वाचलीच पाहिजेत अशी काही पुस्तकं - भाग ४
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 01 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक

‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी मराठी पुस्तकांची परीक्षणे, त्यातील काही भाग किंवा संबंधित लेखकांच्या मुलाखती प्रकाशित होतात. एप्रिल व मे २०१८ या महिन्यांत ‘अक्षरनामा’वर आलेल्या पुस्तकांविषयी...

.............................................................................................................................................

‘होमो सेपिअन्स’ म्हणजे ‘शहाणा माणूस’! - युव्हाल नोआ हरारी

‘Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वासंती फडके यांनी केला असून ते १० मे रोजी प्रकाशित होत आहे.

या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

खरं सांगण्यापूर्वीचं ‘स्वगत’ - करण जोहर

मी जी निर्मिती करतो, त्याच्या फळाची  मी फार पर्वा करत नाही. पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल. जर सिनेमा हिट झाला, तर छानच! पुढच्या कामाला सुरुवात करा. आता एका अर्थानं यश आणि अपयश या बाबतीत माझ्या भावना बधिर झाल्या आहेत, असं म्हणता येईल.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4370

.............................................................................................................................................

‘चित्रभास्कर’ : चंदावरकरांच्या लेखनाचं भाषांतर करताना  - आनंद थत्ते

अरुण खोपकरांनी मला शिकवलं आणि त्यांना भास्कर चंदावरकरांनी. भाषांतर करताना मला असं वाटत होतं की, ‘पंडितजी मला शिकवताहेत. म्हणताहेत हे असं बघ, हे असंही बघता येतं. असा विचार करून बघ, जमतंय का.’ भास्कर चंदावरकरांना मी कधी भेटलो नाही. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं देखील नव्हतं. पण हे भाषांतर करत असतानाच्या दीड-दोन वर्षांच्या काळात मला त्यांचा स्नेहल सहवास लाभला. त्यांच्या निकटच्या सहवासात हे दिवस आनंदात गेले.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4288

.............................................................................................................................................

‘गावकळा’चं ‘ग्रामस्वच्छता’ हे मुख्य कथानक आहे. आणि हेच तिचं वेगळेपण आहे. ऋषिकेश देशमुख

‘गावकळा’ या कादंबरीचं ‘ग्रामस्वच्छता’ हे मुख्य कथानक आहे. आणि हेच तिचं वेगळेपण आहे. ही कादंबरी ग्रामीण वास्तवाचा वेध घेणारी आहे. सरकारी योजना राबवण्यासाठी किती पराकोटीचा संघर्ष करावा लागतो, याची कल्पना ‘गावकळा’ वाचल्यानंतर येते. गावातील लोकांच्या सुष्ट व दुष्ट वृत्ती-प्रवृत्तींचं दर्शन या कादंबरीतून घडतं.

गावकळा : प्रदीप धोंडीबा पाटील, राजहंस प्रकाशन, पुणे

पाने : २४८, मूल्य : २६० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4049

.............................................................................................................................................

‘लोकमान्य ते महात्मा’ हा प्रचंड मोठ्या विद्वत्तेचा विषय आहे!  - रामचंद्र गुहा

‘लोकमान्य ते महात्मा’ हा प्रचंड मोठ्या विद्वत्तेचा विषय आहे. तो गहन तर आहेच, पण त्याचा आवाकाही तेवढाच मोठा आहे. मराठीतून अभय दातार यांनी अत्यंत कौशल्यानं या दोन खंडांतील अभ्यासाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या पैलूंचा विस्मयचकित करणारा अभ्यास दिसून येतो. हा अभ्यास समाजशास्त्रीय आहे. कारण तो जाती, समाज आणि प्रदेश यांतील जातीय राजकारणावर संशोधन करतो.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4415

.............................................................................................................................................

‘सल्तनत-ए-खुदादाद’ : धर्मवेड्या, जमातवादी प्रचारास ठोस आव्हान देणारा ग्रंथ  - राम पुनयानी

सरफराज अहमद यांच्या पुस्तकानं विकृतीच्या ढिगाऱ्यातून खरा टिपू शोधून काढण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. अत्यंत नेटक्या, नेमक्या व ठोस संदर्भाच्या आधारानं टिपूचं व्यक्तित्व, कार्य,  राज्यकारभार, धोरणं, दृष्टिकोन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व महत्त्व जाणणं, यांसह आपल्या राज्याच्या विस्ताराबरोबरच सुस्थीर शासन, शांततापूर्ण प्रजाजीवन याबाबत तो कसा दक्ष व व्यापक क्षमतांचा धनी होता याचे अनेक पदर उलगडले आहेत.

