‘डिप्टी कलक्टरी’ ही विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक आहे!
ग्रंथनामा - झलक
मधुकर धर्मापुरीकर
  • ‘डिप्टी कलक्टरी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 27 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक डिप्टी कलक्टरी Deputy Collectory अमरकान्त Amarkant

‘डिप्टी कलक्टरी’ ही हिंदी साहित्यातले ज्येष्ठ लेखक अमरकान्त यांची कथा विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक आहे. हीम मूळ हिंदी कथा, या कथेचा मराठी अनुवाद, अनुवाद करतानाचा लेखकाचा अनुभव, त्या अनुभवाचा हिंदी अनुवाद आणि कथेच्या निमित्तानं मूळ लेखकाशी झालेला पत्रव्यवहार, अशा स्वरूपाचं ‘‘डिप्टी कलक्टरी : अनुवाद तथा अनुभव’ हे मधुकर धर्मापुरीकर यांचं अनोखं पुस्तकं नुकतंच शब्दालय प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेलं हे मनोगत...

.............................................................................................................................................

‘हिंदी कहानी में दूसरा प्रेमचंद नहीं हुआ जा सकता. इसी तरहा दूसरा अमरकान्त भी नहीं. अमरकान्त दरअसल ऐसे पहले कहानीकार है, जिन्होंने कहानी के वृत्तांत को रेखाचित्रात्मक अंदाज में ढालने का कौशल साधा.’

- राजेन्द्र कुमार

(वर्तमान साहित्य- शताब्दी कथा विशेषांक : जाने.-फरवरी २०००)

‘कहानी’ या हिंदी मासिकात, कथा स्पर्धेत पुरस्कार मिळालेली ‘डिप्टी कलक्टरी’ ही कथा १९५५ मध्ये प्रसिद्ध झाली. हिंदी साहित्यातले ज्येष्ठ लेखक अमरकान्त यांची ही कथा विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक आहे. ‘हिंदी कहानी, कहानीचा विकास-बदल,’ या विषयाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा ‘उसने कहा था’ (चंद्रधर शर्मा ‘गुलेरी’), ‘कफन’ (प्रेमचंद), ‘चीफ की दावत’ (भीष्म साहनी), ‘तिसरी कसम’ (रेणू), ‘परींदे’ (निर्मल वर्मा) अशा कथांसोबत आवर्जून उल्लेख होत असतो, तो अमरकान्त यांच्या ‘डिप्टी कलक्टरी’ या कथेचा. या कथांपैकी ‘चीफ की दावत’ आणि ‘डिप्टी कलक्टरी’ या कथांचे अनुवाद करण्याचे भाग्य मला लाभले.

वीस पृष्ठांची ही दीर्घकथा. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातला मोठा मुलगा नोकरीच्या प्रयत्नात असतो. डेप्यूटी कलेक्टरच्या परीक्षेचा दिवस-रात्र अभ्यास करीत असतो. आणि आपला तरुण मुलगा मोठ्या पदावर जाणार, अशी स्वप्नं पाहणारे त्याचे वडील, या दोघांची ही कथा. रात्रंदिवस त्याच धुंदीत असताना, आर्थिक विवंचना, आशा-निराशा, रागा-लोभासोबतच मुलाबद्दल दाखविता न येणाऱ्या अतीव करुणेच्या भावनेत वावरणारा, आता थकत चाललेला त्याचा पिता; अशा वातावरणात घडत जाणारी ही कथा आहे.

‘स्वातंत्र्योत्तर हिंदी कहानियां’ या कथासंग्रहाचे संपादक कमलेश्वर यांनी आपल्या प्रस्तावनेत या संदर्भात उल्लेख केला आहे, तो असा : “नयी कहानी या स्वातंत्र्योत्तर कहानी की जो गहरी पहचान पांच दशकों में व्याप्त और पिछली सदी की समाप्ती तक मौजूद है, और निश्चय ही जो २१वी शताब्दी में भी रहेगी- उसका श्रेय हिंदी कथाजगत के उन कालजयी रचनाकारों को जाता है, जिन में प्रमुख है- भीष्म साहनी, निर्मल वर्मा, कमलेश्वर, फणीश्वरनाथ रेणू, मोहन राकेश, अमरकान्त आदि कथाकार.” आणि ‘डिप्टी कलक्टरी’ कथेसंदर्भात कमलेश्वर यांनी म्हटलं आहे, “अमरकान्तने ‘डिप्टी कलक्टरी’ में निम्न मध्यमवर्ग की नियती और महत्त्वाकांक्षा को यथार्थवादी स्वर दिया है.’

