तशी अनेक कथाबीजे या कादंबरीत विखुरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने एक कादंबरीलेखन स्पर्धा जाहीर करत आहोत.

‘हिंदू’ या कादंबरीतील कथाबीजांवर\उपकथांवर आधारलेली, तीमधील नायक, पात्रे, प्रसंग, वातावरण इत्यादींचा आवश्यक तर संदर्भ घेऊन सर्वस्वी नवीन अशी कादंबरी लेखकांनी लिहावी असा प्रस्तुत स्पर्धेमागील हेतू आहे.

कादंबरी पूर्णपणे स्वतंत्र असावी व तीमधून लेखकाची सर्जनशीलता व्यक्त व्हावी. तथापि तिला ‘हिंदू’मधील बीजाचा आधार असावा.

‘हिंदू’मधील बीजांच्या आधारे परंतु आपल्या स्वत:च्या कल्पनाशक्तीच्या\प्रतिभेच्या बळावर लेखकांचे लेखन असावे अशी अपेक्षा आहे.

स्पर्धेच्या आयोजकांना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखकांनी ‘हिंदू’ या कादंबरीची सिक्वेल लिहावी अशी अजिबात अपेक्षा नाही. कादंबरी वाचतना लेखकाच्या नवनिर्मितीक्षमतेचा प्रत्यय वाचकांना यावा.

या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकेल. अगदी नव्या लेखकांपासून प्रथितयश लेखकांपर्यंत कोणालाही स्पर्धेत सहभागी होता येईल.

कादंबरीला पृष्ठसंख्येचे कोणतेही बंधन नाही. लहान-मोठ्या आकाराचेही बंधन नाही.

स्पर्धेसाठी कादंबरी सादर करण्याचा अखेरचा दिनांक ३१ डिसेंबर २०१८ हा आहे. स्पर्धेसंबंधी काहीही माहिती विचारावयाची असल्यास खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर दुपारी ३ ते ५ या वेळेत संपर्क साधावयास हरकत नाही.

स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या कादंबऱ्यांना रु. पंचवीस हजार, रु. वीस हजार व रु. दहा हजार या रकमांची अनुक्रमे (प्रथम, द्वितीय व तृतीय अशी) तीन पारितोषिके दिली जातील. पारितोषिकासंबंधीचा अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. तो स्पर्धकांवर बंधनकारक असेल. निर्णयानंतर त्यासंबंधी कोणतीही चर्चा वा पत्रव्यवहार केला जाणार नाही. निर्णय ३१ मार्च २०१९ पर्यंत जाहीर केला जाईल. प्रथम क्रमांकाची कादंबरी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने प्रकाशित केली जाईल.

कादंबरी पाठवण्याचा पत्ता –

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ३०८, फिनिक्स, ४५७ एस.व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४०० ००४.

दूरध्वनी : ०२२ – २३८२६२२५ (दुपारी ३ ते ५)

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......