इतकेच मला जाताना पोलिंग बूथवर कळले होते, मतदानाने केली सुटका प्रचाराने छळले होते!
संकीर्ण - व्यंगनामा
संकलित
  • या लेखातील सर्व छायाचित्रं सोशल मीडियावरून साभार घेतली आहे. संबंधितांचे मन:पूर्वक आभार
  • Wed , 22 February 2017
  • व्यंगनामा नगरपालिका नगरपंचायती Municipal council polls Municipal Corporation election भाजप BJP देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis शरद पवार Sharad Pawar

राज्यात काल महानगरपालिका, पंचायती समिती आणि जिल्हा परिषदा यांच्यासाठी मतदान झालं. त्याविषयी अनेक तर्क-कुतर्क लढवले जात आहेत. काल दिवसभर व्हॉटसअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस जाणार, मुंबईत शिवसेना येणार, मनसेची पुन्हा धुळधाण होणार, पुण्यात राष्ट्रवादी येणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा कालही रंगल्या होत्या, आजही रंगतील. उद्या निकालानंतर सर्व स्पष्ट होईलच. तोवर हा शेलका साज पहा.

----------------------------------------------------------------------------------------

मतदान करून व्यवस्था बदलता आली असती 
तर व्यवस्थेने मतदानच करू दिले नसते...
...तरी पण, उम्मीद पे दुनिया कायम है।

- सत्यजित चव्हाण (फेसबुकवरून साभार)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी काल मुंबईत, महालक्ष्मीला जिथं मतदान केलं, तिथं राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नव्हता, त्यामुळे पवारांनी मतदान केल्यापासून त्यांनी नेमकं कुणाला मतदान केलं, याविषयीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पवार अनेकांचं सॉफ्ट टार्गेट असल्यानं या चर्चेला काल दिवसभर चांगलाच जोर आला होता. आजच पवारांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. इतक्या वर्षांत पवारांनी काय कमावलं असेल तर हा असा संशय नि बेभरवसा.

पवारांनी मतदान तर केलंच आहे तेव्हा ते त्यांनी कुणाला केलं असेल याविषयी अनेकांनी तर्क लढवले गेले, त्यातील हा एक प्रातिनिधिक तर्क. हा तर्क इतरही अनेकांनी वर्तवला आहे. न जाणो पवारांच्या या खेळीनंही कुणाचा तरी तोटा होण्याची शक्यता अगदीच काही नाकारता येत नाही.

असो. पवारांनंतर पुढच्या छायाचित्राकडे काळजीपूर्वक वळू. हे छायाचित्र खरं की खोटं माहीत नाही. हे कुणी परस्पर तयार करून त्याची प्रिंट आऊट काढली असण्याची आणि ते कुठेतरी लावून त्याचं छायाचित्र काढलं असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण त्यातून सूचित होणारा, ध्वनित होणारा इशारा मात्र खतरनाक आहे.

हा प्रकार तर वरच्यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक आहे. ‘इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’च्या नावाशी मिळत्याजुळत्या कुणा स्वयंसेवी संस्थेनं ही जाहिरात सदहेतूने केली असली तरी त्यातली दमदाटी अगदी स्पष्ट आहे. ‘...नाहीतर परिणाम भोगावे लागतील’ असंच त्यातून सरळ सूचित केलं जात आहे.

ही पोस्ट काल दिवसभर व्हॉटसअॅपवरून फिरत होती. ज्याने कुणी ती तयार केली, त्याच्या कल्पनाशक्तीला सलामच करायला हवा. कारण या पोस्टमधील भावनेशी बहुतांशी मध्यमवर्गीय सहमत होतील.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......