अमरकान्त यांच्या या ‘डिप्टी कलक्टरी’ कथेचा अनुवाद मी सतरा वर्षांपूर्वी केला. या निमित्ताने उत्कट असे अनुभव आले. अमरकान्त यांच्याशी पत्रव्यवहार झाला. आज एवढ्या वर्षांनंतरही, ही कथा, हा पत्रव्यवहार तितकाच मोलाचा वाटतो, म्हणून या संग्रहाचा प्रयत्न केला आहे.

तथापि, आज साहित्यात बदललेलं कथेचं स्वरूप, झपाट्यानं बदलत जाणारं हे दैनंदिन पाहता या कथेला आजच्या दिवसांत जागा मिळेल का, हा प्रश्न पडला. पाच-सहा मुलं असलेलं निम्न मध्यमवर्गीय कुटुंब, जुने-बाद झालेले दिवस, भाबडा, स्वप्न पाहणारा बाप हे सगळं आज अडगळीचं झालं आहे की काय, असं वाटावं असा हा काळ. शिवाय, उपमा-प्रतिमा, उत्कटता-भावुकताविरहित मांडल्या जाणाऱ्या आजच्या कथेच्या संदर्भात ‘डिप्टी कलक्टरी’चं प्रयोजनच काय या विचाराने काही दिवस अस्वस्थही झालो. कथेच्या शेवटी, परीक्षेत असफल झालेला मुलगा-बबुआ हा बाजेवर निपचित पडून असतो. डोळे झाकलेले, हालचाल नाही; अशा स्थितीत न सांगता येणाऱ्या शंकाकुशंकांचा कुठेही उल्लेख न करता कथाकाराने बापाच्या हालचालींचं जे वर्णन केलं- मुलाला कळणार नाही अशी काळजी घेऊन तो आपल्या मुलाच्या नाकाजवळ वाकतो, हा प्रसंग वाचताना आपली जी तगमग होते, त्या सर्व अनुभवांचा वृत्तांत आज खरंच महत्त्वाचा वाटेल का...

‘डिप्टी कलक्टरी’ ही कथा, कथेतले ते तसे दिवस, कथेतल्या पिता-पुत्र सबंधांचं ते स्वरूप आज...आजच्या दिवसांत किती प्रस्तुत आहे याचा विचार करताना जाणवत राहिले, ते शकलदीपबाबू-कथेतला पिता. एका तरुण मुलाचा, मोठ्या नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या मुलाचा बाप. वाटू लागलं, त्याच आर्थिक परिस्थितीतलं-आजच्या काळातलं कुटुंब घेतलं, आजचा बाप हिशोबात घेतला, तर ही कथा आज कोणत्या संदर्भात प्रस्तुत वाटेल... त्या काळातल्या त्या पिता-पुत्राच्या भावना, पिता-पुत्रातले नातेसंबंध आज तसेच पाहायला मिळतील का?

दोनही बाबतीत आज बदल झालेले आहेत. आज हे असं घडलं, तर त्याचा शेवट असाच राहील का, या प्रश्नाला चटकन हो म्हणता येणार नाही. आजचे नातेसंबंध, स्वभाव बदललेले आहेत, हे या कथेच्या संदर्भात तीव्रतेनं जाणवत राहतं.

आणि आजची कथा. आजची बदललेली कथा वाचताना अधूनमधून असं वाटत राहतं, की आपण कुठेतरी कमी पडत आहोत, मागे राहिलो आहोत. आजची कथा वाचताना, ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं, तसं माझं होत असतं. कथा अंगावर येते आहे, अशी ही भावना. ‘कथादेश’ या दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या मासिकात वर्ष २००५ ते २००७ या कालावधीत समीक्षक जयप्रकाश यांचं, ‘कहानी की उपस्थिती’ या नावानं एक सदर प्रसिद्ध झालं. कथा या साहित्य प्रकारावर अभ्यासपूर्ण आणि तितकीच जिव्हाळ्यानं केलेली चर्चा हे या सदराचं वैशिष्ट्य. सदराच्या एका लेखाची सुरुवातच जयप्रकाश यांनी एवढी सुरेख केली, की वाचणारा आपोआपच त्या चर्चेत सहभागी होऊन जातो :

“इन दिनों, रोजमर्रा के जिंदगी में हो या कला-साहित्य की दुनिया में, वर्तमान और उसकी वास्तविकता की रोशनी ऐसी तीखी हो चली है, की मन थोडा मद्धिम रोशनी में जाने को तरसता है... जीवन में बुद्धिचातुर्य बढा है और साहित्य में भावुकता कम हुई है. आज की ज्यादातर कहानियां तात्कालिकता के दलदल में इतनी घंसी हुई है, की एक दुर्लभ मानवीय क्षण तक पहुंचने के लिए संवेदना के विस्तीर्ण आकाश में उडने की ताकत खो बैठी है.”

