टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • संदर्भ - एच वन बी सुधारणा विधेयक (चित्र - सतीश सोनवणे)
  • Wed , 01 February 2017
  • विनोदनामा टपल्या एच-वन बी व्हिसा H-1B visa डोनाल्ड ट्रम्प Donald Trump योगी आदित्यनाथ Yogi Adityanath शिवसेना Shiv Sena मनसे Maharashtra Navnirman Sena गिरिराज सिंह Giriraj Singh राणी पद्मावती Rani Padmavati संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali

१. अमेरिकेतील भारतीय नोकरदारांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले एच वन बी सुधारणा विधेयक अमेरिकी संसदेत सादर करण्यात आले आहे. प्रस्तावित विधेयकात हा व्हिसा असणाऱ्यांचे किमान वेतन १,३०,००० डॉलर्स करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांकडून स्वस्त मनुष्यबळाचा पर्याय म्हणून करण्यात येणाऱ्या परदेशी नोकरदारांच्या आयातीला चाप बसणार आहे. याचा मोठा फटका माहिती व तंत्रज्ञानविषयक निर्यातदार असलेल्या देशांना बसणार आहे. यात प्रामुख्याने भारताचा समावेश आहे. या व्हिसासाठीची सध्याची किमान वेतनमर्यादा ६० हजार डॉलर्स इतकी आहे.

अरे देवा, ट्रम्पतात्या आपल्यालाही 'मुसलमान'च समजतात होय! आता कुठे मुसलमानांचं नाक ठेचलं म्हणून नाच सुरू केला होता, तर ट्रम्पतात्यांनी आमच्याच पायाखालचं जाजम खेचलं! आता मॅडिसन स्क्वेअर ओस पडणार की काय?

…………………………………

२.  सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेवर चहुबाजूनंही टीकेची झोड उठत असताना भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले असून दहशतवाद रोखण्यासाठी आपल्या देशातही अशा प्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

आपल्या देशाकडे या सात देशांतल्या किंवा अन्य मुस्लीम देशांमधल्या नागरिकांची रीघ लागली आहे, असा शोध यांना योगविद्येनेच लागला असणार. आदित्यनाथ यांच्या भावनेचं वर्णन करण्यासाठी 'डोनाल्डच्या यज्ञसोहळ्यात आदित्यनाथ सुरागुंग' अशी काही स्वदेशी म्हण नसल्यामुळे नाईलाजाने 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना' याच त्यांना सपशेल नापसंत ठरणाऱ्या म्हणीने करावे लागेल.

……………………………

३. कोणतीही अट न ठेवता महापालिका निवडणुकीत युतीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या मनसेसमोर शिवसेनेने नवा प्रस्ताव ठेवून मनसेला खिंडीत गाठले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवू नये अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. मनसेने उमेदवार उभे केले नाही तर ते मराठी माणसाच्या हिताचा विचार करत असल्याचे स्पष्ट होईल, असे सेनेने म्हटले आहे.

'एकही मारा लेकिन सॉलिड मारा' हा एकच डायलॉग पाठ असल्याचा परिणाम. कधीतरी नियती 'इस थप्पड की गूँज जिंदगीभर सुनाई देगी' अशी स्थिती निर्माण करते. बाकी हे दोन कौटुंबिक वतनाप्रमाणे चालणारे पक्ष निवडणुकीत उतरले नाहीत, तर मराठी माणसाची काही खैर नाही वगैरे आत्मश्लाघा आता विनोदीही उरलेली नाही.

…………………………………..

४. संजय लीला भन्साळी निर्मित ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी उडी घेतली आहे. राणी पद्मावती या हिंदू होत्या. त्यामुळेच त्यांचं चुकीचं चित्रण केलं गेलं आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच हिंदू देवतांवर चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्यावर चित्रपट बनवण्याची हिमत नसते, असंही त्यांनी म्हटलं आहे. जे लोक भारताचा चुकीचा इतिहास दाखवत असतील तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, असंही त्यांनी ठणकावलं.

हे गिरीराज सिंह कोण आहेत? केंद्रीय मंत्री, सिनेमा अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ की गुडघ्यात मेंदू संघटनेचे सदस्य? संजय लीला भन्साळींच्या पद्मावतीमध्ये राणी पद्मावतीची बदनामी झाली आहे किंवा चुकीचं चित्रण झालं आहे, हे ठरवण्याचा यांचा अधिकार काय? पद्मिनी ही ऐतिहासिक नव्हे, काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, हे यांच्या गावी नसणार, हे उघडच आहे; पण, नेमंक काय चित्रण झालंय, हे यांना कळलं कसं? मोहंमद पैगंबरांवर सिनेमा काढण्यापासून यांना कोणी अडवलंय? कोणीही अडाणी इसम भाजपकडून निवडणूक लढवू शकतो, तुम्ही एआयएमआयएमकडून लढून दाखवा, असं यांना कोणी म्हणालं तर? 

……………………………………….

५. माथेरानमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश हरित लवादाने दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने बेकायदा बांधकामांवर सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बेकायदा बांधकामावरील कारवाई तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. 

हरित लवादाला तात्काळ हटवून माथेरानचा संपूर्ण विकास केला पाहिजे. सगळे रस्ते पक्के केले पाहिजेत. टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत. म्हणजे पर्यटकांना माथेरानमध्ये सर्वदूरपर्यंत पोहोचून निसर्गाची नासाडी करता येईल. स्थानिकांचे उद्योग-व्यवसाय उत्तम प्रकारे चालणं महत्वाचं. माणूस निसर्गापेक्षा मोठा आहे. फार फार तर काय होईल, माथेरान हे हिल स्टेशनच राहणार नाही ना? ते माथेरानकरांचं नशीब!

…………………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......