या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4284

.............................................................................................................................................

तुकोबा अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे हे पुस्तक उदाहरण म्हणून पाहावे  - भास्कर हांडे

तुकोबांचे काव्य व त्यावरून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे विश्लेषण व विवेचन, तसेच तुकोबांच्या अभंगातील आशयाचा परामर्ष घेणे, हे दुहेरी पैलू ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकात आले आहे. आधुनिक चित्रकलेत हे आव्हानात्मक आहे, हे चित्र-शिल्प तयार करताना जाणवत होते. समकालीन आधुनिक कलाविश्वात काम करताना त्याची जाणीव होती. तुकोबांच्या गाथेतील चित्र-शिल्प संकल्पनेची सुरुवात फारच उत्साही वातावरणात झाली.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4422

.............................................................................................................................................

‘उष्टं’ : हा परिवर्तनाचा आलेख आहे… - कुणाल रामटेके

भारतीय वास्तवातील ‘भंगी’ समाजाच्या जीवनावर आधारित अत्यंत भेदक वास्तव चित्रण ‘उष्टं’च्या निमित्तानं वाचकांपुढं येतं. जातीयवादी व्यवस्थेनं थोपलेलं अत्यंत किळसवाणं असं हे जीवन वास्तव मात्र अजूनही बदलू शकलेलं नाही, हे विशेष. मुळात, इथला ‘भंगी’ समाज ज्या परिस्थितीत जगतो, ते आजही इथल्या सर्वसामान्य समाजासाठी निव्वळ अकल्पनीय आहे. ‘उष्टं’च्या माध्यमातून या वास्तवाची किळस आल्याशिवाय राहत नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4337

.............................................................................................................................................

भारतीय समाजाला धार्मिक असहिष्णुता, अवैज्ञानिक विचारपद्धती आणि संकुचित मानसिकता यावर मात करावी लागेल - विभूती नारायण राय

जमातवाद हे कुठल्याही एका समुदायाचे लक्षण नव्हे. लहान-मोठे सारेच धार्मिक समुदाय या प्रवृत्तीला बळी पडत आले आहेत. भारतीय संदर्भात जमातवादाचे स्वरूप समजून घेण्यासाठी या उपखंडातील दोन सर्वांत मोठ्या धार्मिक समुदायांच्या - हिंदू आणि मुस्लिमांच्या - परस्परसंबंधांचा अभ्यास करणे हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. हिंदू आणि मुसलमान सारेच किंवा त्यांच्यातले बहुसंख्य लोक हे स्वभावत:च जमातवादी आहेत, असा याचा अर्थ नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4423

.............................................................................................................................................

तरंग अंतरंग - पर्यावरणाच्या प्रश्नांचं अचूक भान जागवणारं पुस्तक - वर्षा गजेन्द्रगडकर

समकालीन पर्यावरणाची चिकित्सा करणारं हे पुस्तक पर्यावरण अभ्यासक आणि विद्यार्थी, निसर्गप्रेमी, माध्यम प्रतिनिधी, या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्वाचं आहे. उत्तम आशयाला मिळालेली उत्तम निर्मितीमूल्याची जोड लक्षात घेण्याजोगी आहे. त्यामुळे मुखपृष्ठ आणि मांडणी करणारे राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांनाही श्रेय द्यायला हवं...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4414

............................................................................................................................................

‘साहेब माझा स्वतःवर नाही एवढा विश्वास तुमच्यावर आहे’! - प्रा. अविनाश कोल्हे

मोटारसायकल सुरू करताना कलाल तिला म्हणाले ‘हे बघ. ती संधी सोडू नको. आमच्यासारख्यांच्या नोकरीचा काही भरवंसा नसतो. आज इथे तर उद्या तिथे. आज मी इथे आहे. त्या प्रोजेक्टमधील लोकं माझ्या परिचयाचे आहेत. पटकन तुझे काम होर्इल आणि तुझा स्वतःचा ब्लॉक होर्इल. फारसा विचार करू नको. माझ्यावर विश्वास ठेव.’ ‘साहेब माझा स्वतःवर नाही एवढा विश्वास तुमच्यावर आहे’.

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4424

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......