जयप्रकाश यांचं हे सांगणं आजच्या मराठी कथांसाठीही लागू आहे असं मला वाटतं. आणि जयप्रकाश यांच्या या विधानातूनच मला ‘डिप्टी कलक्टरी’चं मोल नव्यानं जाणवलं. वाटलं, ही कथा आणि या कथेवरची चर्चा, कथेचा अनुभव वाचकांसमोर मांडावा.

आजचे दिवस हे व्यस्ततेचे-त्रस्ततेचे झालेले आहेत. शिवाय, आज मध्यमवर्गीय म्हणावी, अशी आर्थिक स्थितीही राहिली नाही. समृद्धीचा वाढलेला स्तर आणि मर्यादित कुटुंब यामुळे अपुरेपणाची जाणीव-जी आधी सतत असायची, ती राहिली नाही. आर्थिक विवंचना, हतबलता, अपुरेपणाची भावना; आणि हे सगळं स्वीकारून दिवस काढण्याची वृत्ती बाजूला राहिली; त्या ऐवजी, चढाई करून-मोठी जोखीम स्वीकारून, परिस्थिती बदलून टाकायची आज मानसिकता दिसते.

शिक्षण क्षेत्राचा विस्तार, नोकऱ्यांचे अफाट विश्व आणि तंत्रज्ञानाची ‘बेसुमार प्रगती’ यात हरवलेला आजचा मुलगा आणि त्या क्षेत्राशी अनभिज्ञ असलेला बाप; अशा बापाचं मन आज मुलासाठी कशा भावनेचं असतं... पितृत्वाची ती अपार भावना, अपार करुणा-जी नैसर्गिक असते, मूलभूत असते; तिचं स्वरूप आज बदललेलं आहे, की निवळलेलं आहे...

महत्त्वाचं म्हणजे, त्या तशा दिवसांत तरुण मुलाची, बापाबद्दल रुसलेली-परंतु बद्ध असलेली भावना; या दिवसांत, या वातावरणात कशी झालेली आहे... असं वाटतं, आज दोघंही आपापल्या वाटेनं जात आहेत. सम-अंतर सोडून आता दोघांमधला कोन अंशाअंशानं वाढत असताना, पिता-पुत्र नातसबंधांतला तो कमीत कमी अंशाचा कोन सारखा लक्ष वेधून घेतो; त्याचं मोल जाणवत राहतं, ते ‘डिप्टी कलक्टरी’ मुळे.

आणि हिंदी-मराठी भाषेतून मांडलेली ही भावना त्याचमुळे जतन करावीशी वाटली, सांभाळून ठेवावी वाटली, त्यामुळे केलेला हा प्रयत्न. माणूस कितीही सुधारलेला असला, तरी त्याच्या हृदयाची स्पंदनं ऐकायची, तर त्याच्या छातीला कान लावावे लागतात. अनेक कारणांमुळे आज ही स्पंदनं ऐकली जात नाहीत, ऐकायला कठीण होत आहेत.

कथेचंही तसंच असतं. ‘भावुकता के पक्ष में’ या कथेबद्दलच्या समीक्षा लेखात जयप्रकाश यांनी म्हटलं आहे – “‘कथा रचना में अगर यथार्थ का कम, और उसे गढने के कौशल का ज्यादा प्रयोग हो तो गढंत की चमक भले ही पाठक को अभिभूत कर दे, जीवन की धडकन सुनने के लिए उसे कहानी के सिने फर कान लगाना ही पडता है।’

‘डिप्टी कलक्टरी’कथेतली पिता-पुत्र नात्यातली ही संवेदना अनुभवताना शकलदीपबाबूंची स्पंदनं आज साठ वर्षांनंतरही आपल्याला जाणवतील.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4500/Deputy-Collectori

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Jayant Raleraskar

Tue , 31 July 2018

हे खरे आहे की प्रत्यक्ष आयुष्याचे ताणे-बाणे दुय्यम होत कथा सजवण्याचे प्रयत्न अधिक आहेत. याला अपवाद नक्कीच आहेत, पण एकंदरीत कलाबूत वापरण्याकडे कल अधिक दिसतो. जयप्रकाश यांचे म्हणणे मराठीला तंतोतंत लागू पडते असे ठामपणे म्हणण्या इतपत माझे वाचन नाही. पण त्यात तथ्य असावे. मुळात नात्यांचे अनेक पदर हे अस्तंगत होत आहेत असेही अनेकवेळा वाटते. त्यामुळे कदाचित ही दुखरी नस विसरली तर बरी ...असे तर आपल्याला वाटत नाही...?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......