टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • संदर्भ - सेना-भाजप युती (चित्र - सतीश सोनवणे)
  • Wed , 25 January 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अमोल पालेकर Amol Palekar विनय कटियार Vinay Katiyar सुब्रमण्य स्वामी Subramanian Swamy केशवप्रसाद मौर्य Keshav Prasad Maurya एकनाथ शिंदे Eknath Shinde

१. मराठी माणूस नाटकवेडा तर मग नाट्यसंस्कृतीवर हल्ला होतो, तेव्हा कलाकारांच्या पाठीशी तो का उभा राहत नाही? -अमोल पालेकर 

पालेकरसाहेब, मराठी माणूस रंगमंचावरच्या नाटकांचा नाही, नाटकी नेत्यांच्या नौटंकीचा चाहता आहे, त्या अर्थाने तो नाटक'वेडा' आहे. धादान्त खोट्यावर विश्वास ठेवायला लावणं, हे जर अभिनयाचं कौशल्य असेल, तर त्यात नेतेच अधिक सरस असतात, हे तुम्हीही मान्य कराल, नाही का?

………………………..

२. काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी यांच्यापेक्षाही अनेक सुंदर महिला नेत्या आणि अभिनेत्री असताना पक्षाने त्यांना स्टार प्रचारक म्हणून का नेमले असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नेते विनय कटियार यांनी उपस्थित केला आहे.

या विधानावरून कसलाही वादंग करण्याचं काहीच कौशल्य नाही. जो तो आपल्या अनुभवातून आणि आपल्या पक्षाच्या धोरणांच्या चौकटींतून बोलतो. ज्या पद्धतीने कटियार यांच्या पक्षात स्टार प्रचारक निवडले जातात, तीच पद्धत जगातली एकमेव पद्धत आहे, अशी त्यांची समजूत झाली असेल, तर त्यात त्यांचा दोष काय?

………………………..

३. 'टाइम्स नाऊ'चे माजी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या आगामी वृत्तवाहिनीच्या नावाला भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्य स्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. गोस्वामी लवकरच ‘रिपब्लिक’ नावाची वृत्तवाहिनी सुरू करणार आहेत. मात्र, हे नाव संविधानातील कायद्याचा उल्लंघन करणारे आहे, असं स्वामी यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

अर्णबदादा कोणासाठी वाहिनी काढणार आहेत, याची स्वामींना कल्पनाच नाही की, ते असताना अर्णबची गरजच काय, अशा असूयेतून ते हे करतायत? कारण काहीही असो; अर्णबच्या अहंमन्य, उद्धट, उर्मट आणि आचरट पत्रकारितेपासून भारतीय जनमानसाचा काही काळासाठी बचाव होईल, हा फायदाच झाला ना!

………………………..

४. रामलल्लाचे मंदिर दोन महिन्यात बनणार नाही. आता निवडणुकीनंतरच राम मंदिर उभारणार आहोत. राम मंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे. : भाजपचे उत्तर प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य

या विधानानंतर उत्तर प्रदेशात थंडीच्या लाटेवर मात करणारी हास्याची लाट उसळली असेल. रामलल्ला हा आस्थेबिस्थेचा नाही, भाजपच्या मत-गल्ल्याचा विषय आहे, हे उत्तर प्रदेशातल्याच नव्हे तर देशभरातल्या सगळ्याच रामभक्तांना समजून गेलं आहे. आता दुसरं काही फोडता आलं तर पाहा, म्हणजे पुढची पंचवीस वर्षं नवं दुकान थाटता येईल.

…………………………………………….

५. मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. शिंदे यांना व्हीआयपी एन्ट्री न दिल्याने या रक्षकाने ही राडेबाजी केली. मात्र, आपल्या सुरक्षारक्षकाने फक्त काचेवर हात ठेवला होता; योगायोगाने ती काच फुटली, असा दावा शिंदे यांनी केला आहे.

शिंदेसाहेब, लोकांना सांगून उपयोग नाही हो! आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि माननीय साहेबांच्या प्रेरणेने आपण कुठेही हात न ठेवता किती काचांचा भुगा होतो, याची कल्पना ज्याची फुटली त्यालाच येणार- बाकीच्यांना या दैवी शक्तीचा महिमा काय कळणार?

editor@aksharnama.com

Post Comment

Vidyadhar Pokharkar

Wed , 25 January 2017

टिक्कोजीरावांच्या एकापेक्षा एक सरस टपल्या खाऊन तरी संबंधित व्यक्ती सुधारतील अशी आशा बाळगू या!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......