शिवसेना-काँग्रेस–राष्ट्रवादी : सत्तेचा नवा ‘मुंबई-राज्य पॅटर्न’?
पडघम - राज्यकारण
मोतीराम पौळ
  • काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना
  • Mon , 27 February 2017
  • राज्यकारण State Politics काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress शिवसेना Shiv Sena भाजप BJP

 राज्यातील १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड राजकीय उलाथापालथी झाल्या आहेत. मुंबई-ठाणे वगळता राज्यात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात शिवसेनेचा सुपडा साफ केला आहे. मुंबईत ८४ जागांसह शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला असला असला, तरी दोन जागांच्या फरकाने भाजप दोन नंबरवर आहे. ‘मुंबईत महापौर कोणाचा?’ याकडे महाराष्ट्रासह सर्व देशाचे लक्ष लागले आहे. महापौरपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ लागली आहे. सेना-भाजप युती तुटल्यानंतर या पक्षांमध्ये आलेली प्रचंड कटुता पाहता, हे पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. शिवाय भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असा ‘पुणे पॅटर्न’सारखा सत्तेचा नवीन ‘मुंबई पॅटर्न’ पुढे येऊ शकतो. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने महाराष्ट्रात हा नवा ‘राजकीय त्रिकोण’ बघायला मिळाला, तर आश्चर्य वाटायला नको. 

सेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तरच मुंबईत पाठिंबा दिला जाईल, असे उघड वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते, हे सत्य नाकारता येत नाही. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे सुमधुर संबंध असले, तरी या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे ग्रामीण आणि शहरी गड उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे- पिंपरीतील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते. ‘पुणे पॅटर्न’च्या निमित्ताने राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र नांदले होते, हा इतिहास काही जुना नाही. त्यामुळे सत्तेचा नवा ‘मुंबई पॅटर्न’ अस्तित्वात येऊ शकतो. हेच समीकरण राज्य सरकारच्या बाबतीतही लागू पडते.

मुंबई - सत्तेचे सूत्र 

शिवसेना + अपक्ष - ८४ + ४ = ८८ + काँग्रेस- ३१ + राष्ट्रवादी– ९ = १२८

भाजपा – ८२ + अपक्ष – १ = ८३

बहुमतासाठी मॅजिक फिगर – ११४                

राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याशिवाय काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, हे काँग्रेसने अगोदरच उघडपणे जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या शिवसेने पाठिंबा काढला, तरच शिवसेनेला मुंबईचे महापौरपद मिळू शकते. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मुंबई आपल्या हातून जाऊ देणार नाही. शिवाय शिवसैनिक, नगरसेवक, कार्यकर्ते यांनाही भाजपसोबत परत युती नको आहे. जर भाजपसोबत युती केलीच तर शिवसेनेचे प्रचंड हसू होईल. सत्तेसाठी स्वाभिमान सोडून लाचार लाचारी पत्करणारा पक्ष असा जनमानसात संदेश जाईल. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत युती करण्याची शक्यता फारशी दिसत नाही. मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल आणि मुख्यमंत्रीही शिवसेना ठरवेल, असे नवे फासे टाकून उद्धव ठाकरे यांनी नव्या राजकीय वाटचालीचे संकेत दिले आहेत. शिवाय निवडणुकीच्या अगोदर सरकारला नोटीस पिरिअडही दिला होता. या सगळ्या घडामोडी बघता शिवसेना नक्कीच नवी राजकीय समीकरणे मांडणार, हे सांगायला कोण्या राजकीय विश्लेषकाची गरज नाही.

मुंबईत काँग्रेसच्या पाठिंब्याने महापौर झालाच, तर त्या पावलावर पाऊल टाकून राज्यातही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हा सत्तेचा नवा ‘राज्य पॅटर्न’ अस्तित्वात येऊ शकतो. पण हे नवे राजकीय समीकरण अवघड आहे, पण अशक्य नाही. महाराष्ट्रात सुसाट सुटलेल्या भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी या तिन्ही पक्षांकडून हा पर्याय अवलंबला जाऊ शकतो. राज्यसरकारमधून सेना बाहेर पडली, तर पक्ष फुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. हे दोन्ही पक्ष काही अटींवर शिवसेनेसोबत सरकार स्थापन करू शकतात. कारण भाजपची सध्याची घोडदौड पाहता कोणालाच निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष नव्या ‘राज्य पॅटर्न’ या पर्यायाची चाचपणी करू शकतात.

राज्य सरकार- सत्तेचे सूत्र 

शिवसेना- ६३ + काँग्रेसचे ४२ + राष्ट्रवादीचे ४१ = १४६ 

भाजप- १२२ + बहुजन विकास आघाडी- ३ + रासप- १ = १२६

बहुमतासाठी मॅजिक फिगर – १४५ 

बिहारमध्ये भाजपला रोखण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नीतीश कुमार-लालू प्रसाद यादव हे दोघे आणि काँग्रेस एकत्र आले होते. त्यांनी बिहारमध्ये भाजपला पराभवाची धूळ चारली होती. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे सत्तेचे सूत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपचे सर्व विरोधक एकत्र येऊ शकतात. हे सूत्र मुंबई आणि महाराष्ट्र विधानसभेत प्रस्थापित झाले, तरच भाजपचा उधळलेला वारू रोखला जाऊ शकतो, यावर या तिन्ही पक्षांचा ठाम विश्वास आहे. येत्या एक-दोन दिवसांत कुठे किती पाणी मुरते, यावरच राज्यातील पुढील सर्व राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. पण येत्या काही दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार हे मात्र नक्की.

          

लेखक संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर अॅडमिनीस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, कोल्हापूर या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

editor@aksharnama.com

Post Comment

Saarang

Mon , 27 February 2017

शिवसेना हे राजकीय धाडस करेल का नाही अशी शंकाच आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......