टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राजा सिंग, देवेंद्र फडणवीस, विजय रूपानी आणि योगी आदित्यनाथ
  • Mon , 10 April 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राजा सिंग Raja Singh देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis विजय रूपानी Vijay Rupani योगी आदित्यनाथ Yogi Adityanath

१. राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणाऱ्यांचा शिरच्छेद करू, असे चिथावणीखोर वक्तव्य भाजपचे गोशामहलचे आमदार राजा सिंग यांनी केले आहे. हैदराबादमधील एका सभेत बोलताना राजा सिंग म्हणाले, ‘राम मंदिराची निर्मिती केल्यास परिणामांना सामोरे जा, असा इशारा काहीजण देतात. आम्ही तुमच्या याच विधानाची वाट पाहत आहोत. यानंतर आम्ही तुमचा शिरच्छेद करू.’

आता सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणतील, ओळखा पाहू? ते म्हणतील, ‘शिरच्छेदाला विरोध आहे, कोणतंही हिंसक कृत्य होता कामा नये. पण, राम मंदिर झालंच पाहिजे.’ त्यांच्या अनुयायांना अलीकडचं, सामोपचाराचं, सबुरीचं काही ऐकायची, मनावर घ्यायची सवय नसते, झालंच पाहिजे, हे कळीचं वाक्य, तो आदेश. कोणी ना कोणी असं भडकवणारं बोलत राहायचं, मग हे थोडं पाणी मारतात, अशी इंचाइंचाने आग पुढे पेटवत न्यायची.

……………………………………………………

२. आपण कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी त्यांच्या हितासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे पुन्हा कर्जच काढण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेतीक्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. 

कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत, हे तर खरंच आहे. तसं तर मुख्यमंत्रीपदी फडणवीस आहेत, म्हणूनही प्रश्न सुटत नाहीत. त्यांनी इतर विषयांमध्ये घेतलेले निर्णय हे त्या क्षेत्रांचे सगळे प्रश्न सोडवणारे ठरले, असंही काही झालेलं नाही. असा निर्णय फार फार तर त्यांच्या राजीनाम्याचा असू शकतो; त्यांच्याजागी मुख्यमंत्री होऊ इच्छिणाऱ्यांपैकी एकाचा तरी प्रश्न हमखास सुटेल त्यातून. मग शेतकऱ्यांवरच ही ‘प्रश्न सोडवण्याची’ मेहेरनजर का? त्यातून प्रश्न सुटेल याची तरी काय खात्री? शिवाय शेतमालाला योग्य भाव मिळवून देऊन शेतकऱ्याला त्याच्या पायावर उभा करण्याऐवजी शेतीत गुंतवणूक आणण्याचा प्रस्ताव तर शेतकऱ्यांसाठी रोगापेक्षा औषध भयंकर ठरू शकतो.

……………………………………………………

३. देशात गोमांस आणि कत्तलखान्यांवर वादविवाद सुरू असताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यामुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. गायींबद्दल दया नसणाऱ्या व्यक्तींविषयी गुजरात सरकारला कोणतीही संवेदना नाही, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी म्हटले आहे. गाय आमची माता आहे. आमच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ज्यांच्या मनात गायीबद्दल दयेची भावना नसेल, त्यांना गुजरात सरकारकडून कोणतीही दया दाखवली जाणार नाही,’ असेही ते म्हणाले.

ही तर सरळ खुनाखुनीचीच भाषा झाली. हे रूपानी महोदय गायीबद्दल सहानुभूती दाखवतात म्हणजे दिवसभरात जेवणाच्या वेळेला हिरवा, पौष्टिक चारा खातात की गोबर भाकरी? त्यांची बुद्धी पाहता त्यांच्या गोपुत्र असण्याबद्दल शंका घेता येत नाही. काय सांगावं, सकाळी सकाळी सहानुभूतीपूर्वक लिटर दोन लिटर दूधही देत असतील. 

……………………………………………………

४. एका प्रस्तावित योजनेनुसार आता पाकिस्तान चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी गाढवांचा वापर करणार आहे. पाकिस्तानी गाढवं चीनला विकण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. या योजनेमुळे पाकिस्तानला चांगलाच फायदा होणार आहे. गाढवांच्या कातडीचा चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या कातडीपासून मिळणाऱ्या जिलेटिनचा वापर अनेक महागड्या औषधांच्या निर्मितीसाठी केला जातो.

भारतानेही असं पाऊल उचलायला हरकत नाही. पाकिस्तानापेक्षा निश्चितच अधिक संख्येने आणि गाढवपणात अधिक मातब्बर अशी गाढवं आपल्याकडे सापडतील. शिवाय, त्यांचा आणि गायींचा वंश सेम असला, तरी त्यांच्याभोवती पावित्र्याचं वलय वगैरे नाही.

……………………………………………………

५. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या ‘अम्मा कॅन्टीन’च्या धर्तीवर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं सरकारही गरिबांसाठी ‘अन्नपूर्णा कॅन्टीन’ सुरू करणार आहेत. राज्यातील गरीब, मजूर, रिक्षाचालक, कमी वेतन असणाऱ्या नोकरदार वर्गासाठी या योजनेअंतर्गत तीन रुपयांत नाश्ता आणि पाच रुपयांत जेवण दिले जाणार आहे.

आता देशातल्या प्राप्तिकरदात्यांचे तमाम स्वघोषित प्रतिनिधी वाळूत चोची खुपसून निपचित पडून राहिले असतील. त्यांच्या प्राप्तिकरातून देश चालतो, अशी त्यांची गोड गैरसमजूत असते. त्यामुळे ते ठराविक कल्याणकारी योजनांवर ‘अपव्यय अपव्यय’ म्हणून ओरडत असतात. दक्षिण भारतात जयललिता छाप पुढाऱ्यांनी स्वस्त अम्मा कँटीन आणलं होतं. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकऱ्यांच्या आग्रहाने एक रुपयात झुणकाभाकर देण्याचा खेळ खेळून झाला. आता उत्तर प्रदेशात तोच स्वस्त लोकप्रियतेचा महागडा मार्ग अवलंबला गेला, तरी हा वर्ग चिडीचूप्प राहील किंवा या योजनेची क्रांतदर्शी म्हणून भलामण करून दाखवील.

……………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......